शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाका! बेतूल किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 11:54 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल- केपे येथील किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क केपे : पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत. आता नव्याने गोव्याची उभारणी करण्यासाठी पोर्तुगीज राजवटीच्या गोव्यातील सर्व खाणाखुणा पुसून टाका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल- केपे येथील किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आम्ही वसाहतीवादाचे अवशेष नष्ट करून नवीन गोवा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. किल्ल्याचा नमुना तयार करण्यासाठी बेतूल येथील अडीच हजार चौरस मीटर जमीन कस्टम विभागाकडून पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केली जाईल. किल्ल्याला पुरातत्व असे महत्त्वाचे स्मारक म्हणून अधिसूचित केले जाईल, असेही ते म्हणाले.

या सोहळ्याला पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विकसित गोव्यासाठी एकत्र या

पोर्तुगीजांनी केलेल्या खाणाखुणा पुसून परत एकदा आपली संस्कृती जिवंत करण्याची वेळ आली आहे. एकीकडे आम्ही 'आजादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत तर दुसरीकडे आपल्या राज्याचा साठावा मुक्तीदिन. विकसित भारत आणि विकसित गोवा याला बळ देण्यासाठी एकत्र येऊया. ज्यावेळी भारत देशाला शंभर वर्षे पूर्ण होणार तेव्हा गोमंत प्रदेश कसा असणार? याची उभारणी आपण आतापासूनच केली पाहिजे. त्यासाठी आपली मूळ संस्कृती समोर आणली पाहिजे. यासाठी पोर्तुगिजांच्या राजवटीतील खाणाखुणा आता पुसून टाकण्याची वेळ आल्याचा पुरुच्चार मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

आमदार डिकॉस्टा म्हणाले, की या ठिकाणी सर्व भेद विसरून आपण सर्व शिवप्रेमी म्हणून एकत्र आलो आहोत. या किल्ल्याचे महत्त्व आपण जपले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही अल्टन यांच्या सुरात सूर मिळविताना सांगितले की किल्ल्याचे महत्त्व आणि किल्लाही राखला जाईल. या ठिकाणी एक हॉटेल बांधण्याचे प्रयत्नही मागे सुरु होते. ते सरकार कधीही होऊ देणार नाही असे ते म्हणाले.  

टॅग्स :goaगोवाShivrajyabhishekशिवराज्याभिषेकPramod Sawantप्रमोद सावंत