११ महिन्यांत पळविल्या ६८ मोटारसायकल

By Admin | Updated: December 7, 2014 22:52 IST2014-12-07T22:52:15+5:302014-12-07T22:52:15+5:30

जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या

68 motorcycles thrived in 11 months | ११ महिन्यांत पळविल्या ६८ मोटारसायकल

११ महिन्यांत पळविल्या ६८ मोटारसायकल

टोळी सक्रिय : एकाच महिन्यात १५ वाहने पळविली
गोंदिया : जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या नोव्हेंबर महिन्यात १५ मोटारसायकल पळविण्यात आल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांपैकी गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक मोटार सायकल पळविण्यात आल्या आहेत. गोंदिया शहरातील गर्दीच्या ठिकाणांना या चोरट्या टोळीतील सदस्यांनी टार्गेट केले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, रेल्वे स्थानक, बाजार परिसर, जयस्तंभ चौक, बसस्थानक, शाळा, महाविद्यालय व शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या वाहनांना त्यांनी लक्ष्य केले आहे. एखाद्या नागरिकाने आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून बाजार परिसरात गेले तर त्यांच्यावर नजर ठेवणारा एक व्यक्ती त्या वाहनाला चोरून नेणारा दुसरा व्यक्ती असे दोघे व्यक्ती त्या मोटारसायकलला पळवितात. हे वाहन पळविण्यासाठी आरोपी चहाटपरीचा आधार घेत असल्याची माहिती आहे.
तासनतास चहाटपरीवर बसून त्या मोटारसायकलवर आपली नजर ठेवतात. विशेष म्हणजे खुल्या मोटारसायकल तर सोडाच मात्र लॉक करून ठेवलेल्या मोटारसायकलला देखील काही वेळातच पळवून नेत आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या सन २०१४ च्या ११ महिन्यांत ६८ मोटारसायकल पळविण्यात आल्या आहेत. सन २०१३ या वर्षात ४८ तर सन २०१२ मध्ये ७१ मोटारसायकल पळविण्यात आल्या होत्या. दुचाकीला पळविणाऱ्या टोळीच्या मागावर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आहे. मात्र पोलीस यंत्रणेला या चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 68 motorcycles thrived in 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.