शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाचा मुहूर्त कधी? गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना अन् दिगंबर कामतांच्या नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:13 IST

दिगंबर कामत हे एरवी खूप सहनशील. मात्र, त्यांनी आता आपली भावना व्यक्त करणे सुरू केले आहे.

गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना आता होईलच. निदान मंत्रिमंडळात दोन नवे चेहरे येतील, असा दावा भाजपचेच काही पदाधिकारी करत आहेत. हे नवे चेहरे म्हणजे दिगंबर कामत व रमेश तवडकर असेही सांगितले जाते. तवडकर यांनी अजून सभापतिपदाचा राजीनामा दिलेला नाही. ते मंत्रिपदासाठी उतावीळही नाहीत, असा दावा काहीजण करतात. मात्र, कोणताच राजकारणी मनात नेमके काय आहे, ते कधी स्पष्टपणे जाहीर करत नसतो. 

दिगंबर कामत हे एरवी खूप सहनशील. मात्र, त्यांनी आता आपली भावना व्यक्त करणे सुरू केले आहे. परवा डिचोलीत त्यांना मीडियाने मंत्रिपदाविषयी विचारले. त्यावर कामत यांनी दिलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. 'जेव्हा शपथविधी होईल तेव्हाच खरे, मला मंत्री केले जाईल अशा बातम्या अधूनमधून येत असतात; पण मी मंत्री नसलो, तरी माझे काम सुरूच आहे, असे कामत म्हणाले.' कामत एकेकाळी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी होते. त्यांनी मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या आक्रमक विरोधी पक्षनेत्याचा सामना केला होता. शिवाय रवी नाईक, विश्वजित राणे, चर्चिल आलेमाव, ज्योकिम आलेमाव, दयानंद नार्वेकर अशा रथी-महारथींना मंत्रिमंडळात ठेवूनही कामत यांना संघर्षच करावा लागला होता. नार्वेकर यांचा राजीनामा घेण्याची चाल नंतर त्यांना खेळावी लागली होती, हा वेगळा विषय आहे. मात्र, कामत यांनी 'देव तारी त्याला कोण मारी' असे म्हणत पाच वर्षे राज्यकारभार चालवला होता. 

वर्ष २००७ मध्ये कामत जेव्हा मुख्यमंत्रिपदी होते तेव्हा प्रमोद सावंत आमदारदेखील नव्हते. तेच सावंत आता गेली सहा वर्षे मुख्यमंत्रिपदी आहेत आणि त्यांच्या हाताखाली मंत्री म्हणून कामत यांनी काम करावे, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. कामतही आपल्याला मंत्रिपद नको असे म्हणत नाहीत. अर्थात त्यांनी तसे म्हणावे अशी कुणाचीच इच्छा नाही. सावंत यांच्या मंत्रिमंडळात रवी नाईक हेही एक माजी मुख्यमंत्री सध्या कृषिमंत्री म्हणून काम करतात. दिगंबर कामत यांचा चतुर्थीपूर्वी शपथविधी झाला तर आणखी एक माजी सीएम मंत्रिमंडळात आले असा अर्थ होईल. तसे घडले तर प्रमोद सावंत हे खऱ्या अर्थाने नशीबवान मुख्यमंत्री आहेत, असे म्हणता येईल. वय कमी असले, तरी दोन ज्येष्ठ माजी मुख्यमंत्री त्यांचे मंत्री झालेत, असा अर्थ होईल. कामत यांना भाजपच्या हायकमांडने बराचकाळ तिष्ठत ठेवले आहे. त्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणताना योग्य तो मान राखला जाईल, अशी हमी दिली गेली होती. कामत भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामागे कधीच चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला नाही. शिवाय कथित खाण घोटाळादेखील भाजप पार विसरून गेला. पर्रीकरांनी मुख्यमंत्रिपदी असताना मात्र कामत यांना पळता भुई थोडी केली होती. कामत जेव्हा मंत्री होतील, तेव्हा नियतीने आपल्याला न्याय दिला अशा प्रकारची भावना कदाचित कामत यांच्या मनात दाटून येईल. 

आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री करणे ही भाजपची यापूर्वीची घोडचूक ठरलेली आहे. सिक्वेरा यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला ख्रिस्ती मतदारांची सासष्टीत तरी मते मिळतील असे हायकमांडला वाटले होते; पण तसे घडले नाही. आलेक्स सिक्वेरा आता आजारी असल्याने स्वतःच्या कामालाही न्याय देऊ शकत नाहीत. अशावेळी सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वतःच बाजूला होणे योग्य ठरेल. त्या जागीच कामत यांची वर्णी लागेल, अशी चर्चा गेले दोन दिवस सुरू आहे. 

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर लगेच तवडकर यांना ती खुर्ची दिली जाईल असे ढोल अनेकांनी वाजवले होते. मात्र, तवडकर यांनी अजून सभापतिपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना मंत्री करा, असा आदेश अजून दिल्लीहून आलेला नसावा. मायकल लोबो, संकल्प आमोणकर यांचेही लक्ष मंत्रिपदाकडे लागून आहे. 

वास्तविक नीलेश काब्राल यांच्याकडून मंत्रिपद काढून घेणे हा काब्राल यांच्यावर अन्याय होता. काब्राल यांना पुन्हा मंत्री करण्यास मुख्यमंत्री तयार होणार नाहीत. चतुर्थीसाठी आता सात-आठ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे ठामपणे म्हणता येत नाही. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण