शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

गोव्याच्या गेल्या दहा वर्षांतील विकासाचा मी साक्षीदार: किरेन रिजिजू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 13:20 IST

अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त, कृषीक्षेत्राला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गोव्याचा विकास कसा झपाट्याने झाला, याचा मी साक्षीदार आहे. कारण मी दहा वर्षांपूर्वीही अनेकदा गोव्यात येत होतो, असे केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. गोव्यात काँग्रेसचे सरकार असते, तर गोवा अविकसितच राहिला असता असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यास गोव्यात आले होते. भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपण गोव्यात अनेकवेळा येऊन गेलो आहे. अगदी लहान मुलगा होतो, तेव्हाही गोव्यात येत होतो. मंत्री बनल्यावर सातत्याने येत आहे. त्यामुळे गोव्याचा विकास मी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. गोव्यात साधनसुविधांचा झालेला विकास हा गोव्यातील भाजप सरकारच्या आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाला आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः गोव्यातील महामार्ग व पुलांचा उल्लेख त्यांनी केला.

काय म्हणाले रिजिजू?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पा- बद्दल बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पाचा गोव्याला मोठा फायदा होणार आहे. मच्छीमारी उद्योग उभारी घेणार आहे. मच्छीमारी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद फार दिलासादायक आहे, असे ते म्हणाले. गोव्याचे क्षेत्रफळ लहान असल्याचे लक्षात घेता गोव्यातील कृषिक्षेत्राला काय हवे आहे, याचा विचार करून केंद्र सरकारने योजना बनविलेल्या आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त साहाय्य देण्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण