शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

गोव्यात संजीवनी साखर कारखान्यात गळीत हंगामाच्या प्रारंभीच टर्बाइनमध्ये बिघाड, राज्यातील ऊस उत्पादकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:39 IST

गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याची या गळीत हंगामात ‘नमनालाच कुजका नारळ’ अशी गत झाली आहे.

पणजी : गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याची या गळीत हंगामात ‘नमनालाच कुजका नारळ’ अशी गत झाली आहे. टर्बाइनमधील तांत्रिकी बिघाडामुळे काही दिवस गाळप बंद राहिल्याने त्याचा फटका ऊस राज्यातील ऊस उत्पादकांनाही बसला.१४ नोव्हेंबर रोजी या कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला. तेव्हा कारखान्यातील तांत्रिकी दुरुस्तीचे काम बाकी होते परंतु घिसाडघाईने गळीत हंगाम सुरु करण्यात आल्याचा आरोप केला जातो. मात्र कारखान्याचे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावताना तांत्रिकी समस्या आता दूर झालेली असल्याचा व पूर्ण वेगाने कारखाना सुरु असल्याचा दावा केला.

अकार्यक्षमतेचा ठपका मुख्य अभियंता आर. माने यांना काही काळापूर्वी निलंबित केले होते. त्यामुळे तेही कारखान्यात नाहीत. टर्बाइनमधील तांत्रिकी बिघाड दूर करण्यासाठी अलाहाबाद येथील त्रिवेणी टर्बाईन कंपनीच्या तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले. कारखान्याचे मुख्य युनिट ४५ वर्षे जुने आहे. दरवर्षी त्याची दुरुस्ती करावी लागते. २0१२ १३ मध्ये दुरुस्तीवर दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. कोणताही बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी गोव्यात तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळे शेजारी महाराष्ट्र किंवा कर्नाटकात धाव घ्यावी लागते. गेल्या मोसमात २७ नोव्हेंबर २0१६ ते ३१ जानेवारी २0१७ असे ६६ दिवस गळीत हंगाम चालला. या काळात ४0,२३४ मेट्रिक टन ऊस स्थानिक शेतक-यांकडून या कारखान्याला मिळाला.

या वर्षी गोव्यातील ५0 हजार टन आणि शेजारी कर्नाटकातील १ लाख टन मिळून दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गत साली ऊस गाळपातून सुमारे ८.३८ टक्के इतका उतारा मिळाला आणि ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा रामनगर, हल्याळ, अळणावर, हेब्बाळ आदी भागांबरोबरच यावर्षी खानापूर येथूनही ऊस आयात केला जाणार आहे. दुसरीकडे कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे. त्यांना या क्षेत्रात तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे.

ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की,त्यांनी ऊस कापणीसाठी शेजारच्या राज्यातून ३२ मजूर आणले होते. परंतु कारखाना सुरुच होऊ न शकल्याने कापणी होऊ शकली नाही. हा ऊस वाया जाण्याची भीती आहे. ऊस एवढ्यात कापू नका, असा सल्ला कारख्यान्याचे अधिकारीच देऊ लागले आहेत. या व्यतिरिक्त ऊस कापणी व वाहतुकीसाठी औरंगाबादच्या कंपनीला कारखान्याने ५ कोटी रुपये दिले आहेत.

दरम्यान, घाईघाईत गळीत हंगाम सुरु करण्याची कार गरज होती असा सवाल सावर्डचे आमदार दीपक पावस्कर यांनी केला आहे. कारखाना पूर्ण वेगाने कार्यरत न राहिल्यास ऊस उत्पादन वाया जाईल, अशी भीती शेतकºयांना आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीgoaगोवा