शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

गोवा के अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 12:52 IST

माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

- सुरेश गुदले पणजी - माझ्या गोव्याच भूमीत...गड्या नारळ दुधाचे....असे गोव्याचे वर्णन बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांंनी केले. तो गोवा आता राहिलेला नाही, जसे की कृष्णेकाठी कुं डल आता पहिले उरले नाही... त्यामुळे गोवा सोडून जावेसे वाटते, कारण गोवा पूर्वीसारखा राहिला नाही... गोवा हरवला...अशा आशयाचे एक गाणे पॉपस्टार रेमो फर्नांडीस यांनी गायले. झाले, यावरून कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी रेमो निराशावादी आहेत, त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे असे बोधामृत पाजलेले आहे. कलावंत गातो आणि राजसत्ता कसे गायचे ते शिकवते...मागील पानावरून पुढे चालूच आहे.कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी जगभर चिंतानजक स्थिती असल्याचे पुण्यात नुकत्याच झालेल्या पेनच्या अधिवेशनातही सामोरे आले. गोवा तर धर्मवाद्यांची गढी. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन केलेला आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण यांचे हित जपण्याची या पक्षाची टॅगलाईन होती. होती एवढ्याचसाठी की सध्या मायक्रोस्कोप घेऊन शोधले तरी या पक्षाच्या वाटचालीत ती सापडणार नाही. तांदूळ, मासे, पाव, नारळ यांसारखे गोवेकरांच्या दैनंदिन भोजनातील पदार्थ स्वस्त देण्याची घोषणा या पक्षाने निवडणुकीपूर्वी हवेत फेकून दिलेली होती. तीही मायक्रोस्कोपखाली सापडत नाही.गोवा, गोवेकर आणि गोंयकारपण जपण्याची भावुक साद या पक्षाने घातलेली होती आणि पॉपस्टार रेमोने त्याची गाण्यातून नेमकी खिल्ली उडवलेली आहे. रेमो निराशावादी भाटकार (जमिनदार) आहेत. त्यांना असे वागणे शोभत नाही, असे या मंत्र्यांचे म्हणणे. सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर एकवेळ समजता येते पण रेमोची स्थिती अशी नाही, असा वकिली युक्तीवाद ते मांडतात.खरे तर कलावतांने तळागाळातल्याचा आवाज व्हायचे असते हेच मंत्रीमहोदय विसरताहेत आणि समष्टीऐवजी व्यक्तीवर येऊन थांबतात. यांचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नोकरभरतीची फाईल घेऊन दवाखान्यात बसलेले आहेत, असे यांच्याच सरकारमधील उपसभापती मायकल लोबो जाहीर म्हणतात. त्यामुळे तीन हजार सरकारी नोकरीभरती रखडलेली आहे असा लोबोंचा आरोप आहे. आणि मंत्री सरदेसाई म्हणतात, सामान्याने नोकरीसाठी गोवा सोडला तर समजता येते. समजता येते मंत्र्याची धन्य ती समज.खाणींनी गोव्याची वाट लावली. गोव्यातील जल, जंगल आणि जमिनीची वाट लावली जात आहे. पर्यटनाच्या नावाखाली गोवा म्हणजे बीच, बेबीज आणि बॉटल्स असे समीकरण घट्ट केलेली सर्व काळ््या धंद्याची समांतर व्यवस्था व्यवस्था आकाराला आलेली आहे. त्यामुळे माझ्या गोव्याच्या भूमीत...गड्या नारळ दुधाचे...आता हे गाण्यातूनच शोभून दिसते. हा एक गोवा होता, जो राहिला नाही हेच तर रेमो गातोय तरीही मंत्री विजय सरदेसाईंना रेमोच्या राग का येतो? दुसऱ्या भाषेत अलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ?

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण