शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Video : वास्कोत अशोका वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा दुर्देंवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:03 PM

जेव्हा तो वास्कोच्या स्वतंत्रपथ मार्गावर पोचला त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे अशोका वृक्ष येथे असलेल्या वीज खांब्यावर कोसळून ह्या खांब्यावर असलेल्या वीज वाहीनीसहीत झाड रस्त्यावर कोसळले

वास्को: शनिवारी (दि.२२) पहाटे वास्कोतील स्वतंत्रपथ मार्गावर असलेले भलेमोठे जुने अशोका वृक्ष कोसळले असून यात खालून दुचाकीने जाणाऱ्या सतीश गोपाळ गावकर (वय ४१) ह्या इसमाचा दुर्देंवी अंत झाला. धारबांदोडा येथे राहणारा सतीश कामासाठी सकाळी सडा, मुरगाव येथे येत असताना हे झाड वीज खांब्यावर कोसळल्यानंतर त्याच्यावर असलेली एक वीज वाहीनी सतीशच्या गळ्यात अडकून मान तुटल्याने तो जागीच मरण पोचल्याची माहीती वास्को पोलीसांनी दिली.

वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रितेश तारी यांनी दिलेल्या माहीतीनुसार पहाटे ६.१५ च्या सुमारास  सदर घटना घडली. सतीश अवजड वाहन चालवण्याचे काम करत असून सकाळी तो सडा येथे तांदळाचा साठा भरून ठेवलेले वाहन नेण्यासाठी आपल्या ‘पल्सर’ दुचाकीने येत होता. जेव्हा तो वास्कोच्या स्वतंत्रपथ मार्गावर पोचला त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे अशोका वृक्ष येथे असलेल्या वीज खांब्यावर कोसळून ह्या खांब्यावर असलेल्या वीज वाहीनीसहीत झाड रस्त्यावर कोसळले. सदर घटनेत दुचाकीने जाणाºया सतीशच्या गळ्यात वीज वाहीनी अडकल्याने दुचाकीवरील ताबा जाऊन त्याला अपघाताच्या सामोरे जावे लागले. ह्या घटनेत सतीश जागीच मरण पोचल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक रितेश तारी यांनी दिली. पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करून नंतर सतीशचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. सदर घटनेत सतीशची मान तुटल्याने तो जागीच मरण पोचल्याची माहीती शवचिकित्सेत स्पष्ट झाल्याचे उपनिरीक्षक तारी यांनी सांगितले.

वीज वाहीनी तुटून त्याच्या गळ्यात अडकल्याने त्याला वीजेचा झटका बसला होता काय याबाबत उपनिरीक्षक तारी यांना विचारले असता त्याला वीजेचा झटका बसला नसल्याची माहीती त्यांनी दिली. मयत सतीशच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. सतीश काही काळापासून उसगाव येथे राहत असून पहाटे तो कामासाठी बाहेर निघाल्यानंतर ४५ किलोमीटर दूर असलेल्या वास्को शहरात त्याचा अशा प्रकारे दुर्देवी अंत झाल्याची माहीती त्याच्या गावात पसरताच त्यांना धक्काच बसला. वास्को स्वतंत्रपथ मार्गावर कोसळलेले हे भलेमोठे अशोका वृक्ष भरपूर जुने असून यामुळे भविष्यात धोका निर्माण होण्याची भीती यापूर्वी अनेकांनी व्यक्त केली होती. यापूर्वी वास्कोतील जुनी भलीमोठी वृक्ष कोसळण्याच्या काही घटना घडलेल्या असून शहरात अशा प्रकारची अन्यकाही जुनी धोकादायक वृक्षे आहेत. सतीश गावकर सारख्या अन्य कोणी निष्पाप नागरीकाचा भविष्यात जीव न जावा यासाठी मुरगाव नगरपालिकेने व संबंधित विभागाने याबाबत त्वरित अचुक पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.