शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'आम आदमी'चे गोवा प्रमुख का सोडतात पक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:49 IST

जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप'च्या मतांमध्ये झालेली घट ही पक्षासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर, कार्यकारी निमंत्रक कृष्णा परब यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. 'आप'चे प्रमुख सातत्याने पक्ष का सोडत आहेत? पालेकर यांच्या राजीनाम्यामुळे गोव्यातील 'आप'मध्ये चौथ्यांदा वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पक्ष सोडल्याची नोंद झाली आहे.

यापूर्वी 'आप'चे निमंत्रक असलेले एल्विस गोम्स यांनी वैचारिक मतभेदांचा हवाला देत पक्ष सोडला होता. त्यानंतर राहुल म्हांब्रे यांच्याकडे निमंत्रकपदाची जबाबदारी देण्यात आली; मात्र काही काळातच त्यांनीही अंतर्गत मतभेद आणि असहमतीमुळे पदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी प्तिमा कुतिन्हो यांनीही अल्पावधीतच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता पालेकर यांच्या राजीनाम्यामुळे नेतृत्वातील अस्थिरता पुन्हा समोर आली आहे.

प्रत्येक राजीनाम्यामागे वेगवेगळी कारणे पुढे आली असली, तरी त्यामागे पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धतीबाबत असलेली नाराजी दिसून येते. एल्विस यांनी पक्षातील निर्णय प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचा आरोप केला होता. म्हांब्रे यांनी मतभेदांमुळे पद सोडल्याचे सांगितले. पालेकर यांनी मात्र आपल्याला पदावरून हटविण्याची पद्धत अस्वीकारार्ह असल्याचे नमूद करत, पक्षात मतभिन्नतेला पुरेसा वाव दिला जात नसल्याचा आरोप केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस बरोबर युती करण्याचे आपले मत होते असे ते म्हणाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'आप'ची गोव्यातील राजकीय रणनीतीही प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेषतः कांग्रेसचा मतदार आपल्याकडे वळविण्याचा पक्षाचा प्रयत्न अपेक्षित यश मिळवू शकलेला नाही, असे दिसून येते.

मतांमधील घट ठरली चिंतेची बाब

जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप'च्या मतांमध्ये झालेली घट ही पक्षासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. या निवडणूक निकालांनी 'आप'च्या वाढीबाबत असलेले दावे वास्तवाच्या कसोटीवर उतरले नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, नेतृत्वातील सतत होणारे बदल, अंतर्गत मतभेद आणि स्पष्ट दिशेअभावी पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत होत आहे. निमंत्रक बदलत राहणे हे केवळ व्यक्तीगत कारणांपुरते मर्यादित नसून, पक्षाच्या निर्णयप्रणाली आणि कार्यसंस्कृतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे. गोव्यात स्वतःला एक सक्षम पर्याय म्हणून उभे करण्याचा 'आप'चा प्रयत्न सुरू असताना, वारंवार होणारे निमंत्रकांचे राजीनामे आणि घटती मते पक्षासमोर मोठे आव्हान उभे करत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Why are 'AAP' Goa leaders resigning? Instability questions party strategy.

Web Summary : Goa's 'AAP' faces leadership instability as key leaders resign, questioning the party's strategy. Internal conflicts and differing opinions on decision-making are cited. Declining vote share adds to the challenges in establishing a strong alternative.
टॅग्स :goaगोवाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआप