शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

२६८१८ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. वर्षातून पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचा जोर असतो. यंदा उशीरा आलेला पाऊस खूप लांबल्यामुळे हलक्या धानाचे नुकसान झाले. कापणीवर आलेले धान शेतातच असताना पावसाने दम सोडला नाही. आठ दिवसासाठी पाऊस बंद झाल्याने आता पाऊस येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटल्याने आलेले धान कापणे सुरू केले.

ठळक मुद्दे७८१ गावातील शेतकऱ्यांना फटका : १४ हजार हेक्टरमधील पीक संकटात

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीच्या पूर्वीपासूनच धान कटाईला सुरूवात होते. परंतु यंदा पावसाने थैमान घातल्याने हातात येणारे पीकही वाया गेले. अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील १३ हजार ७६७.९२ हेक्टर मधील धानपिकाचे नुकसान झाले. या नुकसानीचा फटका जिल्ह्यातील २६ हजार ८१८ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील ७८१ गावात परतीच्या पावसाचा कहर दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. वर्षातून पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचा जोर असतो. यंदा उशीरा आलेला पाऊस खूप लांबल्यामुळे हलक्या धानाचे नुकसान झाले. कापणीवर आलेले धान शेतातच असताना पावसाने दम सोडला नाही. आठ दिवसासाठी पाऊस बंद झाल्याने आता पाऊस येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटल्याने आलेले धान कापणे सुरू केले. परंतु वातावरणाच्या बिघाडामुळे परतीच्या पावसाने झोडपले व त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पाण्यात सापडले. जिल्ह्यातील ७८१ गावांतील २६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयार केला आहे.जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार ९.६० हेक्टर क्षेत्रात धान पीक लावण्यात आले आहे. त्यातील १३ हजार ७६७.९२ टक्के धानाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान असलेल्या १५ हजार १०७ शेतकऱ्यांचे सात हजार ८४९.५२ हेक्टर धान पीकाचे नुकसान झाले. तर ३३ टक्क्यापेक्षा अधिक ११ हजार ७११ शेतकऱ्यांचे पाच हजार ९१८.४० हेक्टर धानपीकाचे नुकसान झाले. सर्वात जास्त नुकसान तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले. नुकसानग्रस्त असलेल्या शेतकºयांच्या संख्येत गोंदिया तालुक्यात २९८७, तिरोडा तालुक्यात ५६७५, आमगाव तालुक्यात ४५३६, सालेकसा तालुक्यात १३८६, देवरी तालुक्यात ९८७, गोरेगाव तालुक्यात ४६३९, सडक-अर्जुनी तालुक्यात २२१८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४३९० असे एकूण २६ हजार ८१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गीक आपदेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.७२८६ शेतकºयांचे पंचनामे अद्याप झाले नाहीपाऊस आला व कापणी झालेल्या कळपा पाण्यात गेल्या. यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील १५ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाला पोहचता आले असून उर्वरीत सात हजार २८६ शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी पोहचले नाहीत. गोंदिया तालुक्यातील १०६६, आमगाव तालुक्यातील २६२, सालेकसा तालुक्यातील १६०, देवरी तालुक्यातील ७११, गोरेगाव तालुक्यातील १२८०, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९२३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २८८४ अशा सात तालुक्यातील सात हजार २८६ शेतकऱ्यांच्या धानाचे अद्याप पंचनामे झाले नाहीत.३७५१ शेतकऱ्यांनीच काढला विमाअवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकºयांची संख्या २६ हजार ८१६ आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यातील फक्त तीन हजार ७५१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. गोंदिया जिल्ह्यात ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. परंतु ज्या २६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची चौकशी केली असता पीक विमा करणारे तीन हजार ७५१ शेतकरी आढळले. पीक विमा घेणाऱ्या तीन हजार ७५१ शेतकºयांचे नुकसान झालेले क्षेत्र एक हजार १६१.०५ हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

टॅग्स :Rainपाऊस