शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

नळ कोरडे.. टँकरही नाहीत.. वणवण सुरूच! लोकांचा संयम सुटू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2024 11:39 IST

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईमुळे लोक हैराण झाले आहेत. टैंकरही उपलब्ध नसल्याने दिवस तरी कसे काढावेत?, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. बेतोडा पंचायत क्षेत्रातील संतप्त रहिवाशांनी सोमवारी बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक देत घागर मोर्चा काढला.

धारबांदोड्यात रगाडा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे साकोर्डा व परिसरात नळाद्वारे पाणी बंद झाल्याने विहिरींवर महिलांची गर्दी उसळत आहे. काऱ्यामळ, बाराभूमी, धारगे गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टैंकरही मिळत नसल्याने लोकांचे हाल झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मार्ना, शिवोली येथे पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. लोकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल झाले. 

दरम्यान, म्हापणे यांनी इतर कोणत्याही भागांमध्ये पाणी टंचाई नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, एरवी पर्वरी व परिसरात पाण्याची समस्या उ‌द्भवत असे; परंतु पर्वरीतील १० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पर्वरीतील पाण्याची समस्या मिटली आहे. पर्वरीत आता टँकरची गरज राहिलेली नाही. तेथे टैंकर विनावापर राहतात.

बेतोड़ा पंचक्रोशीत कासारवाडा, दत्तगड आदी भागांत नळातून पाणीपुरवठा बंद झाला आहे. बार्देशमध्ये शिवोली मतदारसंघात आसगाव, हणजूण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. काणकोण तालुक्यालाही पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. माडीतळप, पोळे, दापट भागात लोकांना पाणी मिळत नाही.

साकोर्डा परिसरात पाच टँकरद्वारे पुरवठा

बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) संतोष म्हापणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रगाडा नदीचे पात्र कोरडे पडल्याने तिथे निर्माण झालेल्या पाणीटंचाईची कल्पना खात्याला आहे. मी तेथील सहायक अभियंत्याकडून आढावा घेतला असून, पाणीपुरवठ्यासाठी पाच टँकरची व्यवस्था केली जाईल. म्हापणे म्हणाले की, 'अनेकदा भूमिगत वीजवाहिन्या किंवा मलनिस्सारण वाहिन्या फोडल्या पोहोचत टाकताना जलवाहिन्या जातात. त्यामुळे नळांना पाणी नाही. जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार नित्याचेच बनले असून, ती मोठी डोकेदुखी ठरली आहे.

नळाच्या पाण्यात आढळले किडे

सांतआंदे मतदारसंघातील आजोशी मंडूर येथील घरांमध्ये नळांतून आलेल्या पाण्यात किडे आढळल्यानंतर तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आ आहे. सध्या या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात काल आमदार वीरेश बोरकर यांनी बांधकाम, आरोग्य खाते, पंचायत सदस्य व ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी आरोग्य खात्याचा याविषयी अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :goaगोवाwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातWaterपाणी