शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

‘भाजयुमो’चा विजय रथ कोण रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:48 IST

आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे.

- योगेश मिराशी

पणजी : आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे. काँग्रेसशी निगडित एनएसयूआय, शिवसेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यासारख्या आघाड्यांनी या निवडणुकीत आपली भूमिकाच स्पष्ट न केल्याने भाजयुमो संघटनेचा पगडा वरचढ दिसत आहे. त्यामुळे त्यांचा हा विजयरथ रोखणे सध्यातरी अवघड दिसत आहे. 

३० आॅक्टोबरला गोवा विद्यापीठाच्या निवडणुका होणार आहेत. या विभागाच्या प्रमुखांनी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये बैठकांवर भर दिलेला दिसतो. मात्र, एनएसयूआयने यात थेट सहभाग घेतलेला नाही. शिवसेनेही स्वत:चे उमेदवार उभे न केल्याने भाजयुमोला याचा फायदा होताना दिसत आहे. 

भाजपाच्या विद्यार्थी युवा विभागाचे गजानन तिळवे म्हणाले, आमची संघटना बांधणी मजबूत असल्याने आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांकडून आरोप केला जातो की सत्तेचा दुरुपयोग करून या निवडणुका उशिराने घेतल्या जात आहेत. यात भाजयुमोचा कोणताच स्वार्थ नाही. तसेच एनएसयूआय संघटना भाजयुमोसमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे यंदाही विद्यापीठावर भाजयुमोचा झेंडा फडकणार, यात शंकाच नाही. अभाविप ही संघटना दहा वर्षांपासून राज्यात सक्रिय नाही. मात्र, अभाविप व भाजयुमोची विचारधार एकच असल्याने ती संघटना आमचा भाग वाटतो. भाजयुमोने अभाविप संघटनेच्या विरोधात कोणताच उमेदवार उभा केलेला नाही. अभाविपबद्दल आम्हाला आदर असून त्यांनी निवडणुकीत भाग घेतल्याने स्पर्धा पाहायला मिळेल. 

आजपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. एकंदरीत विद्यापीठात निवडणुकीचे वारे दिसून येत नाही. काँग्रेसने महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ वर्गप्रतिनिधी (युसीआर) उभे केले असले तरीही ते विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकारी मंडळच्या निवडणुकांत सहभागी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणूक प्रणालीत सहभाग घेतलेला नाही. विद्यार्थ्यांची मागणी होती की खुल्या पद्धतीने निवडणुका घ्याव्या. मात्र, महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी या प्रक्रियेला ‘खो’ घातल्याने ही प्रणाली रखडली. दुसरीकडे एनएसआयूआयने भाजपनिगडित संघटनेवर आरोप केला होता की सत्तेचा वापर करून या निवडणुका उशिरा घेतल्या जात आहेत. तसेच एनएसयूआयने खुल्या निवडणुका घेण्याची मागणी केली होती. शिवसेना संघटनेचा सूर तसाच होता. शिवसेनेने या निवडणुकांना बरखास्त करण्याची मागणी केली होती.

साधारणत: या निवडणुका जुलै ते आॅगस्टमध्ये पार पडतात; पण यंदा आॅक्टोबर उजाडला. शिवाय शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर आले आहे. शिवसेना संघटनेने स्वत:चे उमेदवार रिंगणात उभे केले नसले तरी त्यांनी अपक्ष आमदारांना पाठिंबा दर्शविला आहे. जिथे त्यांची पक्ष संघटना मजबूत आहे, अशा ठिकाणीच त्यांनी अधिक भर दिलेला दिसतो.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस