शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2024 11:39 IST

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईमुळे लोक हैराण झाले आहेत. टैंकरही उपलब्ध नसल्याने दिवस तरी कसे काढावेत?, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. बेतोडा पंचायत क्षेत्रातील संतप्त रहिवाशांनी सोमवारी बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक देत घागर मोर्चा काढला.

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे साकोर्डा व परिसरात नळाद्वारे पाणी बंद झाल्याने विहिरींवर महिलांची गर्दी उसळत आहे. काऱ्यामळ, बाराभूमी, धारगे गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टैंकरही मिळत नसल्याने लोकांचे हाल झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मार्ना, शिवोली येथे पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. लोकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल झाले. 

दरम्यान, म्हापणे यांनी इतर कोणत्याही भागांमध्ये पाणी टंचाई नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, एरवी पर्वरी व परिसरात पाण्याची समस्या उ‌द्भवत असे; परंतु पर्वरीतील १० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पर्वरीतील पाण्याची समस्या मिटली आहे. पर्वरीत आता टँकरची गरज राहिलेली नाही. तेथे टैंकर विनावापर राहतात.

बेतोड़ा पंचक्रोशीत कासारवाडा, दत्तगड आदी भागांत नळातून पाणीपुरवठा बंद झाला आहे. बार्देशमध्ये शिवोली मतदारसंघात आसगाव, हणजूण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. काणकोण तालुक्यालाही पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. माडीतळप, पोळे, दापट भागात लोकांना पाणी मिळत नाही.

साकोर्डा परिसरात पाच टँकरद्वारे पुरवठा

बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रगाडा नदीचे पात्र कोरडे पडल्याने तिथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईची कल्पना खात्याला आहे. मी तेथील सहायक अभियंत्याकडून आढावा घेतला असून, पाणीपुरवठ्यासाठी पाच टँकरची व्यवस्था केली जाईल. म्हापणे म्हणाले की, 'अनेकदा भूमिगत वीजवाहिन्या किंवा मलनिस्सारण वाहिन्या फोडल्या पोहोचत टाकताना जलवाहिन्या जातात. त्यामुळे नळांना पाणी नाही. जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार नित्याचेच बनले असून, ती मोठी डोकेदुखी ठरली आहे.

नळाच्या पाण्यात आढळले किडे

सांतआंदे मतदारसंघातील आजोशी मंडूर येथील घरांमध्ये नळांतून आलेल्या पाण्यात किडे आढळल्यानंतर तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आ आहे. सध्या या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात काल आमदार वीरेश बोरकर यांनी बांधकाम, आरोग्य खाते, पंचायत सदस्य व ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी आरोग्य खात्याचा याविषयी अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :goaगोवाwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातWaterपाणी