शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

संपादकीय: सरकार, पाणी देता का पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 13:31 IST

याच तथाकथित सुशिक्षित गोव्यात मार्च महिन्यातच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ लोकांवर आली आहे. 

एका बाजूने गोव्यात दारूचे थंड प्याले सायंकाळनंतर फसफसू लागले आहेत. नव्या हुर्राकाच्या तजेलदार गोष्टी सांगत काही राजकारणी युवकांवर मोहिनी टाकत आहेत. कुठे दारूच्या पाठ्य, तर कुठे बैठकांमध्ये लालबुंद कलिंगडावर ताव मारला जात आहे. मात्र, याच तथाकथित सुशिक्षित गोव्यात मार्च महिन्यातच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ लोकांवर आली आहे. 

पणजी शहरापासून अगदीच जवळ असलेल्या सांत आंद्रेत आताच नळ कोरडे पडले आहेत. काल महिला, मुली व पुरुषांना रस्त्यावर उतरावे लागले. अभियंत्यांना शोधत बांधकाम खात्याच्या पणजीतील कार्यालयात लोकांना यावे लागले. रणरणत्या उन्हात वृद्ध महिलांना देखील धावाधाव करावी लागली. सरकारला काळीज असेल तर सांत आंद्रेवासीयांचे हे हाल जरा तरी कळून येतील. मुक्तीनंतर साठ वर्षांनी देखील पाणी देता का पाणी, असे लोक सरकारला विचारत आहेत. कोणत्याही संवेदनशील माणसाला लोकांची ही अवस्था पाहून वाईट वाटेल. चारच दिवसांचे विधानसभा अधिवेशन पुरे असे म्हणत पळपुटेपणा करणाऱ्या सरकारला आणि विशेषतः सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना लोकांचे त्रास पाहून थोडे तरी वाईट वाटायला हवे. ते वाटत नसेल तर पूर्ण समाजालाच शरम वाटावी, असे नमूद करावे लागेल.

गोव्यात पूर्वी मे महिन्यात लोकांना पाण्यासाठी भटकावे लागत होते. आता मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याच्या शोधात नागरिकांना पणजीला धाव घ्यावी लागत आहे. म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळविल्यानंतर गोव्यात काय संकट उभे राहील, हे यावरून मुख्यमंत्री सावंत तसेच काही लोकांना देखील कळून येईल, घशाला कोरड पडणे आतापासूनच सुरू झालेय. 

एप्रिल आणि मे महिन्यात गोव्यातील अनेक गावांना पाण्यासाठी तळमळावे लागेल. पेडणे व मांद्रे मतदारसंघातील काही गावांमध्ये चार-चार दिवस पाणी येत नाही. टैंकर्सची प्रतीक्षा करत लोकांना बसावे लागते. सत्तरी तालुक्यातील अनेक गावांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. शापोरा, वाळवंटी, खांडेपार, उसगाव, तेरेखोल, साळ, रगाडा, कुशावती, मांडवी, जुवारी अशा अनेक नद्या या प्रदेशात आहेत. धरणे आहेत. शेकडो कोटी रुपये दरवर्षी बांधकाम खाते व जलसंधारण खाते पाणीपुरवठा योजना व प्रकल्पांवर खर्च करते. लोकांच्या घरी नळाला पाणी येत नसेल तर हा पैसा जातो तरी कुठे? यापूर्वीचे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक पाऊसकर आणि आताचे मंत्री नीलेश काब्राल यांनीही या प्रश्नाचे उत्तर द्यावे. 

गेले काही दिवस विविध तालुक्यांतील तीव्र पाणी समस्येच्या बातम्या सगळीकडे झळकत आहेत. रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकत्यांनी कोरड्या नळांची, टँकरसाठी थांबलेल्या लोकांची आणि पाण्यासाठी मनातून रडणाऱ्या ग्रामीण महिलांची छायाचित्रे अलीकडे सोशल मीडियावरून सर्वांसमोर आणली. सगळे मंत्री आमदार अलीकडे मंदिरे, धार्मिक सोहळे, मठ आणि स्वामींना मिठी मारत फिरत असताना जनता मात्र पाण्यासाठी वणवण भटकतंय. सर्दी-खोकल्याची, तापाची साथ सगळीकडे आहे. पाणी उकळून घ्या, असे सोनेरी सल्ले टीव्हीवरून आपले राजकारणी देतात. उकळण्यासाठी घरात नळाला पाणीच नाही. यामुळे युवकांच्या मनात संतापाची उकळी सुरू आहे. उसगावच्या लोकांनीही पाण्यासाठी कालच मोर्चा काढला. यापुढे घागर मोर्चा आणण्याचाही त्यांनी इशारा दिला. 

शिमगे, कार्निव्हल, फिश फेस्टिव्हल, फूड फेस्टिव्हल यावर कोट्यांनी पैसे खर्च करणारे आणि चारच दिवसांचे अधिवेशन घेणारे आपले लोकप्रतिनिधी पाणी समस्येवर मात्र तोडगा काढत नाहीत. गलेलठ्ठ पगार घेणारे व मोठी सुटलेली पोटे घेऊन एसी केबिनमध्ये बसणारे बांधकाम खात्याचे अभियंते यांचे महिलांनी कान पकडण्याची वेळ आता आली आहे. महिला दिन ग्रामीण भागातील महिलांनी तरी अशाच प्रकारे साजरा करावा. काल आमदार वीरेश बोरकर आणि सांत अद्रिच्या लोकांनी मोर्चा काढला. सरकार पाणी देता का पाणी असे अनेक मतदारसंघातील लोक विचारत असताना सरकारी यंत्रणेने कान व डोळे उघडे ठेवून समाजाची वेदना ऐकावी व उपाय काढावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा