नैसर्गिक आपत्तीमुळे १५१४ घरांची पडझड

By Admin | Updated: June 18, 2016 01:10 IST2016-06-18T01:10:27+5:302016-06-18T01:10:27+5:30

तालुक्यात झालेल्या वादळाने ५ जून रोजी १७८ घराचे नुकसान झाले. त्यातच ११ गावातील ४९ घरांचे नुकसानग्रस्तांंना ६३ हजार ९०० रुपये निधी वाटप करण्यात आले.

1514 homes collapse due to natural calamities | नैसर्गिक आपत्तीमुळे १५१४ घरांची पडझड

नैसर्गिक आपत्तीमुळे १५१४ घरांची पडझड

महाराजस्व अभियान : शिबिरात अनेक शासकीय योजनांचा आढावा
आमगाव : तालुक्यात झालेल्या वादळाने ५ जून रोजी १७८ घराचे नुकसान झाले. त्यातच ११ गावातील ४९ घरांचे नुकसानग्रस्तांंना ६३ हजार ९०० रुपये निधी वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे आमगाव तालुक्यातील १ हजार ५१४ घरांची पडझड झाली. त्यांच्यासाठी ३० लाख ७० हजार ५०० रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली अशी माहिती तहसीलदार एस.टी. राठोड यांनी दिली.
तहसील कार्यालय आमगावच्या वतीने महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपवनसंरक्षक रामगावकर, जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, नायब तहसीलदार एस.जी.पवार, जि.प. सदस्य जियालाल पंधरे, एस.एच. कटरे, पं.स. सभापती व उपसभापती उपस्थित होते. यावेळी तहसीलदार एस.टी. पवार यांनी शासनाच्या योजनांचा सविस्तर आकडेसहीत गोषवारा सादर केला. उद्घाटनाप्रसंगी आ. संजय पुराम यांनी शासकीय योजनाचा सर्वसामान्य जनतेपर्यंत लाभ मिळावा याकरिता प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जागृक ठेवून तत्परतेने काम करावे. कोणत्याच कामात हलगर्जी नको. पारदर्शकता ठेवून गोरगरिबाना शासकीय योजनाचा लाभ द्यावा. तहसीलदार एस.टी. पवार यांनी सन २०१५-१६ मध्ये तीन दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३८९० दाखले वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एकूण लाभार्थी ७३११ आहेत. त्यांना मे पर्यंत अनुदान वाटप करण्यात आले. आता नवीन २७४ अर्जापैकी २४० अर्ज मंजूर करण्यात आले. २१ मे रोजी भिंत पडून मृत्यू झालेले सीताराम राखडे याना आ. संजय पुराम यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश वाटप करण्यात आले.
जनावरे दगावली अशा व्यक्तींना धनादेश आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ८०८० कार्डधारक आहेत. त्यांना दरमहा ८०८ क्विंटल गहू व २०२० क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येतो. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ५२ हजार ४६१ लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा १०४९ क्विंटल गहू व १५७३ क्विंटल तांदूळ वाटप केले जाते, अशीही माहिती तहसीलदार एस.टी. राठोड यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 1514 homes collapse due to natural calamities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.