शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2024 11:39 IST

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईमुळे लोक हैराण झाले आहेत. टैंकरही उपलब्ध नसल्याने दिवस तरी कसे काढावेत?, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. बेतोडा पंचायत क्षेत्रातील संतप्त रहिवाशांनी सोमवारी बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक देत घागर मोर्चा काढला.

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे साकोर्डा व परिसरात नळाद्वारे पाणी बंद झाल्याने विहिरींवर महिलांची गर्दी उसळत आहे. काऱ्यामळ, बाराभूमी, धारगे गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टैंकरही मिळत नसल्याने लोकांचे हाल झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मार्ना, शिवोली येथे पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. लोकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल झाले. 

दरम्यान, म्हापणे यांनी इतर कोणत्याही भागांमध्ये पाणी टंचाई नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, एरवी पर्वरी व परिसरात पाण्याची समस्या उ‌द्भवत असे; परंतु पर्वरीतील १० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पर्वरीतील पाण्याची समस्या मिटली आहे. पर्वरीत आता टँकरची गरज राहिलेली नाही. तेथे टैंकर विनावापर राहतात.

बेतोड़ा पंचक्रोशीत कासारवाडा, दत्तगड आदी भागांत नळातून पाणीपुरवठा बंद झाला आहे. बार्देशमध्ये शिवोली मतदारसंघात आसगाव, हणजूण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. काणकोण तालुक्यालाही पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. माडीतळप, पोळे, दापट भागात लोकांना पाणी मिळत नाही.

साकोर्डा परिसरात पाच टँकरद्वारे पुरवठा

बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रगाडा नदीचे पात्र कोरडे पडल्याने तिथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईची कल्पना खात्याला आहे. मी तेथील सहायक अभियंत्याकडून आढावा घेतला असून, पाणीपुरवठ्यासाठी पाच टँकरची व्यवस्था केली जाईल. म्हापणे म्हणाले की, 'अनेकदा भूमिगत वीजवाहिन्या किंवा मलनिस्सारण वाहिन्या फोडल्या पोहोचत टाकताना जलवाहिन्या जातात. त्यामुळे नळांना पाणी नाही. जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार नित्याचेच बनले असून, ती मोठी डोकेदुखी ठरली आहे.

नळाच्या पाण्यात आढळले किडे

सांतआंदे मतदारसंघातील आजोशी मंडूर येथील घरांमध्ये नळांतून आलेल्या पाण्यात किडे आढळल्यानंतर तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आ आहे. सध्या या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात काल आमदार वीरेश बोरकर यांनी बांधकाम, आरोग्य खाते, पंचायत सदस्य व ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी आरोग्य खात्याचा याविषयी अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :goaगोवाwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातWaterपाणी