शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारात ९४ गावे

By admin | Updated: February 9, 2015 23:14 IST

सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०१९ पर्यंत

पाणीटंचाईवर होणार मात : गोंदिया, तिरोडा, सालेकसा, गोरेगावातील सर्वाधिक गावांची निवडगोंदिया : सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेऊन आणि भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील ९४ गावांची निवड करण्यात आली आहे.शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणांतर्गत एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन पिण्याचे पाणी आणि पिकांना संरक्षीत सिंचन देण्याची व्यवस्था करुन विकेंद्रीत पाणीसाठे या अभियानातून निर्माण करण्यात येणार आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ४६ गावात ८९ कामे सुरू आहेत. ज्या ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये तिरोडा २४, सालेकसा १३, गोरेगाव १३, गोंदिया २४, देवरी ७, आमगाव ४, सडक अर्जुनी ५ आणि अर्जुनी मोरगाव ४ गावांचा समावेश आहे.या अभियानांतर्गत कृषी विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यात १७ जानेवारीला शेततळे, माता नाली बांध, सिमेंट नाला बांध, भात खाचरे दुरुस्तीची कामे सुरू केली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाने गोंदिया तालुक्यातील बिरसोला, गिरोला, गोरेगाव तालुक्यातील लिंबा आणि बोटे, तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे नळ पाणी पुरवठा योजना, गोंदिया पाटबंधारे विभागाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध व बीडटोला येथील नवेगावबांध लघू प्रकल्पाचे गोंडउमरी वितरिकेवरील निवडक ठिकाणी अस्तरीकरणाचे काम, जि.प.च्या लघू पाटबंधारे विभागाने साठवन बंधारा दुरुस्ती, ल.पा. तलावांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती, नला सरळीकरण, साठवण बंधारे, साठवण तलावांची कामे सुरू केली आहे. विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावशिवारातच अडविणे, सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासोबतच शेतीसाठी संरक्षीत पाणी आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती देणे तसेच ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्जीवीकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तिवात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोत्यांची उदा. बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदिंची पाणीसाठवण क्षमता पुन:र्स्थापीत करणे, त्याचप्रमाणे ती वाढविणे, अस्तित्वात असलेल्ळा जलस्त्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून जलस्त्रोत्यांचा पाणीसाठा वाढविणे, वृक्षलागवडीस प्रोत्साहन देवून वृक्ष लागवड करणे, पाण्याच्या टाळेबंदाबाबत जनतेत जाणीव-जागृती निर्माण करणे आदींचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)