शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परिसरातील धान पिकावर लष्करी अळीचा प्रकोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:08 IST

अळीच्या प्रभावामुळे धान सपाचट : परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणार

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपुरबांध : यावर्षी उत्तम पाऊस पडला आणि शेतकरी समाधानकारक पीक हातात येईल, हा विचार करून समाधान व्यक्त करीत होता. परंतु, निसर्गाच्या अवकृपेने हाता-तोंडाशी आलेल्या धानाला मुकण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होईल, या चिंतेत शेतकरी अडकला आहे.

१ व १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे शिरपूर जलाशयाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. पुरामुळे नदीकाठालगतचे धानपीक बुडाले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान झाले. परंतु, काही प्रमाणात धान पीक हातात येईल असे वाटत असताना या पूरग्रस्त भागातील धान पिकावर लष्करी अळीने अतिक्रमण केले. शिरपूर बांध व पदमपूर येथील शेतकऱ्यांच्या धानपिकावर हल्ला चढविल्याने पूर्ण पीक हातून गेले असून, लष्करी अळीला नियंत्रणात आणण्याकरिता परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने ड्रोनच्या साह्याने औषधांची फवारणी करीत आहेत. 

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून लष्करी अळीला आटोक्यात आणण्याकरिता कोणत्या औषधांची फवारणी करावी, त्याचबरोबर नियंत्रणाकरिता उपाय सांगण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एल. एम. राजपूत, मंडळ कृषी अधिकारी के. एम. बोरकर, पर्यवेक्षक एम. एम. जमदाड व कृषी सहायक एम. टी. कोल्हे उपस्थित होते. 

"लष्करी अळीच्या नियंत्रणाकरिता शेतातील बांध स्वच्छ ठेवावे, धानाच्या बांधीत पाणी साठवून ठेवावे. पिकावरून दोरीच्या साहायाने लष्करी अळ्या पाडाव्यात व डायक्लोरोव्हॉस ७५ पाण्यात मिसळून फवारणी करावी."- एल. एम. राजपूत, तालुका कृषी अधिकारी 

टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरीfarmingशेतीPaddyभात