शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

जिल्ह्यात ९२ मिमी पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 9:25 PM

मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१४ तारखेपर्यंतचा अंदाजित पाऊस : यंदा फक्त ०.७८ मिमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, यंदा जिल्ह्यात पावसाळ््याच्या सुरूवातीलाच ९२ मिमी पावसाची तूट दिसून येत आहे.मागील काही वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत असून मृग नक्षत्र लागूनही बरसण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिली असून मृग नक्षत्र लागूनबी शुक्रवारपर्यंत (दि.१४) हजेरी लावलेली नव्हती. परिणामी उकाड्यामुळे सर्वच हैरान असताना पाणी टंचाई अधिकाधिक गंभीर होत असून सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कधी पाऊस बरसतो व उकाडा आणि पाणी टंचाईपासून सुटका होते याची आस लावून सर्वच बसले आहेत. अशात शनिवारी (दि.१५) दुपारी पावसाने हजेरी लावली.तरिही जिल्ह्यातील पर्जन्याची स्थिती बघता १४ जून पर्यंत जिल्ह्यात ९२ मीमी एवढा पाऊस होणे अपेक्षीत आहे. यंदा मात्र जिल्ह्यात फक्त ०.७८ मीमी एवढ्याच पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यात यंदा ९२ मीमी पावसाची तूट सुरूवातीलाच दिसून येत आहे. अशीच स्थिती असल्यास येणारा काळ कठीण दिसून येत आहे. एकीकडे उकाड्याने सर्वांनाच हैरान करून ठेवले आहे. त्यात पाऊस बरसत नसल्याने प्रकल्प व तलावांतील पाणीसाठा घटत चालला असून पाणी टंचाई अधिक गंभीर होत चालली आहे.त्यामुळे लवकरात लवकर पाणी बरसणे गरजेचे झाले आहे. असे न झाल्यास उकाड्यापासून सुटका होणे कठीणच दिसत आहे. शिवाय पाणी टंचाईचा फटका बसत असल्याने नागरिकांची फसगत होत आहे. यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून धो-धो बरसावा अशी प्रार्थना जिल्हावासी करीत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस