शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

बदललेल्या वातावरणामुळे हिवाळा लांबणीवर पडण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 8:16 PM

पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. 

पणजी - पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. एकूणच ऋतुचक्रातच आमुलाग्र बदल व्हावा अशी परिस्थिती असून, वेळेवर मान्सुनचे आगमन, वेळेवर मान्सूनचे परतणे आणि वेळेवर देशातून हटणे या गोष्टी तर अलिकडील ८ वर्षांत झालेल्या नाहीत. वेळ चुकणे आणि तोही एक दोन दिवसांनी नव्हे तर तब्बल २० ते २५ दिवसांचा फरक पडतो आहे. विशेष करून परतीच्या मान्सूनच्या बाबतीत हा विलंब अधिकच होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे. पावसाच्या उशिरा आगमनामुळे परतणे उशिरा होते. उशिरा परतल्यामुळे गोव्यात उशिरा पोहोचतो आणि  संपूर्ण हटणेही उशिरा होते.  १ जूनला होणारे पावसाचे आगमन ८ जून नंतर होत आहे आणि १ सप्टेंबरला राजस्थानहून परतणारा पाऊस आता १५ सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू करतो. गोव्यातही उशिरा पोहोचतो आणि देशातून पूर्णपणे हटण्यासाठीही विलंब लागतो. त्यामुळे आॅक्टोबर महिना संपायला आला तरी हिंवाळा लागल्याच्या खाणाखुणाही दिसत नाहीत. हे सर्व  मान्सून पुढे सरकल्यामुळे होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे.

परतीचा पाऊस महाराष्ट्रातच महाराष्ट्रात दाखल झालेला परतीचा पाऊस अद्याप गोव्यात पोहोचला नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.  १५ आॅक्टोबर रोजी परतीचा पाऊस महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर व पश्चीम भागात पोहोचला होता. तसेच १६ ते २० आॅक्टोबरपर्यंत तो आणखी दक्षीणेला सरकून पूर्वेला तेलंगणा व इतर भागापर्यंत पोहोचला होता. गोव्यात पोहोचण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील अशी अपेक्षा आहे. मात्र या बाबत हवामान खाते काहीच अंदाज वर्तवित नाही. हवामान खात्याकडून केवळ परतीच्या पावसाच्या सामान्य तारखा आणि प्रत्यक्ष परतीचा पाऊस दाखल झालेल्या तारखा दिल्या जात. गोव्यात सामान्य तारीख आहे १ आॅक्टोबर.

टॅग्स :goaगोवाIndiaभारतNatureनिसर्ग