शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

गोव्यात संजीवनी साखर कारखान्यात गळीत हंगामाच्या प्रारंभीच टर्बाइनमध्ये बिघाड, राज्यातील ऊस उत्पादकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:39 IST

गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याची या गळीत हंगामात ‘नमनालाच कुजका नारळ’ अशी गत झाली आहे.

पणजी : गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याची या गळीत हंगामात ‘नमनालाच कुजका नारळ’ अशी गत झाली आहे. टर्बाइनमधील तांत्रिकी बिघाडामुळे काही दिवस गाळप बंद राहिल्याने त्याचा फटका ऊस राज्यातील ऊस उत्पादकांनाही बसला.१४ नोव्हेंबर रोजी या कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला. तेव्हा कारखान्यातील तांत्रिकी दुरुस्तीचे काम बाकी होते परंतु घिसाडघाईने गळीत हंगाम सुरु करण्यात आल्याचा आरोप केला जातो. मात्र कारखान्याचे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावताना तांत्रिकी समस्या आता दूर झालेली असल्याचा व पूर्ण वेगाने कारखाना सुरु असल्याचा दावा केला.

अकार्यक्षमतेचा ठपका मुख्य अभियंता आर. माने यांना काही काळापूर्वी निलंबित केले होते. त्यामुळे तेही कारखान्यात नाहीत. टर्बाइनमधील तांत्रिकी बिघाड दूर करण्यासाठी अलाहाबाद येथील त्रिवेणी टर्बाईन कंपनीच्या तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले. कारखान्याचे मुख्य युनिट ४५ वर्षे जुने आहे. दरवर्षी त्याची दुरुस्ती करावी लागते. २0१२ १३ मध्ये दुरुस्तीवर दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. कोणताही बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी गोव्यात तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळे शेजारी महाराष्ट्र किंवा कर्नाटकात धाव घ्यावी लागते. गेल्या मोसमात २७ नोव्हेंबर २0१६ ते ३१ जानेवारी २0१७ असे ६६ दिवस गळीत हंगाम चालला. या काळात ४0,२३४ मेट्रिक टन ऊस स्थानिक शेतक-यांकडून या कारखान्याला मिळाला.

या वर्षी गोव्यातील ५0 हजार टन आणि शेजारी कर्नाटकातील १ लाख टन मिळून दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गत साली ऊस गाळपातून सुमारे ८.३८ टक्के इतका उतारा मिळाला आणि ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा रामनगर, हल्याळ, अळणावर, हेब्बाळ आदी भागांबरोबरच यावर्षी खानापूर येथूनही ऊस आयात केला जाणार आहे. दुसरीकडे कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे. त्यांना या क्षेत्रात तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे.

ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की,त्यांनी ऊस कापणीसाठी शेजारच्या राज्यातून ३२ मजूर आणले होते. परंतु कारखाना सुरुच होऊ न शकल्याने कापणी होऊ शकली नाही. हा ऊस वाया जाण्याची भीती आहे. ऊस एवढ्यात कापू नका, असा सल्ला कारख्यान्याचे अधिकारीच देऊ लागले आहेत. या व्यतिरिक्त ऊस कापणी व वाहतुकीसाठी औरंगाबादच्या कंपनीला कारखान्याने ५ कोटी रुपये दिले आहेत.

दरम्यान, घाईघाईत गळीत हंगाम सुरु करण्याची कार गरज होती असा सवाल सावर्डचे आमदार दीपक पावस्कर यांनी केला आहे. कारखाना पूर्ण वेगाने कार्यरत न राहिल्यास ऊस उत्पादन वाया जाईल, अशी भीती शेतकºयांना आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीgoaगोवा