शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यानेच राजीनामा-पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:50 IST

संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर असलेल्या विश्वासापोटी,

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर असलेल्या विश्वासापोटी, प्रेमापोटी मी कुठेही असलो तरी त्याच जोमाने, ताकदीने आपले कार्य करीत राहील, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार नाना पटोले यांनी केशोरी येथे आयोजित जाहीर सभेत केली.डॉ. राधाकृष्णन हायस्कूल कनेरीच्या पटांगणावर केशोरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आयोजित जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तालुका काँग़्रेस कमेटीचे उपाध्यक्ष नारायण घाटबांधे, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भागवत पाटील नाकाडे, दिलीप डोये, राजेश नंदागवळी, रेखा समरीत, प्रमोद लांजेवार, नितीन पुगलिया, पोर्णिमा शहारे, पटले, आशा झिलपे, विशाखा शहारे, हेमंत भांडारकर, माणिक घनाडे, बाबुराव पाटील गहाणे, नरेश पाटील गहाणे, श्रीकांत घाटबांधे, विनोद गहाणे, चेतन शेंडे व हजारोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.पटोले म्हणाले, केंद्र व राज्य सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करुन महाराष्ट्र पेटविण्याचे काम करीत आहे. हे थांबविणे अत्यंत गरजेचे आहे.कोरेगाव भिमा प्रकरणी राज्य शासन दोषी असल्याचे सांगून लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण करण्याचे विष पेरीत आहे. स्थळांचे संरक्षण करणे ही शासनाची जबवादारी असते.शेतकºयांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करुन शेतकऱ्यांचे हित जोपासून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमी भाव देणे आवश्यक आहे. जे शासन शेतकरी, गोरगरीबांचा विचार करीत नसेल तर अच्छे दिन येण्याचा विचार करु नका असे ते म्हणाले. सुशिक्षीत बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यापेक्षा राजकारण हे व्यवसाय म्हणून करणाऱ्या शासनाला वटणीवर आणणे गरजेचे आहे, असे मत माजी खासदार पटोले यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच कुठलाही पक्षात असलो तरी शेतकऱ्यांसाठी लढा सुरू राहिल असे सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले