शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

वन पर्यटनासोबत कृषी पर्यटनही शक्य अनेकांना आशा

By admin | Updated: May 8, 2014 23:49 IST

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात.

नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे बदलू शकते जिल्हावासीयांचे जीवनमान

मनोज ताजने - गोंदिया

जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यातून जिल्ह्याकडे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले वळू शकतात. मात्र वनपर्यटनासोबतच या भागात कृषी पर्यटनाला चालना दिल्यास पर्यटकांसाठी हे वेगळे आकर्षण राहणार आहे. यातूनच जिल्ह्यात रोजगाराची नवी दालनं उघडल्या जाऊन स्वयंरोजगाराला चालना मिळू शकते, असा दावा अनेक जाणकार करीत आहेत. नवेगावबांध येथे पर्यटन विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या खेळखंडोब्यावर लोकमतने चार भागांची मालिका प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी ‘लोकमत’ला फोन करून या विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद दिले.

आतातरी जिल्हा पर्यटन समितीची या बाबतीत असलेली उदासीनता दूर होऊन येथील अर्धवट असलेल्या कामांना चालना मिळेल अशी आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. सोबतच या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी कसा वाव आहे, हेसुद्धा त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. नवेगावबांध पर्यटनस्थळाचा इतिहास फार जुना आहे. परंतु या ऐतिहासिक स्थळाच्या विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. परिणामी येथे मधल्या काळात वाढलेली पर्यटकांची संख्या आता रोडावली आहे. दरम्यान केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व तीर्थस्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी मिळविला. यातील ९ कोटी रुपये नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या विकासासाठी लावले जाणार आहेत.

मात्र त्या कामांनाही अजून सुरूवात झालेली नाही. त्या निधीतून म्युझियम, लेझर शो, इको फ्रेंडली विश्रामगृह आदी सुविधा उभारल्या जाणार असल्याचे ना.पटेल यांनी सांगितले आहे. मात्र त्यासोबतच आता कृषी पर्यटनाला चालना देण्याची गरज अनेकांना वाटत आहे. शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आणि विशेषत: मुलांना शेती कशी पिकते यासह भाताची शेती कशी असते हेसुद्धा माहित नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यादृष्टीने विचार करून पावले उचलली तर या भागातील रोजगाराच्या संधी आणखी वाढून या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.