शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

१५ टक्के बालक मजुरीवर आश्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:54 IST

मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही.

ठळक मुद्देग्रामीण भागातील विदारक सत्य : शाळेपेक्षा कामाला महत्त्व

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील अनेक वर्षांपासून शासनातर्फे शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून यात बऱ्याच प्रमाणात शासनाला यश आले आहे. तरी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच १० ते १५ टक्के विद्यार्थी असे असतात की ते एक तर शाळा सोडतात किंवा शाळेत नियमित हजर राहत नाही. याबद्दल तालुक्यातील विविध भागात संपर्क करीत माहिती घेताना असे दिसले की तालुक्यातील ग्रामीण भागासह मुख्यालयाच्या परिसरातील सुमारे १५ टक्के विद्यार्थी किंवा बालक असे असतात की आजही त्यांच्यावर दारिद्र्य कोट्याचा मार बसत असतो. एकंदरित परिस्थिती अशी निर्माण होते की, त्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी तसेच आई-वडीलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी अर्थार्जन करण्याच्या मार्गावर पाऊल टाकावे लागते. परिणामी बाल मजुरीशिवाय दुसरा विकल्प त्यांच्याकडे उरत नाही.शहरी क्षेत्रात सामान्यत: हॉटेल, जनरल स्टोर्स, चहाटपरी, आॅटो रिपेरिंग सेंटर, इमारत बांधकाम इत्यादी ठिकाणी बाल कामगार बघावयास मिळू शकतात. तसेच कायद्याच्या सक्तीमुळे शहरी भागात काही ठिकाणी बाल कामगारांची संख्या घटली तरी ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात बाल कामगार आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात आजही सायकल दुरुस्ती, जनरल स्टोर्स, वीटभट्टी, खड्डे खोदकाम, हॉटेल, घर बांधकाम, हमाल काम इत्यादी क्षेत्रात नेहमी कमी वयाचे बालक परिश्रम करताना दिसून येतात. या शिवाय काही कामे हंगामी स्वरुपाची असून एवढ्या रकमेत इतके काम करुन द्यायचे असे सुद्धा बाल कामागार बघावयास मिळतात.शेतीच्या कामातसगळेच उपयोगीग्रामीण भागात सर्वात जास्त परिश्रम करण्याचे क्षेत्र म्हणजे शेती असून या कामात बालमजुरी विरोधक कायदा कधीच उपयोगी पडू शकत नाही. कारण की शेतीच्या कामात अंड्यातल्या पिल्यापासून काठी टेकून चालणारे वृद्धही आपापली भूमिका बजावत हातभार लावतात. आईच्या गर्भात राहिल्यापासून बालक शेतीच्या कामावर जात असतो. अर्थात गर्भस्त स्त्री आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत शेतकरी पती सोबत कामावर जाते. बाळ जन्माला आल्यापासून १५ वर्षाच्या वयापर्यंत शेतीच्या कामात त्याची घरी आणि शेतात कामाची भूमिका असते.शेतातील रोवणी व कापणी सारख्या महत्वाच्या कामाच्या वेळी घरातील मोठे व कमवते लोक दिवसभर शेतात राबत असताना लहान मुले-मुली घरकाम ते शेतीकाम करण्यात सतत उपयोगी पडतात.बाल मजुरी करणारी मुले कोणती?ग्रामीण भागासह शहरी भागाचा विचार करता माहिती गोळा करताना असे दिसून आले की, बाल मजुरी करण्यास बाध्य होणारी बालके ही जास्त करुन वडील हयात नसलेले, आइ-वडील दोन्ही नसलेले, सावत्री आई असलेले, दिवसभर मजुरी करणारे आई-वडील असलेले, निरक्षर आई-वडीलांची मुले, स्थलांतरीत कुटुंबातील मुले, मादक पदार्थांच्या नेशत अडकणारी मुले, आई-वडील कमाविण्यासाठी शहरात गेले आणि मुलांना घरी एकटे सोडून गेल्यावर त्याच बरोबर मुलांकडे लक्ष न घालणारे, नशेच्या धुंदीत राहणारे वडील किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींपासून त्रस्त बालक मजुरी करुन आपल्या गरजा भागविण्यासाठी किंवा मादक पदार्थाचे सेवन करण्यासाठी धडपड करीत असतात. परंतु शिक्षण घेणारे विद्यार्थी व बालके असेही असतात की ते आई-वडीलांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून काम आणि शिक्षण यासाठी वेळेचे नियोजन करुन स्वखर्चाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मजुरी करतात. एवढेच नाही तर आई-वडिलांना सुद्धा त्यातून थोडेफार पैशांचे सहकार्य करतात. मजुरी करीत आपल्या गरजा पूर्ण करणाºया बालकांची संख्या भविष्यात कमी होण्यात किती काळ लागेल याचा भविष्यातच पत्ता लागेल.