शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
5
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
6
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
7
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
8
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
9
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
10
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
11
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
12
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
13
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
14
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
15
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
16
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
17
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
18
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
19
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
20
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोवा के अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 12:52 IST

माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

- सुरेश गुदले पणजी - माझ्या गोव्याच भूमीत...गड्या नारळ दुधाचे....असे गोव्याचे वर्णन बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांंनी केले. तो गोवा आता राहिलेला नाही, जसे की कृष्णेकाठी कुं डल आता पहिले उरले नाही... त्यामुळे गोवा सोडून जावेसे वाटते, कारण गोवा पूर्वीसारखा राहिला नाही... गोवा हरवला...अशा आशयाचे एक गाणे पॉपस्टार रेमो फर्नांडीस यांनी गायले. झाले, यावरून कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी रेमो निराशावादी आहेत, त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे असे बोधामृत पाजलेले आहे. कलावंत गातो आणि राजसत्ता कसे गायचे ते शिकवते...मागील पानावरून पुढे चालूच आहे.कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी जगभर चिंतानजक स्थिती असल्याचे पुण्यात नुकत्याच झालेल्या पेनच्या अधिवेशनातही सामोरे आले. गोवा तर धर्मवाद्यांची गढी. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन केलेला आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण यांचे हित जपण्याची या पक्षाची टॅगलाईन होती. होती एवढ्याचसाठी की सध्या मायक्रोस्कोप घेऊन शोधले तरी या पक्षाच्या वाटचालीत ती सापडणार नाही. तांदूळ, मासे, पाव, नारळ यांसारखे गोवेकरांच्या दैनंदिन भोजनातील पदार्थ स्वस्त देण्याची घोषणा या पक्षाने निवडणुकीपूर्वी हवेत फेकून दिलेली होती. तीही मायक्रोस्कोपखाली सापडत नाही.गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण जपण्याची भावुक साद या पक्षाने घातलेली होती आणि पॉपस्टार रेमोने त्याची गाण्यातून नेमकी खिल्ली उडवलेली आहे. रेमो निराशावादी भाटकार (जमिनदार) आहेत. त्यांना असे वागणे शोभत नाही, असे या मंत्र्यांचे म्हणणे. सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर एकवेळ समजता येते पण रेमोची स्थिती अशी नाही, असा वकिली युक्तीवाद ते मांडतात.खरे तर कलावतांने तळागाळातल्याचा आवाज व्हायचे असते हेच मंत्रीमहोदय विसरताहेत आणि समष्टीऐवजी व्यक्तीवर येऊन थांबतात. यांचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नोकरभरतीची फाईल घेऊन दवाखान्यात बसलेले आहेत, असे यांच्याच सरकारमधील उपसभापती मायकल लोबो जाहीर म्हणतात. त्यामुळे तीन हजार सरकारी नोकरीभरती रखडलेली आहे असा लोबोंचा आरोप आहे. आणि मंत्री सरदेसाई म्हणतात, सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर समजता येते. समजता येते मंत्र्याची धन्य ती समज.खाणींनी गोव्याची वाट लावली. गोव्यातील जल, जंगल आणि जमिनीची वाट लावली जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली गोवा म्हणजे बीच, बेबीज आणि बॉटल्स असे समीकरण घट्ट केलेली सर्व काळ््या धंद्याची समांतर व्यवस्था व्यवस्था आकाराला आलेली आहे. त्यामुळे माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण