शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

गोव्याच्या गेल्या दहा वर्षांतील विकासाचा मी साक्षीदार: किरेन रिजिजू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 13:20 IST

अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त, कृषीक्षेत्राला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गोव्याचा विकास कसा झपाट्याने झाला, याचा मी साक्षीदार आहे. कारण मी दहा वर्षांपूर्वीही अनेकदा गोव्यात येत होतो, असे केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. गोव्यात काँग्रेसचे सरकार असते, तर गोवा अविकसितच राहिला असता असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यास गोव्यात आले होते. भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपण गोव्यात अनेकवेळा येऊन गेलो आहे. अगदी लहान मुलगा होतो, तेव्हाही गोव्यात येत होतो. मंत्री बनल्यावर सातत्याने येत आहे. त्यामुळे गोव्याचा विकास मी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. गोव्यात साधनसुविधांचा झालेला विकास हा गोव्यातील भाजप सरकारच्या आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झाला आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः गोव्यातील महामार्ग व पुलांचा उल्लेख त्यांनी केला.

काय म्हणाले रिजिजू?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पा- बद्दल बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पाचा गोव्याला मोठा फायदा होणार आहे. मच्छीमारी उद्योग उभारी घेणार आहे. मच्छीमारी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद फार दिलासादायक आहे, असे ते म्हणाले. गोव्याचे क्षेत्रफळ लहान असल्याचे लक्षात घेता गोव्यातील कृषिक्षेत्राला काय हवे आहे, याचा विचार करून केंद्र सरकारने योजना बनविलेल्या आहेत. शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त साहाय्य देण्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण