शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गोव्यात माध्यान्ह आहार पुरवठ्याचे काम ‘अक्षय पात्रा’कडे सोपविण्याबाबत द्विधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:36 IST

गोव्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविण्याचे काम अक्षय पात्रा फाउंडेशनकडे सोपवावे की नाही याबाबत सरकार व्दिधा मन:स्थितीत आहे. सध्या राज्यातील १0५ महिला स्वयंसाहाय्य गटांकडे हे काम आहे.

पणजी : गोव्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविण्याचे काम अक्षय पात्रा फाउंडेशनकडे सोपवावे की नाही याबाबत सरकार व्दिधा मन:स्थितीत आहे. सध्या राज्यातील १0५ महिला स्वयंसाहाय्य गटांकडे हे काम आहे.वरील फाउंडेशनकडे हे काम सोपविल्यास स्वयंसाहाय्य गटांना फाटा द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी सरकारचे प्राधान्य आहे. परंतु हे काम फाउंडेशनकडे सोपवले गेल्यास १0५ स्वयंसाहाय्य गटांना काम राहणार नाही. बंगळूरु येथील इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेशी संलग्न असलेल्या अक्षय पात्रा फाउंडेशनचा माध्यान्ह आहार कु जिरा येथील शैक्षणिक संकुलातील शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेला आहे. राज्यातील इतर ठिकाणच्या शाळांनाही हा आहार पुरविण्याचे कंत्राट या फाउंडेशनला देण्याबाबत अभ्यास चालू आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी यात जातीने लक्ष घालून स्वयंसाहाय्य गटांकडून आरोग्यवर्धक आणि दर्जेदार आहार दिला जात आहे याची कटाक्षाने शहानिशा करीत आहेत. तसे आदेश त्यांनी शिक्षण खात्याला दिलेले आहेत. अक्षय पात्रा फाउंडेशनकडून आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू, तेलंगणा व उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये मिळून सुमारे १६ लाखांपेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविला जातो. आहारात दिल्या जाणाºया अन्न पदार्थांमध्ये त्या त्या प्रांतानुसार बदलही करण्यात आलेले आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये भाताऐवजी चपाती, डाळ, भाजी व गोड पदार्थ दिला जातो.   

टॅग्स :goaगोवाStudentविद्यार्थीSchoolशाळा