शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

६०० शेतकऱ्यांचे धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 8:49 PM

धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे.

ठळक मुद्देकालवा फुटला : महिनाभरापासून दुरुस्तीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे. धानाला एका पाण्याची गरज असताना पाणी मिळत नसल्याने हे शेतकरी चिंतेत आहेत.सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरण आहे. या धरणातून दोन मोठे कालवे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आले. एक कालवा महाराष्ट्रात तर दुसरा कालवा मध्यप्रदेशात जातो. मध्यप्रदेशात जाणारा कालवा सालेकसा तालुक्यातील शेतांना पाणी देत पुढे जातो.सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी, दरबडा व धानोली या तीन गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेले छोटे कालवे व वितरीका जागोजागी फुटल्यामुळे या तीन गावातील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही. यंदा पाऊस उशीरा आला. परंतु दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडावे लागले. पिकाला पाण्याची गरज असताना पावसाने १५ दिवस पूर्वीच दडी मारल्यामुळे पिकांसाठी पाणी सोडण्यात आले. महिनाभरापासून कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळू शकले नाही.कालव्याला पाणी सोडले तेव्हा पहिल्यांदा कालव्यात पाणी आले. परंतु पाण्याचा जोर पाहून जिर्ण झालेले कालवे व वितरीकांच्या पाळी जागोजागी फुटल्या.विशेष करून सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी या तीन ठिकाणी कालवे मोठ्या प्रमाणात फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही.या संदर्भात शेतकऱ्यांनी कसेबसे फुटलेल्या ठिकाणी माती टाकून पाणी वाया जाऊ नये याची तजविज केली व पाटबंधारे विभागाला कळविले. परंतु सालेकसा येथील पाटबंधारे विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही.वारंवार तक्रार करूनही कालवे दुरूस्त न केल्यामुळे भग्न कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले मात्र शेतात पोहचू शकले नाही.या तीन ठिकाणी फुटला कालवाकालवेदरबडा ते धानोली या दरम्यान तीन ठिकाणी अंगराज कटरे, गुणवंत बिसेन, मनराज पटले या तीन शेतकऱ्यांच्या शेताजवळ कालवे फुटले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या कालव्याची भग्नावस्था पाहून यंदा पाऊस समाधानकारक येऊनही पीक होणार किंवा नाही या चिंतेत शेतकरी आहेत.सालेकसा तालुक्यातील दरबडा, धानोली व बोदलबोडी येथील ६०० शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. कालवे फुटल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यासंदर्भात तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत.शारदा पटले,सरपंच, दरबडा (सालेकसा)

टॅग्स :Waterपाणी