शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

पुन्हा २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७० कर्मचारी संपावरच; प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 17:54 IST

गोंदिया : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा यासह अन्य मागण्यांना घेऊन गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर ...

ठळक मुद्दे२९ दिवसात गोंदिया, तिराेडा आगाराला २० कोटी रुपयांचा फटका

गोंदिया : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा यासह अन्य मागण्यांना घेऊन गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर अद्यापही तोडगा न निघाल्याने एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपामुळे मागील २९ दिवसात तिरोडा आणि गोंदिया आगाराचे २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यामुळे सेवा सुरळीत झाल्यानंतरही याची झळ आगारांना सहन करावी लागणार आहे.

राज्य शासनाने एसटी कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहे. मात्र, संपकरी कामगार आपल्या मागण्यावर ठाम असून गोंदिया आगारातील एकही चालक, वाहक कामावर परतलेला नाही. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रविवारपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. याच अंतर्गत सोमवारी भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारातील २७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

आतापर्यंत १७९ जणांचे निलंबन झाले आहे. तर, ८६ अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत, तिरोडा आगारातील १, गोंदिया आगारातील ११ कामगारांचे निलंबन तर, १९ कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. गोंदिया आगारातील सर्व वाहक व चालक संपावर असल्याने आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या दररोजच्या २२३ बस फेऱ्या रद्द आहेत. परिणामी २९ दिवसात आगाराचे २० कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी दिली.

३१ ऑक्टोबरपासून सुरू आहे संप

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ३१ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. निलंबन व सेवा समाप्तीची कारवाई झाल्यानंतर तसेच वारंवार चर्चा करुनही तोडगा निघत नसल्याने शासनाने संपकरी कामगारांना पगार वाढ देऊनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. प्रवासाची कोंडी वाढली आहे. राज्यातील काही आगारातील कर्मचारी कामावर परतले, काही भागात एसटीच्या फेऱ्या चालल्या. मात्र गोंदिया आगारातील कोणताच चालक-वाहक आजही कामावर परतलेला नाही. कार्यालयील अधिकारी, कर्मचारी वगळता सर्व २७० चालक-वाहक संपावर आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर शाळा सुरु झाल्या आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापासून वंचित राहावे लागत आहे. खासगी वाहनाने दररोज प्रवास करणे शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आगारातील बसेसची संख्या

गोंदिया : ८०

तिरोडा : ४०

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनsuspensionनिलंबन