शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेती झाली आडवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:44 IST

भात गळून पडणे, कोंब येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: दिवाळीनंतर मागील तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसातून बार्देश तालुक्यातील बऱ्याच भागात पिकलेली भातशेती आडवी झाली. पडणाऱ्या पावसाने उसंती न घेतल्यास तसेच त्याची वेळेवर कापणी न झाल्यास भातपीकाला पुन्हा कोंब येण्याची किंवा कुजण्याची भिती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

बार्देश भागात पिकलेल्या भात पिकाची कापणी करण्याचे काम बऱ्याच भागातून सुरू आहे. अवकाळी पावसामुळे भातकापणीला अडथळे निर्माण झाले आहेत. कापणीच्या प्रतिक्षेत असलेली उभे पीक आडवे झाले आहेत. काही शेती मात्र भाताची कापणी करणाऱ्या मशीनच्या प्रतिक्षेत आडवी झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली. सुकूर, गिरी, हळदोणा, बस्तोडा, मयडे, उसकई, थिती, सांगोल्डा, कालवी, पोंबुर्का परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे.

पुढील काही दिवसात भातपिकाची कापणी व्हावी आणि पिकलेले भात सुरक्षीत रहावे यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. अवकाळी पाऊस न थांबल्यास शेतकऱ्याचे अजुन नुकसान होणार आहे.

मजुरांची कमतरता

बार्देश तालुक्यातील भातशेतीच्या काही भागात पाणी साचल्याने कापणीसाठी आणलेल्या मशीनला अडथळा निर्माण झाला आहे. पयार्य म्हणून कामगारांद्वारे भातकापणी करावयाची झाल्यास कामगारांची कमतरता भासून येत आहे. त्यामुळे भातकापणी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यावर दुहेरी संकट

तालुक्यात दुपारनंतर पाऊस येत असल्यामुळे कापणी करणे शक्य होत नाही. कापणीयोग्य झालेले भातपीक शेतात उभे राहिले तरी देखील गळून पडण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस कोसळल्यानंतरही नुकसान होण्याची भिती असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

भात कापणीसाठी ३२ मशीन्स उपलब्ध

कृषी विभागीय कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शेती आडवी झाली असली तरी ती खराब झाल्याची किंवा अंकुरल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. शेती खराब होऊ नये त्यांची वेळीच कापणी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. बार्देश तालुक्यात कापणीसाठी सेवा पुरवणाऱ्यांकडून ३२ मशीन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु पाऊस संध्याकाळी लवकर हजेरी लावत असल्याने कापणीचे काम निर्धारीत वेळेपूर्वी आटोपते घेणे भाग पडत आहे.

हमलात पावसामुळे शेतकऱ्यांची धावाधाव

दीपावली दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाविक तसेच शेतकऱ्यांची बरीच धावाधाव झाली. भातपीक तसेच आकाशकंदील भिजल्याने नुकसान सोसावे लागल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापणीयोग्य झालेल्या पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसून आली.

गेले कित्येक दिवस शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त होते. कित्येकांनी शेत पिकाची मचाण करून ठेवले होते तर काहींनी भात कापून जमिनीवर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी कापून ठेवलेले भात गोळा करणार होते, मात्र रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्याची धांदल उडाली. पाण्यात पीक राहिल्याने नुकसान सोसावे लागल्याचे शेतकरी बाप्पा शेठकर यांनी सांगितले.

मुलांची निराशा

अचानक पावसामुळे घराच्या छप्परावर लावलेले आकाशकंदील पावसात भिजले. अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. नवीन आकाशकंदील घेणे शक्य झाले नसल्यामुळे संपूर्ण रात्र आकाशकंदील अभावी गेली. अवकाळी पावसामुळे मात्र मुलांच्या कला कौशल्याची निराशा झाली असे पालक हेमचंद्र नाईक यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Untimely Rain Devastates Farmers; Harvest-Ready Paddy Fields Flattened.

Web Summary : Untimely rains in Bardez, Goa, have flattened harvest-ready paddy fields, causing significant losses to farmers. Delayed harvesting and labor shortages compound the problem, raising fears of crop spoilage. Farmers face a double crisis as rains disrupt harvesting, threatening yields and causing widespread disappointment.
टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीRainपाऊसfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र