शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

शेतकऱ्यांना पीक कर्जफेडीस ३ महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

शासनाने पीक कर्जाची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाला सुध्दा मुकावे लागणार होते.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा पुढाकार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, शेतकऱ्यांची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा कर्जाची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे अशक्य आहे. शेतकऱ्यांची होणारी अडचण, त्यांना व्याजाचा अतिरिक्त भूर्दंड बसू नये यासाठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शासनाने पीक कर्जाची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाला सुध्दा मुकावे लागणार होते.मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २२ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी आणि जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना सुध्दा कर्जाची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे कठीण होते. तर पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ही ३१ मार्च असल्याने शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता.कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयांची समस्या लक्षात घेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) मोबाईलवरुन संयुक्तपणे चर्चा करुन पीक कर्जफेडीस ३० जूनपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. राजेंद्र जैन यांनी यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल आणि पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सुध्दा यासंदर्भात चर्चा करुन मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेतला. कर्जाची परतफेड केल्यानंतर शेतकºयांना रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या निर्देशानुसार नवीन पीक सुध्दा देण्यात येईल.तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार इतर मध्यम मुदतीच्या कर्जदारांना सुध्दा तीन हप्त्यांची सवलत देण्यात येणार आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.१११ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया ही अंत्यत सोपी असल्याने शेतकºयांना ही बँक आपली बँक वाटते.त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी याच बँकेतून पीक कर्जाची उचल करतात. खरीप हंगामात जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकºयांनी एकूण १११ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली होती. तसेच खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करण्यात राष्टÑीयकृत आणि ग्रामीण बँकाच्या तुलनेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर होती. 

जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना दिलासाकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची झालेली अडचण लक्षात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी (दि.३०) पीक कर्जाची परतफेड करण्यास ३ महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शेतकऱ्यांची चिंता दूरपीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांना त्याची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत बँकानी दिली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. वेळेत कर्जाची परफेड केली नाही तर व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागेल तसेच शासनाच्या योजनेचा सुध्दा लाभ मिळणार नाही ही चिंता मागील आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना सतावित होती. मात्र जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची ही मोठी चिंता दूर झाली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक