शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

पाण्यासाठी म्हापसावासियांनी अडवला रस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 3:48 PM

उत्तर गोव्यातील अस्नोडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या बिघाडामुळे बार्देस तालुक्यातील लोकांना ऐन चतुर्थी काळात पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे.

म्हापसा : उत्तर गोव्यातील अस्नोडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या बिघाडामुळे बार्देस तालुक्यातील लोकांना ऐन चतुर्थी काळात पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. संतप्त म्हापसावायिसांनी सुरुवातीला साहाय्यक अभियंत्याला घेराव घातला. नंतर म्हापशातील वाहतूक रोखून धरली. आंदोलनानंतर पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने वाहतूक पुन्हा मार्गी लागली.

ऐन चतुर्थीच्या काळात मागील सात दिवसापासून पूर्ण बार्देस तालुक्यात तसेच डिचोली तालुक्यातील काही भागातील पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी खेचणारे पंप नादुरुस्त झाल्याने हा परिणाम झाला होता. परिणामी काही लोकांनी चतुर्थी नियंत्रित पाणी पुरवठ्याने काही लोकांना गढूळ पाणी पुरवठ्याने तर काहींना टँकरद्वारे होत असलेल्या पाणी पुरवठ्यातून साजरी करावी लागली. 

सणासाठी पाणी नसल्याने संतप्त झालेल्या म्हापशातील लोकांनी बार्देस तालुक्याच्या विभागाचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक अभियंता सुभाष बेळगावकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला व पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या दरम्यान त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून त्यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या म्हापसा बस स्थानकासमोरी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडवली. त्यात महिलांचा समावेश होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलीस कुमक सुद्धा मागवण्यात आली. 

निरीक्षक तुषार लोटलीकर आपल्या फौजफाट्यासहित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. नंतर बेळगावकर यांच्या कार्यालयात जावून त्यांच्याशी चर्चा केली. केलेल्या चर्चे अंती बेळगावकर यांनी नंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत फोनवरुन चर्चा करुन आज संध्याकाळपर्यंत म्हापसावासियांना पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांना दिले. संध्याकाळपर्यंत काही भागात पुरवठा पूर्ववत करण्याचे तसेच उद्या राहिलेल्या इतर भागातील पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ज्या भागात पुरवठा होणार नाही त्या भागातील लोकांनी नागरिकांना टँकरद्वारे पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांना दिले. दिलेल्या आश्वासनानंतर जमलेल्या नागरिकांनी उद्यापर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला असून पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा त्यांच्या कार्यालयाला धडक देण्याचा इशारा दिला. 

दरम्यान बिघाड झालेले पंप बदलण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती बेळगावकर यांनी दिली. हे काम अंतिम टप्प्यात असून उद्यापर्यंत ८५ टक्के भागातील पुरवठा सुरळीत केला जाणार असून शुक्रवारपर्यंत तालुक्यातील पुरवठा सुरळीत होणार असल्याचे ते पुढे म्हणाले. 

  

टॅग्स :goaगोवाWaterपाणी