शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नंदादीपचे काय होणार?; विलीनीकरणावरील निर्णयासाठी उद्या आमसभा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:05 PM

सुमारे १५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून विलीनीकरणाला गती देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर एक बैठक म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत घेतली होती.

म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली नंदादीप अर्थात म्हापसा अर्बन बँक ऑफ गोवाचे टांगलेले भवितव्य शनिवार, दि. २१ रोजी होणाऱ्या बँकेच्या विशेष आमसभेत ठरवले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे बिकट परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या या बँकेचे पीएमसी बँक किंवा आर्थिक दृष्ट्या मजबूत असलेल्या इतर तत्सम बँकेत विलीनीकरण करण्यावर निर्णय घेण्यासाठी भागधारकांची ही विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न होणार आहे. 

म्हापसा अर्बनचे ठेवीदार, भागधारक, खातेदार तसेच कर्मचाºयांचे भवितव्य वाचवण्यासाठी होणाºया या बैठकीत विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर होणे अत्यावश्यक आहे. सदरचा ठराव मंजूर न झाल्यास बँकेची पुढील वाटचाल अधांतरी राहण्याची शक्यता निर्माण होण्याची संबावना आहे. त्यामुळे बँकेचे भवितव्य आता भागधारकांच्या हाती राहणार आहे. विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास नंदादीप हे नाव कायमचे विझले जाणार आहे. 

म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना सुमारे ५३ वर्षापूर्वी व्यापाºयांचे हित लक्षात घेवून १९६६ स्थापन केली. त्यामुळे उत्तर गोव्यातील पहिली सहकारी बँक स्थापन करण्याचा मान म्हापसावासीयांना लाभलेला. गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बहुराज्य बँक होणाचा मान मिळवलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती गंभीर होत गेल्याने अनुत्पादीत कर्ज वाढल्याने (एनपीए) बँकेच्या वाटचालीवर परिणाम झाला. 

खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे साडेचार वर्षांपूर्वी २४ जुलै २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनवर आर्थिक निर्बंध लागू केले. लागू करण्यात आलेल्या निर्बंधात अनेकवेळा मुदत वाढ देण्यात आलेली. सध्या लागू असलेले निर्बंध नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येत आहेत. सदरची मुदत वाढ देताना रिझर्व्ह बँकेकडून म्हापसा अर्बनला कठोर कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आलेला. त्यात  एक तर बँकेचे विलीनीकरण करण्याचे किंवा बँकेचे दिवाळखोर काढण्याच्या इशाºयाचा सुद्धा समावेश आहे.  

सुमारे १५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून विलीनीकरणाला गती देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर एक बैठक म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत घेतली होती. त्यात सहकारी मंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव, अर्थ सचिव, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, केंद्रीय तसेच राज्य सहकार निबंधक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर विलीनीकरणाच्या प्रस्तावाला गती देण्यात आली होती. या बैठकीनंतर म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाने बैठक घेवून विलीनीकरणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. घेतलेला हा ठराव आमसभेत मंजूर होणे अत्यावश्यक असल्याने २१ रोजी बँकेच्या सभागृहात विशेष आमसभा बोलावण्यात आली आहे. बँकेचे भागदारक राजसिंग राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेशी संबंधीतांचे भवितव्य वाचवण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने ठराव मंजूर करून घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. 

टॅग्स :bankबँकPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक