शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन महामंडळाचे ५ लाख प्रवासी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:09 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे का टाळत आहेत.

ठळक मुद्देमागील ७ महिन्यांतील आकडेवारी : वाढीव तिकीट दराने आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे का टाळत आहेत. हा संशोधनाचा विषय असून महामंडळाचे प्रवासी वाढवा अभियान अपयशी ठरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.मागील ७ महिन्यांत गोंदिया आगाराच्या बसेसमधून ६७ लाख ८२ हजार ४५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. जेव्हा की, १ वर्षापूर्वी ७३ लाख २६ हजार ३८० प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यावरून ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवाशांची घट दिसून येते. ही आकडेवारी जुलै ते जानेवारी या काळातील आहे. यातील, जुलै २०१८ मध्ये ९ लाख ५ हजार ५३८, आॅगस्टमध्ये १० लाख १ हजार १०१, सप्टेंबरमध्ये १० लाख ८ हजार १८९, आॅक्टोबरमध्ये ९ लाख २२ हजार ९२, नोव्हेंबरमध्ये ९ लाख २३ हजार १८८, डिसेंबरमध्ये ९ लाख ७४ हजार २०३ तर जानेवारी २०१९ मध्ये १० लाख ४१ हजार १४६ प्रवाशांनी गोंदिया आगाराच्या बसमधून प्रवास केला आहे.तर १ वर्षापूर्वी म्हणजेच, जुलै २०१७ मध्ये १० लाख ३४ हजार २२, आॅगस्टमध्ये ११ लाख १ हजार ३९१, सप्टेंबरमध्ये १० लाख ७१ हजार ३१४, आॅक्टोबरमध्ये ८ लाख ८९ हजार ६४, नोव्हेंबरमध्ये ९ लाख ९१ हजार ३४९, डिसेंबर मध्ये १० लाख ९१ हजार तर जानेवारी २०१८ मध्ये ११ हजार ४७ हजार ५१३ प्रवाशांनी प्रवास केला होता. या आकडेवारीवर नजर टाकल्यास, फक्त आॅक्टोबर महिन्यात सन २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये जास्त प्रवासी मिळाल्याचे दिसते. तर उर्वरीत मागील ६ महिन्यांत या वर्षापेक्षा अधिक तर यंदा कमी प्रवासी मिळाल्याचे दिसते.खासगी प्रवासी वाहनांमुळे फटकाजिल्ह्यात काळी-पिवळी व आॅटो सर्वसामान्यांपर्यंत पोहचले असून याचा फटका महामंडळाच्या प्रवासी संख्येवर पडत आला आहे. पूर्वी फक्त बालाघाट मार्गावर खाजगी बसेस धावत होत्या.मात्र आता आमगाव-देवरी मार्गावर खासगी बसेस धावत आहेत. याचा थेट फटका आगाराच्या प्रवासी संख्येवर बसत आहे. आगाराकडून प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न करून प्रवासांना अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र प्रवासी संख्येत घट होत असल्याने याचा काहीच फायदा मिळत नसल्याचे दिसत आहे.तिकीट विक्रीतून २० कोटी मिळालेगोंदिया आगाराला मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त आवक झाल्याचे दिसत आहे. यावर्षी सुमारे २० कोटी रूपये तिकीट विक्रीतून आगाराला मिळाले आहेत. तर मागील वर्षी सुमारे १८ कोटी रूपयांचे उत्पन्न झाले होते. यात जुलै महिन्यात यंदा २.९१ कोटी तर मागील वर्षी २.५३ कोटी, आॅगस्ट महिन्यात यंदा ३ कोटी तर मागील वर्षी २.५६ कोटी, सप्टेंबरमध्ये यंदा २.९५ कोटी तर मागील वर्षी २.५३ कोटी, आॅक्टोबरमध्ये यंदा २.८८ कोटी तर मागील वर्षी २.५९ कोटी, नोव्हेंबरमध्ये ३.४३ कोटी तर मागील वर्षी २.५६ कोटी, डिसेंबरमध्ये ३.२५ कोटी तर मागील वर्षी २.७७ कोटींचे उत्पन्न तिकीट विक्रीतून झाले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ