रस्त्यावर जनावरे बांधणार्यांवर कारवाई शून्य
By Admin | Updated: June 8, 2014 23:57 IST2014-06-08T23:57:40+5:302014-06-08T23:57:40+5:30
भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश आहेत. परंतु तालुक्यात आजपर्यंत यासंदर्भात एकही गुन्हा दाखल

रस्त्यावर जनावरे बांधणार्यांवर कारवाई शून्य
दिलीप चव्हाण - गोरेगाव
भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश आहेत. परंतु तालुक्यात आजपर्यंत यासंदर्भात एकही गुन्हा दाखल झाला नाही अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील पशुपालक रस्त्यावरच जनावरे बांधतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. हा बेकायदेशीर अतिक्रमणाचा प्रकार आहे. या प्रकरणातील पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला शासन आदेशाचा विसर पडला आहे.
राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खचरून ग्रामीण नागरिकांच्या सोईसाठी रस्ते तयार केले. मात्र पशुपालकांनी रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. अशा पशुपालकांवर ग्रामपंचायत प्रशासनाने प्रथम नोटीस बजावून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करायला पाहिजे. मात्र आजपर्यंत तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत प्रशासनाने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात धाडस दाखविले नाही.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करण्यात येतो. दहा वर्षापूर्वी गावरस्त्यांची अवस्था दयनिय होती. आज गल्लोगल्ली विविध योजनेतून कांक्रीट रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. परंतु या रस्त्याचा उपयोग आता पशूपालक गाय, म्हैस, बैल, शेळी बांधकामाकरिता करीत असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे गावात जाणार्या रस्त्याच्या बाजूला खुंट्याला जनावरे बांधलेली असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी या रस्त्याने चालने अवघड झाले आहे. अनेकवेळा या रस्त्यावर दुचाकी चालकांचे अपघात झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सिमेंट रस्त्यावर जनावरे बांधले जातात. याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.