शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा के अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 12:52 IST

माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

- सुरेश गुदले पणजी - माझ्या गोव्याच भूमीत...गड्या नारळ दुधाचे....असे गोव्याचे वर्णन बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांंनी केले. तो गोवा आता राहिलेला नाही, जसे की कृष्णेकाठी कुं डल आता पहिले उरले नाही... त्यामुळे गोवा सोडून जावेसे वाटते, कारण गोवा पूर्वीसारखा राहिला नाही... गोवा हरवला...अशा आशयाचे एक गाणे पॉपस्टार रेमो फर्नांडीस यांनी गायले. झाले, यावरून कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी रेमो निराशावादी आहेत, त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे असे बोधामृत पाजलेले आहे. कलावंत गातो आणि राजसत्ता कसे गायचे ते शिकवते...मागील पानावरून पुढे चालूच आहे.कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी जगभर चिंतानजक स्थिती असल्याचे पुण्यात नुकत्याच झालेल्या पेनच्या अधिवेशनातही सामोरे आले. गोवा तर धर्मवाद्यांची गढी. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन केलेला आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण यांचे हित जपण्याची या पक्षाची टॅगलाईन होती. होती एवढ्याचसाठी की सध्या मायक्रोस्कोप घेऊन शोधले तरी या पक्षाच्या वाटचालीत ती सापडणार नाही. तांदूळ, मासे, पाव, नारळ यांसारखे गोवेकरांच्या दैनंदिन भोजनातील पदार्थ स्वस्त देण्याची घोषणा या पक्षाने निवडणुकीपूर्वी हवेत फेकून दिलेली होती. तीही मायक्रोस्कोपखाली सापडत नाही.गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण जपण्याची भावुक साद या पक्षाने घातलेली होती आणि पॉपस्टार रेमोने त्याची गाण्यातून नेमकी खिल्ली उडवलेली आहे. रेमो निराशावादी भाटकार (जमिनदार) आहेत. त्यांना असे वागणे शोभत नाही, असे या मंत्र्यांचे म्हणणे. सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर एकवेळ समजता येते पण रेमोची स्थिती अशी नाही, असा वकिली युक्तीवाद ते मांडतात.खरे तर कलावतांने तळागाळातल्याचा आवाज व्हायचे असते हेच मंत्रीमहोदय विसरताहेत आणि समष्टीऐवजी व्यक्तीवर येऊन थांबतात. यांचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नोकरभरतीची फाईल घेऊन दवाखान्यात बसलेले आहेत, असे यांच्याच सरकारमधील उपसभापती मायकल लोबो जाहीर म्हणतात. त्यामुळे तीन हजार सरकारी नोकरीभरती रखडलेली आहे असा लोबोंचा आरोप आहे. आणि मंत्री सरदेसाई म्हणतात, सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर समजता येते. समजता येते मंत्र्याची धन्य ती समज.खाणींनी गोव्याची वाट लावली. गोव्यातील जल, जंगल आणि जमिनीची वाट लावली जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली गोवा म्हणजे बीच, बेबीज आणि बॉटल्स असे समीकरण घट्ट केलेली सर्व काळ््या धंद्याची समांतर व्यवस्था व्यवस्था आकाराला आलेली आहे. त्यामुळे माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण