शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

१५ टक्के बालक मजुरीवर आश्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:54 IST

मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही.

ठळक मुद्देग्रामीण भागातील विदारक सत्य : शाळेपेक्षा कामाला महत्त्व

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही. याबद्दल तालुक्यातील विविध भागात संपर्क करीत माहिती घेताना असे दिसले की तालुक्यातील ग्रामीण भागासह मुख्यालयाच्या परिसरातील सुमारे १५ टक्के विद्यार्थी किंवा बालक असे असतात की आजही त्यांच्यावर दारिद्र्य कोट्याचा मार बसत असतो. एकंदरित परिस्थिती अशी निर्माण होते की, त्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी तसेच आई-वडीलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी अर्थार्जन करण्याच्या मार्गावर पाऊल टाकावे लागते. परिणामी बाल मजुरीशिवाय दुसरा विकल्प त्यांच्याकडे उरत नाही.शहरी क्षेत्रात सामान्यत: हॉटेल, जनरल स्टोर्स, चहाटपरी, आॅटो रिपेरिंग सेंटर, इमारत बांधकाम इत्यादी ठिकाणी बाल कामगार बघावयास मिळू शकतात. तसेच कायद्याच्या सक्तीमुळे शहरी भागात काही ठिकाणी बाल कामगारांची संख्या घटली तरी ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात बाल कामगार आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात आजही सायकल दुरुस्ती, जनरल स्टोर्स, वीटभट्टी, खड्डे खोदकाम, हॉटेल, घर बांधकाम, हमाल काम इत्यादी क्षेत्रात नेहमी कमी वयाचे बालक परिश्रम करताना दिसून येतात. या शिवाय काही कामे हंगामी स्वरुपाची असून एवढ्या रकमेत इतके काम करुन द्यायचे असे सुद्धा बाल कामागार बघावयास मिळतात.शेतीच्या कामातसगळेच उपयोगीग्रामीण भागात सर्वात जास्त परिश्रम करण्याचे क्षेत्र म्हणजे शेती असून या कामात बालमजुरी विरोधक कायदा कधीच उपयोगी पडू शकत नाही. कारण की शेतीच्या कामात अंड्यातल्या पिल्यापासून काठी टेकून चालणारे वृद्धही आपापली भूमिका बजावत हातभार लावतात. आईच्या गर्भात राहिल्यापासून बालक शेतीच्या कामावर जात असतो. अर्थात गर्भस्त स्त्री आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत शेतकरी पती सोबत कामावर जाते. बाळ जन्माला आल्यापासून १५ वर्षाच्या वयापर्यंत शेतीच्या कामात त्याची घरी आणि शेतात कामाची भूमिका असते.शेतातील रोवणी व कापणी सारख्या महत्वाच्या कामाच्या वेळी घरातील मोठे व कमवते लोक दिवसभर शेतात राबत असताना लहान मुले-मुली घरकाम ते शेतीकाम करण्यात सतत उपयोगी पडतात.बाल मजुरी करणारी मुले कोणती?ग्रामीण भागासह शहरी भागाचा विचार करता माहिती गोळा करताना असे दिसून आले की, बाल मजुरी करण्यास बाध्य होणारी बालके ही जास्त करुन वडील हयात नसलेले, आइ-वडील दोन्ही नसलेले, सावत्री आई असलेले, दिवसभर मजुरी करणारे आई-वडील असलेले, निरक्षर आई-वडीलांची मुले, स्थलांतरीत कुटुंबातील मुले, मादक पदार्थांच्या नेशत अडकणारी मुले, आई-वडील कमाविण्यासाठी शहरात गेले आणि मुलांना घरी एकटे सोडून गेल्यावर त्याच बरोबर मुलांकडे लक्ष न घालणारे, नशेच्या धुंदीत राहणारे वडील किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींपासून त्रस्त बालक मजुरी करुन आपल्या गरजा भागविण्यासाठी किंवा मादक पदार्थाचे सेवन करण्यासाठी धडपड करीत असतात. परंतु शिक्षण घेणारे विद्यार्थी व बालके असेही असतात की ते आई-वडीलांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून काम आणि शिक्षण यासाठी वेळेचे नियोजन करुन स्वखर्चाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मजुरी करतात. एवढेच नाही तर आई-वडिलांना सुद्धा त्यातून थोडेफार पैशांचे सहकार्य करतात. मजुरी करीत आपल्या गरजा पूर्ण करणाºया बालकांची संख्या भविष्यात कमी होण्यात किती काळ लागेल याचा भविष्यातच पत्ता लागेल.