शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तासभरात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी; शेतकऱ्यांना ठेंगा, व्यापाऱ्यांची मात्र चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 10:50 IST

धान खरेदीत घोटाळ्याची शंका, गुन्हा दाखल करण्याची मागणी

गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीची मर्यादा शिंदे-फडणवीस सरकारने वाढवून देताच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारी एकाच तासातच ४ लाख ४९ हजार क्विंटल धानखरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दाखविलेली तत्परता खळबळ उडवून देणारी ठरली आहे. वाढवून दिलेल्या खरेदीची मर्यादा सात ते आठ दिवसांत पूर्ण करता आली असती. फेडरेशनने कमालीच्या घाईने केलेल्या धानखरेदीत व्यापाऱ्यांचेच उखळ पांढरे झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. या खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याची शंका उपस्थित झाली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

विदर्भातील सहा आमदारांनी रब्बी धानाचे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यानुसार तडकाफडकी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. एवढेच नव्हे तर घालून दिलेली धानखरेदीची मर्यादा एका तासातच पूर्ण करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड सुरू केली आहे. आधारभूत शासकीय धान खरेदीमध्ये शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी न केल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जर आधारभूत धान खरेदीत शेतकऱ्यांचे धान खरेदी केले असते तर त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले नसते. एक दिवसाला अधिकाधिक १ लाख क्विंटल धान खरेदी करता येते, त्यापेक्षा चारपटींहून जास्त धानाची खरेदी एका दिवसात झाली, ही बाब धक्कादायक आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी ज्या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून धान न घेता व्यापाऱ्यांची धान खरेदी केली आहे, त्यांची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून केली आहे.

सालेकसा तालुक्यात पुन्हा घोळ

रब्बी हंगामातील धान खरेदीला यंदा केंद्र शासनाने मर्यादा घालून दिल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले असताना, केवळ १५ लाख क्विंटल धानखरेदीला मंजुरी देण्यात आली. त्यात काही धान खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांकडील धान खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आले. सालेकसा तालुक्यात हा प्रकार सर्वाधिक झाल्याची ओरड आहे. त्यामुळे या तालुक्यात धानखरेदीत पुन्हा घोळ झाल्याची चर्चा आहे.

नोंदणी केलेले शेतकरी वंचितच

रब्बी हंगामातील धानाची शासकीय धानखरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ७७ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यांपैकी केवळ २५ हजार शेतकऱ्यांकडून धानखरेदी करण्यात आली आहे, तर ५२ हजार शेतकरी अजूनही धानखरेदीपासून वंचित आहेत. मग खरेदीचे उद्दिष्ट एकाच दिवसात पूर्ण झाले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गरजू शेतकरी धानाची विक्री करण्यापासून वंचित राहिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

- विनोद अग्रवाल, आमदार

बोगस सात-बाराच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे हित साधण्याचा प्रयत्न धान केंद्र संचालकांनी केला आहे. अशा केंद्र संचालकांवर ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- सुनील मेंढे, खासदार

काही केंद्र संचालकांनी व्यापाऱ्यांशी संगनमत करून धानखरेदी केली. याची चौकशी करून संबंधित केंद्र संचालकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.

- गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्डgondiya-acगोंदिया