शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे मार्गी लावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST

गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या ...

गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या घटकांना लाभ देण्याचे काम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने करावे. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हा पालक सचिव श्याम तागडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, उपवनसंरक्षक कुलराज सिंग, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तागडे म्हणाले, शासनाच्या महत्त्वाच्या योजना जिल्हास्तरावर संबंधित विभागांकडून नियोजित पध्दतीने राबविणे गरजेचे आहे. प्रशासन आणि लाभार्थ्यांमध्ये समन्वय असणेदेखील गरजेचे आहे. कोणत्याही योजना राबविताना प्रशासन तसेच नागरिकांच्या समस्या शासन स्तरावर पोहचवून त्याचे निदान व पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आढावा बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील कोविड-१९ व बर्ड फ्लूसंदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर या आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सादरीकरण करण्यात आले. कृषी विभागातील पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता विशेष लक्ष देऊन पीक विमा योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळेल, असे निर्देश पालक सचिवांनी दिले. बैठकीत धान खरेदी, शिक्षण, पंचायत, बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासन, सहकार विभाग, सिंचन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, महाआवास योजना इत्यादी विषयांवर आढावा घेऊन सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले.

....

गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवा

जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेचे जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सद्यस्थितीत एकूण १,०७,१६२ लाभार्थी आहेत. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य संबंधित विभागाने प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले.

....