शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

कोविड उद्रेकाचा दोष सरकारलाच का देतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 20:07 IST

गोव्याने पर्यटन व उद्योगांसाठी दरवाजे सताड उघडे केले. वास्को शहरातील श्रमजीवी लोकांचा भाग मानलेल्या मांगोर येथे कोविडग्रस्तांची संख्या वाढू लागताच, संपूर्ण शहरात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

- राजू नायकगोव्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वात आधी कंबर कसलेल्या गोव्याची आज हार मानलेल्या योद्धय़ासारखी परिस्थिती ओढवण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारला जातो तेव्हा राज्य सरकारकडेच बोट दाखवण्याखेरीज पर्याय नसेल.गोव्याने पर्यटन व उद्योगांसाठी दरवाजे सताड उघडे केले. वास्को शहरातील श्रमजीवी लोकांचा भाग मानलेल्या मांगोर येथे कोविडग्रस्तांची संख्या वाढू लागताच, संपूर्ण शहरात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. वास्को शहरातील जागृत नागरिकांची ही मागणी अव्हेरण्यात आली.त्याचा परिणाम : हा संसर्ग संपूर्ण गोव्यात पोहोचला. आज एकूण बाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचण्याच्या बेतात असून मृत्यू २९ नोंदविण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवडय़ात तीन दिवसांची टाळेबंदी पुकारूनही काही फायदा झालेला नाही. केवळ पाच दिवसांत एक हजार नवे बाधित व ९ जणांचा मृत्यू ओढवला.त्यामुळे विरोधकांना सरकारवर तुटून पडायला नवे हत्यार सापडले. त्यांनी म्हटले, २९ जे बळी पडले ते सरकारी अनास्था व निष्काळजीपणामुळे आहेत. त्यात तथ्यही आहे.सरकारचे अपयश खालील मुद्दय़ांवरून सहज लक्षात येईल.- तातडीने कोविड चाचण्या घेण्याची आवश्यकता असता सरकारने हयगय केली. मांगोरहिल भागात रूग्ण सापडू लागताच सर्व झोपडपट्टय़ांमध्ये तातडीने रुग्ण हुडकून काढण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक होते. सुरुवातीला केवळ ५०० चाचण्या प्रतिदिनी होत. आता त्या अडीच हजार होतात. परंतु सुरुवातीला हा वेग कमी असल्याने कोविड पसरण्यास मदत झाली.- मांगोरहिल हा हॉटस्पॉट ठरल्यानंतर संपूर्ण वास्को शहरात टाळेबंदी जाहीर करणे आवश्यक होते. परंतु सरकारने मंत्र्यांच्या व हितसंबंधितांच्या दबावाखाली तो निर्णय टाळला. त्यामुळे कोविडचा प्रचंड उद्रेक झाल्याचा ठपका सरकारवरच ठेवला जातोय.- सरकारने सुरुवातीलाच घरोघरी सर्वेक्षण सुरू केले होते. त्यातून राज्यात पाच हजार तरी ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी त्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार होते. सध्या मृत्यू पावलेल्यांमध्ये ५० वर्षावरील व्यक्तींचाच अधिक समावेश आहे. याचा अर्थ सर्वेक्षणामध्ये आजारी सापडलेल्या लोकांची विशेष देखभाल सरकारने केली असती तर हा उद्रेक टळला असता.- कोविड इस्पितळ व गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळही कोविडच्या फैलावापासून सुटले नाही. कोविड इस्पितळाचे प्रमुख डॉ. एडविन गोम्सही कोविडच्या कचाटय़ात सापडले. यावरून सरकारची उपाययोजना कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाले. सरकार वैद्यकीय कर्मचा-यांनाही वेळीच सुरक्षा कवच पुरवू शकले नाही.गोवा राज्य छोटे असतानाही सरकारला त्याचे संरक्षण करता आले नाही. वास्को शहरात या रोगाचा उद्रेक होण्यास तेथील मंत्री कारणीभूत ठरले. त्यांना कोळसा व खनिज यांचा पुरवठा मुरगाव बंदरात करायचा होता. त्यामुळे वाहतूक बंद झालेली नको होती. सरकारातील अनेकांचे खाण व्यवसायात हिसतंबंध गुंतले आहेत. त्यांच्या दबावाखाली सरकारची कोविडवरील पकड ढिली पडली. त्यामुळे गोव्यातील कोविड उद्रेक हा ‘सरकारनिर्मित’ आहे असा आरोप करतात, त्यात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या