शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

जलवाहिन्या फुटू लागल्या, रविवारी तरी संपणार का पाणी समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 11:53 AM

फोंडा तालुक्यात जिथे भींत पडून दोन जलवाहिन्या फुटल्या तिथे भींत पडू शकते याची कल्पना लोकांना आली होती.

पणजी - पावसाळ्याचा मोसम असला तरी, गोव्यात जलवाहिन्या फुटू लागल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तिसवाडी आणि फोंडा या दोन तालुक्यांमधील नळ गेले तीन दिवस कोरडे आहेत. जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. कदाचित रविवारी रात्रीर्पयत किंवा सोमवारी दुरुस्ती काम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

फोंडा तालुक्यात जिथे भींत पडून दोन जलवाहिन्या फुटल्या तिथे भींत पडू शकते याची कल्पना लोकांना आली होती. जोरदार पाऊस होता व त्यामुळे भींत पडेल आणि जलवाहिन्या फुटतील हे कळत होते. पण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना त्याची कल्पना आली नाही. जलवाहिन्यांखाली मातीच नव्हती. जलवाहिन्या वर होत्या, त्यांना खाली कोणता आधार नसल्याने त्या फुटतील हे कळून येत होते, अशी चर्चा सोशल मीडियावरही सुरू आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री दिपक पाऊसकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की सध्या जलवाहिन्यांच्या खाली सिमेंट काँक्रिटचे काम केले जात आहे. पाऊस नसल्याने हे काम जोरात सुरू आहे. पाऊस सुरू असता तर कामात व्यत्यय आला असता. पावसाने विश्रंती घेतल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होईल. लोकांना त्रास होतोय याची सरकारला कल्पना आहे. बांधकाम खात्याकडील टँकरची संख्याही कमी पडत आहे. तथापि, आम्ही खासगी क्षेत्रतून टँकर मागविले आहेत. अनेक भागांत टँकर पाठवून पाणी समस्येवर मात करण्याचा प्रयत्न होत आहे.

दरम्यान, राजधानी पणजीसह सांताक्रुझ, सांतआंद्रे, ताळगाव, कुंभारजुवे, प्रियोळ, फोंडा अशा सात- आठ मतदारसंघातील हजारो कुटूंबे सध्या पाणी समस्येने त्रस्त झाली आहेत. अनेकांनी आपल्या कुटूंबांना गावी पाठवून दिले आहे. पाणी समस्येला कंटाळून राजधानी पणजीतील अनेक लोकांनी आपल्या फ्लॅटला कुलूप लावले आणि आपले मूळ गाव गाठले आहे. रविवारी किंवा सोमवारी तरी पाण्याची समस्या संपुष्टात यायला हवी, असे शहरातील लोकांना वाटते. अनेक भागांत टँकरही पोहचत नाही. दुकानदारांकडील पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही संपल्या आहेत. काही जणांनी बाटल्यांचे दर वाढविले तर खासगी क्षेत्रातील टँकरांनीही प्रचंड शुल्क आकारणे सुरू केले आहे. 

टॅग्स :Waterपाणीgoaगोवा