शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

भाजपच्या महिला कुठे? केंद्रीय नेतृत्वाची सूचना अन् गोव्यातील नेत्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2024 09:22 IST

गेल्या ३० वर्षांत एकदाही गोव्यात महिलांमधून कुणी भाजप प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाही.

भाजपने गोव्यात कधी महिलांना महत्त्वाची पदे देण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या ३० वर्षांत एकदाही गोव्यात महिलांमधून कुणी भाजप प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाही. पक्षाने कुणा महिलेला त्या पदासाठी पुढे आणलेच नाही, भाजपने कधीच महिलांना लोकसभेचे तिकीट दिले नाही. उमेदवारी देणे सोडा, नावदेखील कधी शॉर्ट लिस्ट केले नाही. महिला शक्तीचा वापर हा पणजीत कधी तरी बाबूश मोन्सेरात यांचा निषेध करण्यासाठी केला जात होता. तेच बाबूश महाशय भाजपच्या मंत्रिमंडळात पोहोचले. कुंदा चोडणकर, पूर्वी शीतल नाईक तसेच अन्य अनेक महिलांना भाजपमध्ये हवा तेवढा न्याय मिळाला नाही. आता रोहन खंवटे हे सावंत मंत्रिमंडळात असून, ते भाजपचे बार्देशचे महत्त्वाचे नेते झाले आहेत. डिचोलीच्या शिल्पा नाईक यांच्यावर तात्पुरता राजकीय संन्यासच घेण्याची वेळ आली.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिलेला उमेदवारी द्यायला हवी, अशी सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केली. यामुळे सध्या भाजपचे गोव्यातील नेते महिला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करत आहेत. 

सुलक्षणा सावंत यांना भाजपमध्ये कायम वाव मिळाला, अर्थात त्या स्वतः सक्रिय असल्याने त्यांना नशिबाचीही साथ मिळत गेली, दिव्या राणे भाजपमध्ये स्वतःच्या बळावर आमदार झाल्या. त्यांना काही भाजपने घडवले नाही. सुवर्णा तेंडुलकर किंवा अन्य काही महिलांना भाजपमध्ये संधी मिळाली. पण भाजपमध्ये प्रोत्साहन मिळाले व त्यामुळे आपण आमदार झालो, असे सहसा कुणी महिला सांगू शकणार नाही. डिलायला लोबो किंवा जेनिफर मोन्सेरात ह्या आयात आमदार आहेत. त्यांनी उलट भाजपच्या पुरुष उमेदवारांचा एकेकाळी पराभव केला व विधानसभेत प्रवेश केला, विद्या गावडे, रंजिता पै वगैरेंना भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. काही महिला सरपंच झाल्या तर काही नगरसेविका झाल्या. 

मात्र, भाजपच्या सध्याच्या मंत्रिमंडळातदेखील कुणीच महिला नाही. महिला आमदारांकडे क्षमता असूनही त्यांना मंत्रिपद नाही. याउलट कापतलो, दामतलो अशा धमक्या वगैरे देणारे सध्याच्या मंत्रिमंडळात आहेत, ज्या भाऊसाहेब बांदोडकर यांना वर्षातून दोनवेळा भाजपचे नेते श्रद्धांजली वाहतात, त्या बांदोडकर यांच्या म. गो. पक्षाने गोव्याला पहिली महिला मुख्यमंत्री दिली होती. आतापर्यंत तीच पहिली व शेवटची ठरली आहे. त्याच म. गो. पक्षाने संयोगिता राणे यांच्या रूपात गोव्याला पहिल्या महिला खासदार दिल्या होत्या, त्यानंतर गोव्यात कुणी महिला कोणत्याच पक्षाकडून खासदार होऊ शकली नाही, गोव्यातील भाजपला आता दक्षिणेत योग्य त्या महिलेला तिकीट देण्याची संधी आहे. ही संधी दिल्याबाबत खरे म्हणजे मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानायला हवेत. 

दामू नाईक, नरेंद्र सावईकर आणि बाबू कवळेकर या तीन इच्छुक उमेदवारांची नावे भाजपने पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीकडे पोहोचवली होती, मात्र, गोव्यात चला आणि महिला उमेदवारांचा शोध घेऊन दक्षिणेतून तीन नावे पाठवा, अशी सूचना समितीकडून ऐकायला मिळाली. आता दक्षिणेत प्रभावशाली महिला कोण आहेत? याचा शोध भाजपचे नेते घेत आहेत. केंद्रीय नेतृत्वाने महिला उमेदवार शोधण्याची केलेली सूचना गोव्यातील नेत्यांनी गुप्त ठेवली होती. भाजपच्या कोअर टीम बैठकीत काल मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांना माहिती दिली. 

महिला उमेदवार शोधावा लागेल, याची कल्पना आता सर्वांनाच आली आहे. दिगंबर कामत यांना लोकसभेचे तिकीट देण्यास भाजपचे नेतृत्व तयार होते. पण कामत यांना दिल्लीत जाण्याची इच्छा नाही. गोव्याचे काही मंत्रीही कामत यांना दिल्लीला पाठविण्यास आतुर होते, पण आपले मित्र हे धूर्त व चतुर राजकारणी आहेत, ते आपल्याला प्रेमापोटी नव्हे तर वेगळ्या हेतूने खासदारकीच्या खुर्चीवर बसवू पाहतात, हे कामत यांनी जाणले, भाजपने जर दक्षिणेत महिलेला निवडून आणले तर तो नवा इतिहास ठरेल. गोव्यात काँग्रेसने पूर्वी निर्मला सावंत, सुलोचना काटकर आदींना प्रदेशाध्यक्षपद दिले होते. भाजपला पुढील काळात प्रदेशाध्यक्षपद महिलेला देण्याचे धाडस व मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल, भाजपच्या कोअर टीममध्येही एकसुद्धा महिला नाही. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४