शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

परिवहन महामंडळाचे ५ लाख प्रवासी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:09 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे का टाळत आहेत.

ठळक मुद्देमागील ७ महिन्यांतील आकडेवारी : वाढीव तिकीट दराने आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील ७ महिन्यांत महामंडळाच्या गोंदिया आगारातंर्गत ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवासी यंदा घटल्याचे दिसून येत आहे. यावरून प्रवासी लालपरीतून प्रवास करण्याचे का टाळत आहेत. हा संशोधनाचा विषय असून महामंडळाचे प्रवासी वाढवा अभियान अपयशी ठरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.मागील ७ महिन्यांत गोंदिया आगाराच्या बसेसमधून ६७ लाख ८२ हजार ४५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. जेव्हा की, १ वर्षापूर्वी ७३ लाख २६ हजार ३८० प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यावरून ५ लाख ४३ हजार ९२३ प्रवाशांची घट दिसून येते. ही आकडेवारी जुलै ते जानेवारी या काळातील आहे. यातील, जुलै २०१८ मध्ये ९ लाख ५ हजार ५३८, आॅगस्टमध्ये १० लाख १ हजार १०१, सप्टेंबरमध्ये १० लाख ८ हजार १८९, आॅक्टोबरमध्ये ९ लाख २२ हजार ९२, नोव्हेंबरमध्ये ९ लाख २३ हजार १८८, डिसेंबरमध्ये ९ लाख ७४ हजार २०३ तर जानेवारी २०१९ मध्ये १० लाख ४१ हजार १४६ प्रवाशांनी गोंदिया आगाराच्या बसमधून प्रवास केला आहे.तर १ वर्षापूर्वी म्हणजेच, जुलै २०१७ मध्ये १० लाख ३४ हजार २२, आॅगस्टमध्ये ११ लाख १ हजार ३९१, सप्टेंबरमध्ये १० लाख ७१ हजार ३१४, आॅक्टोबरमध्ये ८ लाख ८९ हजार ६४, नोव्हेंबरमध्ये ९ लाख ९१ हजार ३४९, डिसेंबर मध्ये १० लाख ९१ हजार तर जानेवारी २०१८ मध्ये ११ हजार ४७ हजार ५१३ प्रवाशांनी प्रवास केला होता. या आकडेवारीवर नजर टाकल्यास, फक्त आॅक्टोबर महिन्यात सन २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये जास्त प्रवासी मिळाल्याचे दिसते. तर उर्वरीत मागील ६ महिन्यांत या वर्षापेक्षा अधिक तर यंदा कमी प्रवासी मिळाल्याचे दिसते.खासगी प्रवासी वाहनांमुळे फटकाजिल्ह्यात काळी-पिवळी व आॅटो सर्वसामान्यांपर्यंत पोहचले असून याचा फटका महामंडळाच्या प्रवासी संख्येवर पडत आला आहे. पूर्वी फक्त बालाघाट मार्गावर खाजगी बसेस धावत होत्या.मात्र आता आमगाव-देवरी मार्गावर खासगी बसेस धावत आहेत. याचा थेट फटका आगाराच्या प्रवासी संख्येवर बसत आहे. आगाराकडून प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न करून प्रवासांना अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र प्रवासी संख्येत घट होत असल्याने याचा काहीच फायदा मिळत नसल्याचे दिसत आहे.तिकीट विक्रीतून २० कोटी मिळालेगोंदिया आगाराला मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त आवक झाल्याचे दिसत आहे. यावर्षी सुमारे २० कोटी रूपये तिकीट विक्रीतून आगाराला मिळाले आहेत. तर मागील वर्षी सुमारे १८ कोटी रूपयांचे उत्पन्न झाले होते. यात जुलै महिन्यात यंदा २.९१ कोटी तर मागील वर्षी २.५३ कोटी, आॅगस्ट महिन्यात यंदा ३ कोटी तर मागील वर्षी २.५६ कोटी, सप्टेंबरमध्ये यंदा २.९५ कोटी तर मागील वर्षी २.५३ कोटी, आॅक्टोबरमध्ये यंदा २.८८ कोटी तर मागील वर्षी २.५९ कोटी, नोव्हेंबरमध्ये ३.४३ कोटी तर मागील वर्षी २.५६ कोटी, डिसेंबरमध्ये ३.२५ कोटी तर मागील वर्षी २.७७ कोटींचे उत्पन्न तिकीट विक्रीतून झाले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ