शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

कोविड उद्रेकाचा दोष सरकारलाच का देतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 20:07 IST

गोव्याने पर्यटन व उद्योगांसाठी दरवाजे सताड उघडे केले. वास्को शहरातील श्रमजीवी लोकांचा भाग मानलेल्या मांगोर येथे कोविडग्रस्तांची संख्या वाढू लागताच, संपूर्ण शहरात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

- राजू नायकगोव्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वात आधी कंबर कसलेल्या गोव्याची आज हार मानलेल्या योद्धय़ासारखी परिस्थिती ओढवण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारला जातो तेव्हा राज्य सरकारकडेच बोट दाखवण्याखेरीज पर्याय नसेल.गोव्याने पर्यटन व उद्योगांसाठी दरवाजे सताड उघडे केले. वास्को शहरातील श्रमजीवी लोकांचा भाग मानलेल्या मांगोर येथे कोविडग्रस्तांची संख्या वाढू लागताच, संपूर्ण शहरात टाळेबंदी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. वास्को शहरातील जागृत नागरिकांची ही मागणी अव्हेरण्यात आली.त्याचा परिणाम : हा संसर्ग संपूर्ण गोव्यात पोहोचला. आज एकूण बाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचण्याच्या बेतात असून मृत्यू २९ नोंदविण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवडय़ात तीन दिवसांची टाळेबंदी पुकारूनही काही फायदा झालेला नाही. केवळ पाच दिवसांत एक हजार नवे बाधित व ९ जणांचा मृत्यू ओढवला.त्यामुळे विरोधकांना सरकारवर तुटून पडायला नवे हत्यार सापडले. त्यांनी म्हटले, २९ जे बळी पडले ते सरकारी अनास्था व निष्काळजीपणामुळे आहेत. त्यात तथ्यही आहे.सरकारचे अपयश खालील मुद्दय़ांवरून सहज लक्षात येईल.- तातडीने कोविड चाचण्या घेण्याची आवश्यकता असता सरकारने हयगय केली. मांगोरहिल भागात रूग्ण सापडू लागताच सर्व झोपडपट्टय़ांमध्ये तातडीने रुग्ण हुडकून काढण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक होते. सुरुवातीला केवळ ५०० चाचण्या प्रतिदिनी होत. आता त्या अडीच हजार होतात. परंतु सुरुवातीला हा वेग कमी असल्याने कोविड पसरण्यास मदत झाली.- मांगोरहिल हा हॉटस्पॉट ठरल्यानंतर संपूर्ण वास्को शहरात टाळेबंदी जाहीर करणे आवश्यक होते. परंतु सरकारने मंत्र्यांच्या व हितसंबंधितांच्या दबावाखाली तो निर्णय टाळला. त्यामुळे कोविडचा प्रचंड उद्रेक झाल्याचा ठपका सरकारवरच ठेवला जातोय.- सरकारने सुरुवातीलाच घरोघरी सर्वेक्षण सुरू केले होते. त्यातून राज्यात पाच हजार तरी ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी त्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार होते. सध्या मृत्यू पावलेल्यांमध्ये ५० वर्षावरील व्यक्तींचाच अधिक समावेश आहे. याचा अर्थ सर्वेक्षणामध्ये आजारी सापडलेल्या लोकांची विशेष देखभाल सरकारने केली असती तर हा उद्रेक टळला असता.- कोविड इस्पितळ व गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळही कोविडच्या फैलावापासून सुटले नाही. कोविड इस्पितळाचे प्रमुख डॉ. एडविन गोम्सही कोविडच्या कचाटय़ात सापडले. यावरून सरकारची उपाययोजना कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाले. सरकार वैद्यकीय कर्मचा-यांनाही वेळीच सुरक्षा कवच पुरवू शकले नाही.गोवा राज्य छोटे असतानाही सरकारला त्याचे संरक्षण करता आले नाही. वास्को शहरात या रोगाचा उद्रेक होण्यास तेथील मंत्री कारणीभूत ठरले. त्यांना कोळसा व खनिज यांचा पुरवठा मुरगाव बंदरात करायचा होता. त्यामुळे वाहतूक बंद झालेली नको होती. सरकारातील अनेकांचे खाण व्यवसायात हिसतंबंध गुंतले आहेत. त्यांच्या दबावाखाली सरकारची कोविडवरील पकड ढिली पडली. त्यामुळे गोव्यातील कोविड उद्रेक हा ‘सरकारनिर्मित’ आहे असा आरोप करतात, त्यात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या