शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

धापेवाडा उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:32 IST

धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरीता लागणारा २०० कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन दिला जाईल. यापैकी १०० कोटी रुपये त्वरीत तर उर्वरित १०० कोटी रुपये आधीचा निधी खर्च होण्यापूर्वी उपलब्ध करुन दिला जाईल.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : तिरोडा येथील कार्यक्रमात घोषणा, प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन योजनेकरीता लागणारा २०० कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन दिला जाईल. यापैकी १०० कोटी रुपये त्वरीत तर उर्वरित १०० कोटी रुपये आधीचा निधी खर्च होण्यापूर्वी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यामुळे अल्पावधीतच ही योजना पूर्ण होणार आहे. याच योजनेचा दुसरा टप्पा असून त्यामुळे ९१ हजार हेक्टर जमिन सिंचनखाली येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी सुखी आणि समृध्द होतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.तिरोडा क्षेत्रातील विविध सिंचन प्रकल्पाच्या कामांचा भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी (दि.२३) येथील जिल्हा परिषद कन्या विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, न.प.उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, न.प.मुख्याधिकारी विजय देशमुख, मुख्य कार्यपालन अधिकारी राजा दयानिधी, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ता बाळूभाऊ मलघाटे उपस्थितीत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील साडेचार वर्षात शेतकऱ्यांना ५० हजार कोटीची मदत शासनाने केली आहे. तर यावर्षी ७ हजार कोटी रुपये शेतकºयांना मदतीसाठी दिले आहे. शासनाने शेततकºयांचा माल हमीभावाने खरेदी केला.तिरोडा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तरी चिंता करण्याचे कारण नाही. शेवटच्या शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. हे सरकार गरीबांचे सरकार आहे. गेल्या ६५ वर्षात ५ हजार किलोमीटर रस्ते झाले तर मागील चार वर्षात २० हजार किमी राष्ट्रीय रस्ते, पीडब्ल्यूडी महामार्ग १०,००० किमी व गाव रस्ते २०००० किमी असे पन्नास हजार किमीचे रस्ते पूर्ण करुन गाव-शहर-देशाला जोडले गेले आहे. यासाठी गडकरी साहेबांचे आपण आभार मानले पाहिजे. मी मागे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या विकासासाठी ओरडत होतो. पण निधी मिळत नव्हता. विदर्भाच्या हिश्याचे विदर्भाला कधीच मिळत नव्हते. ते आम्ही परत आणले. गेल्या ५० वर्षात जेवढा निधी विदर्भाला मिळाला नाही त्याहीपेक्षा जास्त निधी विदर्भासाठी मिळाला असल्याचे सांगितले. तिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे काम त्वरीत पूर्ण करुन या परिसरातील शेतकºयांची सिंचनाची समस्या मार्गी लावण्यात येईल. प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडणार याची पूर्णपणे आपण काळजी घेवू. धापेवाडा सारखेच राज्यातील इतरही सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नितीन गडकरी म्हणाले, पुढील मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णत: स्वच्छ होणार आहे. २६ हजार कोटी रुपये यासाठी खर्च होत आहेत. रस्ते निर्माण करताना त्यासाठी लागणारी माती, मुरुम हे मामा तलाव, शेततळे, नाल्या,नदी खोलीकरण, रूंदीकरण यातून घेतल्यास पाणी साठवण जास्त होईल.कॅनलऐवजी पाईप लाईनचा वापर होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही. महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्न सुटला तर ७५ टक्के प्रश्नच सुटतील. प्रधानमंत्री सिंचन प्रकल्प २६ मंजूर करुन २५ टक्के भारत सरकार व ७५ टक्के नाबार्डचे कर्ज यातून पूर्ण होणार आहेत. परिसरातील सिंचन प्रकल्प मार्गी लागल्यास शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार नाही. त्यादृष्टीने काम सुरु असल्याचे सांगितले. रस्ते, सिंचन यांना प्राध्यान दिले जात असल्याचे ते म्हणाले. आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून रस्ते आणि सिंचनासाठी निधी व कामे केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस