शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाका! बेतूल किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 11:54 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल- केपे येथील किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क केपे : पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत. आता नव्याने गोव्याची उभारणी करण्यासाठी पोर्तुगीज राजवटीच्या गोव्यातील सर्व खाणाखुणा पुसून टाका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल- केपे येथील किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आम्ही वसाहतीवादाचे अवशेष नष्ट करून नवीन गोवा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. किल्ल्याचा नमुना तयार करण्यासाठी बेतूल येथील अडीच हजार चौरस मीटर जमीन कस्टम विभागाकडून पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केली जाईल. किल्ल्याला पुरातत्व असे महत्त्वाचे स्मारक म्हणून अधिसूचित केले जाईल, असेही ते म्हणाले.

या सोहळ्याला पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विकसित गोव्यासाठी एकत्र या

पोर्तुगीजांनी केलेल्या खाणाखुणा पुसून परत एकदा आपली संस्कृती जिवंत करण्याची वेळ आली आहे. एकीकडे आम्ही 'आजादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत तर दुसरीकडे आपल्या राज्याचा साठावा मुक्तीदिन. विकसित भारत आणि विकसित गोवा याला बळ देण्यासाठी एकत्र येऊया. ज्यावेळी भारत देशाला शंभर वर्षे पूर्ण होणार तेव्हा गोमंत प्रदेश कसा असणार? याची उभारणी आपण आतापासूनच केली पाहिजे. त्यासाठी आपली मूळ संस्कृती समोर आणली पाहिजे. यासाठी पोर्तुगिजांच्या राजवटीतील खाणाखुणा आता पुसून टाकण्याची वेळ आल्याचा पुरुच्चार मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

आमदार डिकॉस्टा म्हणाले, की या ठिकाणी सर्व भेद विसरून आपण सर्व शिवप्रेमी म्हणून एकत्र आलो आहोत. या किल्ल्याचे महत्त्व आपण जपले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही अल्टन यांच्या सुरात सूर मिळविताना सांगितले की किल्ल्याचे महत्त्व आणि किल्लाही राखला जाईल. या ठिकाणी एक हॉटेल बांधण्याचे प्रयत्नही मागे सुरु होते. ते सरकार कधीही होऊ देणार नाही असे ते म्हणाले.  

टॅग्स :goaगोवाShivrajyabhishekशिवराज्याभिषेकPramod Sawantप्रमोद सावंत