शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

गोव्यात पाणीप्रश्नी सत्ताधारी भाजपाचेच आमदार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 11:07 IST

गोव्यात पिण्याच्या पाण्याच्या विषयावरून प्रथमच आता सत्ताधारी भाजपाचेच आमदार खूप आक्रमक बनले आहेत.

पणजी - गोव्यात पिण्याच्या पाण्याच्या विषयावरून प्रथमच आता सत्ताधारी भाजपाचेच आमदार खूप आक्रमक बनले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागावर (पीडब्ल्यूडी) भाजपाचेच आमदार धडक देऊ लागले असून पाणी पुरवठा व्यवस्था सुधारावी म्हणून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आग्रह धरला आहे. खुद्द गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी तीव्र संताप व्यक्त करत पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांचे कान उपटले आहेत.

गोव्याच्या विविध भागांत एरव्ही एप्रिल आणि मे महिन्यात नळ कोरडे पडतात. यावेळी मात्र जानेवारीपासूनच नळाच्या पाण्याने लोकांना हैराण करणो सुरू केले आहे. 2018 साल हे पिण्याच्या पाण्याची समस्या घेऊनच गोव्यात उजाडले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे आहे. भाजपाच्या काही आमदारांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशीही गेल्या दोन दिवसांत संपर्क साधला व आपल्या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली. सभापती प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या मतदारसंघात पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना याची कल्पना दिली आहे.

भाजपाचे मये मतदारसंघातील आमदार प्रविण झाटय़े हे सहसा कधी आक्रमक बनत नाहीत. मात्र मये मतदारसंघातील लोकांनाही नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा नीट पुरवठा होत नाही. यामुळे झाटय़े यांनी पाणी पुरवठा विभागात येऊन तेथील अधिका-यांना फैलावर घेतले. डिचोली तालुक्यासाठी किती पाणी येते व किती तुटवडा आहे याविषयीचा डेटा सादर करा, अशी मागणी आमदार झाटय़े यांनी केली पण नीट डेटादेखील अधिकारी आमदारांना सादर करू शकले नाहीत. बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाचे डिचोली व साखळीतील अधिकारी हे अत्यंत बेजबाबदार बनले आहेत अशी टीका सभापती सावंत यांनी केली. एका पाणी प्रक्रिया प्रकल्पालाही सावंत यांनी अचानक भेट दिली व तेथील दुरवस्था पाहिली.

दोन दिवस डिचोली तालुक्यातील अनेक महिला व पुरुषांनी मिळून पाणी पुरवठा विभागावर मोर्चेही नेले. गोवा हे पर्यटन राज्य असून रोज चोवीस तास अखंडीतपणो नळाद्वारे पाणी पुरविण्याच्या घोषणा सरकार गेली सहा वर्षे करत आहे. मात्र म्हापसासारख्या शहरी मतदारसंघात देखील सरकार नीट पाणी पुरवू शकत नाही यामुळे खुद्द नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोव्यात एकूण चार मोठी धरणो असून वार्षिक कोट्यवधी रुपये सरकार पाणी पुरवठाविषयक कामांवर खर्च करते पण कधी किनारपट्टीत तर कधी शहरी व ग्रामीण भागांमध्ये लोकांचे नळ कोरडे पडत असल्याने लोक शासकीय कारभाराविषयी संताप व्यक्त करत आहेत.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीBJPभाजपा