शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘भाजयुमो’चा विजय रथ कोण रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 12:48 IST

आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे.

- योगेश मिराशी

पणजी : आठ वर्षांपासून गोवा विद्यापीठावर भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांचे वर्चस्व आहे. यावर्षीही भाजयुमोचा झेंडा विद्यापीठावर फडकणार, अशी स्थिती दिसत आहे. काँग्रेसशी निगडित एनएसयूआय, शिवसेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यासारख्या आघाड्यांनी या निवडणुकीत आपली भूमिकाच स्पष्ट न केल्याने भाजयुमो संघटनेचा पगडा वरचढ दिसत आहे. त्यामुळे त्यांचा हा विजयरथ रोखणे सध्यातरी अवघड दिसत आहे. 

३० आॅक्टोबरला गोवा विद्यापीठाच्या निवडणुका होणार आहेत. या विभागाच्या प्रमुखांनी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये बैठकांवर भर दिलेला दिसतो. मात्र, एनएसयूआयने यात थेट सहभाग घेतलेला नाही. शिवसेनेही स्वत:चे उमेदवार उभे न केल्याने भाजयुमोला याचा फायदा होताना दिसत आहे. 

भाजपाच्या विद्यार्थी युवा विभागाचे गजानन तिळवे म्हणाले, आमची संघटना बांधणी मजबूत असल्याने आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांकडून आरोप केला जातो की सत्तेचा दुरुपयोग करून या निवडणुका उशिराने घेतल्या जात आहेत. यात भाजयुमोचा कोणताच स्वार्थ नाही. तसेच एनएसयूआय संघटना भाजयुमोसमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे यंदाही विद्यापीठावर भाजयुमोचा झेंडा फडकणार, यात शंकाच नाही. अभाविप ही संघटना दहा वर्षांपासून राज्यात सक्रिय नाही. मात्र, अभाविप व भाजयुमोची विचारधार एकच असल्याने ती संघटना आमचा भाग वाटतो. भाजयुमोने अभाविप संघटनेच्या विरोधात कोणताच उमेदवार उभा केलेला नाही. अभाविपबद्दल आम्हाला आदर असून त्यांनी निवडणुकीत भाग घेतल्याने स्पर्धा पाहायला मिळेल. 

आजपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. एकंदरीत विद्यापीठात निवडणुकीचे वारे दिसून येत नाही. काँग्रेसने महाविद्यालयांमध्ये विद्यापीठ वर्गप्रतिनिधी (युसीआर) उभे केले असले तरीही ते विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकारी मंडळच्या निवडणुकांत सहभागी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणूक प्रणालीत सहभाग घेतलेला नाही. विद्यार्थ्यांची मागणी होती की खुल्या पद्धतीने निवडणुका घ्याव्या. मात्र, महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी या प्रक्रियेला ‘खो’ घातल्याने ही प्रणाली रखडली. दुसरीकडे एनएसआयूआयने भाजपनिगडित संघटनेवर आरोप केला होता की सत्तेचा वापर करून या निवडणुका उशिरा घेतल्या जात आहेत. तसेच एनएसयूआयने खुल्या निवडणुका घेण्याची मागणी केली होती. शिवसेना संघटनेचा सूर तसाच होता. शिवसेनेने या निवडणुकांना बरखास्त करण्याची मागणी केली होती.

साधारणत: या निवडणुका जुलै ते आॅगस्टमध्ये पार पडतात; पण यंदा आॅक्टोबर उजाडला. शिवाय शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर आले आहे. शिवसेना संघटनेने स्वत:चे उमेदवार रिंगणात उभे केले नसले तरी त्यांनी अपक्ष आमदारांना पाठिंबा दर्शविला आहे. जिथे त्यांची पक्ष संघटना मजबूत आहे, अशा ठिकाणीच त्यांनी अधिक भर दिलेला दिसतो.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस