शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

४५० नादुरूस्त वीज मीटर बदलले

By admin | Updated: May 18, 2017 00:09 IST

पीकांच्या चिंतेने अगोदरच ग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला दिलासा म्हणून महावितरणच्यावतीने शेतकऱ्यांचे नादुरूस्त कृषी पंप मीटर

महावितरणची विशेष मोहीम : देवरी विभागातील शेतकऱ्यांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पीकांच्या चिंतेने अगोदरच ग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला दिलासा म्हणून महावितरणच्यावतीने शेतकऱ्यांचे नादुरूस्त कृषी पंप मीटर बदलण्याची विशेष मोहीम घेण्यात आली. देवरी विभागाने ११ ते १३ मे या दरम्यान घेतलेल्या या मोहिमेत विभागातील ४५० शेतकऱ्यांचे नादुरूस्त कृषीपंप मीटर बदलवून देण्यात आले. सध्या शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. उन्हाळी पिकांना वेळीच योग्य त्या प्रमाणात पाणी मिळाल्यास शेतकरी चांगले उत्पन्न घेऊन आपल्यावरील कर्जाचा बोझा काही प्रमाणात कमी करण्याच्या स्थितीत येऊ शकेल. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या वीज कंपनीला घेऊन तक्रारी आहेत. सोबतच कित्येकांचे कृषीपंपाचे वीज मीटर नादुरूस्त असून पैसे लागणार यामुळे शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नाही. अशा नाजूक समयी शेतकऱ्यांची ही स्थिती ओळखून महावितरणने शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी एवढी मदत करण्याच्या उद्देशातून ही विशेष मोहीम घेतली. प्राथमिक स्तरावर देवरी विभागांतर्गत ही मोहीम घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत शेतकऱ्याच्या वीज बिलासंबंधीत तक्रारींचे निवारण तर करण्यात आलेच. शिवाय शेतीपंपांचे नादुरूस्त मीटर त्यांना एक पैसा न लागू देता त्वरीत बदलवून देण्यात आले. परिणामी या मोहिमेतून ४५० शेतकऱ्यांचे नादुरूस्त कृपीपंप मीटर बदलविण्यात आले आहे. तर सोबतच कृषीपंप वीज ग्राहकांना त्यांच्या कृषीपंपाच्या वीज बिलासंबंधी सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी व नादुरूस्त मीटर बदलविण्यासाठी वितरण केंद्रात संपर्क साधण्याची सुविधाही देण्यात आली आहे. ही मोहीम गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी गोंदिया मंडळाचे अधीक्षक अभियंता एल.एम.बोरीकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. यात देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता तेलंग, उप कार्यकारी अभियंता परिहार, शेख, जनबंधू, बडोले, सहायक अभियंता बहादुरे, वाटेकर, टांगले, लाईनमन बांते, भर्रे, कोरचे, राऊत, ठवकर, पठाण व ताजणे यांनी भाग घेतला. महावितरणकडे १५०० मीटर रिझर्व्ह देवरी विभागात कृषीपंप वीज मीटर धारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने महावितरणने मोहीम प्राधान्याने देवरी विभागात राबविली. मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांचे नादुरूस्त मीटर बदविताना मीटर कमी पडू नये यासाठी परिमंडळाला १५०० मीटर वेगळे देण्यात आले होते. यातूनच नादुरूस्त मीटर बदलविण्याचे नि:शुल्क कार्य केले जात आहे. शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी महावितरण पुढे आले. तर त्यानुसार शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडील वीज बील मुदतीच्या आत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.