शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘भाजयुमो’चा विजय रथ कोण रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:48 IST

आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे.

- योगेश मिराशी

पणजी : आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे. काँग्रेसशी निगडित एनएसयूआय, शिवसेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यासारख्या आघाड्यांनी या निवडणुकीत आपली भूमिकाच स्पष्ट न केल्याने भाजयुमो संघटनेचा पगडा वरचढ दिसत आहे. त्यामुळे त्यांचा हा विजयरथ रोखणे सध्यातरी अवघड दिसत आहे. 

३० आॅक्टोबरला गोवा विद्यापीठाच्या निवडणुका होणार आहेत. या विभागाच्या प्रमुखांनी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये बैठकांवर भर दिलेला दिसतो. मात्र, एनएसयूआयने यात थेट सहभाग घेतलेला नाही. शिवसेनेही स्वत:चे उमेदवार उभे न केल्याने भाजयुमोला याचा फायदा होताना दिसत आहे. 

भाजपाच्या विद्यार्थी युवा विभागाचे गजानन तिळवे म्हणाले, आमची संघटना बांधणी मजबूत असल्याने आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांकडून आरोप केला जातो की सत्तेचा दुरुपयोग करून या निवडणुका उशिराने घेतल्या जात आहेत. यात भाजयुमोचा कोणताच स्वार्थ नाही. तसेच एनएसयूआय संघटना भाजयुमोसमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे यंदाही विद्यापीठावर भाजयुमोचा झेंडा फडकणार, यात शंकाच नाही. अभाविप ही संघटना दहा वर्षांपासून राज्यात सक्रिय नाही. मात्र, अभाविप व भाजयुमोची विचारधार एकच असल्याने ती संघटना आमचा भाग वाटतो. भाजयुमोने अभाविप संघटनेच्या विरोधात कोणताच उमेदवार उभा केलेला नाही. अभाविपबद्दल आम्हाला आदर असून त्यांनी निवडणुकीत भाग घेतल्याने स्पर्धा पाहायला मिळेल. 

आजपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. एकंदरीत विद्यापीठात निवडणुकीचे वारे दिसून येत नाही. काँग्रेसने महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ वर्गप्रतिनिधी (युसीआर) उभे केले असले तरीही ते विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकारी मंडळच्या निवडणुकांत सहभागी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणूक प्रणालीत सहभाग घेतलेला नाही. विद्यार्थ्यांची मागणी होती की खुल्या पद्धतीने निवडणुका घ्याव्या. मात्र, महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी या प्रक्रियेला ‘खो’ घातल्याने ही प्रणाली रखडली. दुसरीकडे एनएसआयूआयने भाजपनिगडित संघटनेवर आरोप केला होता की सत्तेचा वापर करून या निवडणुका उशिरा घेतल्या जात आहेत. तसेच एनएसयूआयने खुल्या निवडणुका घेण्याची मागणी केली होती. शिवसेना संघटनेचा सूर तसाच होता. शिवसेनेने या निवडणुकांना बरखास्त करण्याची मागणी केली होती.

साधारणत: या निवडणुका जुलै ते आॅगस्टमध्ये पार पडतात; पण यंदा आॅक्टोबर उजाडला. शिवाय शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर आले आहे. शिवसेना संघटनेने स्वत:चे उमेदवार रिंगणात उभे केले नसले तरी त्यांनी अपक्ष आमदारांना पाठिंबा दर्शविला आहे. जिथे त्यांची पक्ष संघटना मजबूत आहे, अशा ठिकाणीच त्यांनी अधिक भर दिलेला दिसतो.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस