शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

शेतकऱ्यांना पीक कर्जफेडीस ३ महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

शासनाने पीक कर्जाची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाला सुध्दा मुकावे लागणार होते.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा पुढाकार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, शेतकऱ्यांची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा कर्जाची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे अशक्य आहे. शेतकऱ्यांची होणारी अडचण, त्यांना व्याजाचा अतिरिक्त भूर्दंड बसू नये यासाठी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शासनाने पीक कर्जाची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाला सुध्दा मुकावे लागणार होते.मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २२ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी आणि जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना सुध्दा कर्जाची रक्कम भरण्यासाठी घराबाहेर पडणे कठीण होते. तर पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ही ३१ मार्च असल्याने शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता.कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयांची समस्या लक्षात घेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) मोबाईलवरुन संयुक्तपणे चर्चा करुन पीक कर्जफेडीस ३० जूनपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. राजेंद्र जैन यांनी यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल आणि पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सुध्दा यासंदर्भात चर्चा करुन मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेतला. कर्जाची परतफेड केल्यानंतर शेतकºयांना रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या निर्देशानुसार नवीन पीक सुध्दा देण्यात येईल.तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार इतर मध्यम मुदतीच्या कर्जदारांना सुध्दा तीन हप्त्यांची सवलत देण्यात येणार आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.१११ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया ही अंत्यत सोपी असल्याने शेतकºयांना ही बँक आपली बँक वाटते.त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी याच बँकेतून पीक कर्जाची उचल करतात. खरीप हंगामात जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकºयांनी एकूण १११ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली होती. तसेच खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करण्यात राष्टÑीयकृत आणि ग्रामीण बँकाच्या तुलनेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रेसर होती. 

जिल्ह्यातील ३१ हजार शेतकऱ्यांना दिलासाकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची झालेली अडचण लक्षात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी (दि.३०) पीक कर्जाची परतफेड करण्यास ३ महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३१ हजार ६२० शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शेतकऱ्यांची चिंता दूरपीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांना त्याची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत बँकानी दिली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. वेळेत कर्जाची परफेड केली नाही तर व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागेल तसेच शासनाच्या योजनेचा सुध्दा लाभ मिळणार नाही ही चिंता मागील आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना सतावित होती. मात्र जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची ही मोठी चिंता दूर झाली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक