शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट; शेतकऱ्यांचा संताप, काम तत्काळ थांबवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:52 IST

सरकारकडून डोळस कारभाराचा अभाव; तिसरी पिढी घेते उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा पोहोचवण्याचे सरकारचे तंत्रज्ञान खाते सक्षमपणे कार्यरत असले तरी प्रत्यक्षात डोळस कारभाराचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील काजू आणि आंबा बागायती असलेल्या जमिनी टॉवर उभारणीसाठी कंपन्यांना देण्यात येत असून शेतकऱ्यांना हुसकावून लावत आहे. त्यामुळे काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट कोसळल्याने स्थानिक शेतकरी व बागायतदारांमध्ये संताप उसळला आहे.

आमदार जीत आरोलकर यांना ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. त्यांनी या भागात कोणतीही कंपनी पुढे येणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १६ रोजी संबंधित कंपनीचे अधिकारी व कामगार पोलिस बंदोबस्तासह दाखल झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या कंपनीचा अधिकारी स्थानिक नागरिकांना मामलेदार कार्यालयातून काम बंद करण्यासाठी नोटीस आणल्यानंतर काम बंद करू असे सांगतो. मात्र, काम सुरू करण्यासाठीची नवीन ऑर्डर दाखवा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक कुणाल नाईक यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

तिसरी पिढी घेते उत्पन्न

केपकरवाडा येथील डोंगर व बागायती क्षेत्रात एका कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास सरकारने परवानगी दिल्याचे समजते. सदर जागा विनोंडकर कुटुंबीयांची असून त्यांची तिसरी पिढी काजू व इतर पिकांचे उत्पादन घेत आहे. त्या जागेवरील हक्कासाठी त्यांनी उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयात अर्ज दाखल केले असून, टॉवर उभारणीस हरकत नोंदवली आहे. मात्र, प्रशासनाकडून या अर्जावर विलंब होत असल्याने प्रक्रिया रखडली आहे.

सरकार कोणत्या अधिकारावर शेतकऱ्यांच्या लागवडीच्या जमिनी टॉवरसाठी हस्तांतरित करते. शेतकरी कष्ट करून जमीन विकत घेतो, मात्र सरकार उत्पन्नाचे साधन हिरावत आहे. - नारायणदास विर्नोडकर, ज्येष्ठ नागरिक.

सदर जागेपासून काही अंतरावरच सरकारची मालकीची जमीन असून, त्या जागेत सरकारी इमारती आणि कार्यालये आहेत. तेथेच टॉवर उभारावा. शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर गदा आणून नये. - गंगाराम केपकर, ग्रामस्थ.

या टॉवरमुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडेल तसेच आरोग्यविषयक समस्या वाढतील. एकदा का ही जागा ताब्यात गेली की संपूर्ण डोंगराचा नाश होईल. - प्रेमदास विर्नोडकर, स्थानिक युवक. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tower Threatens Cashew-Mango Orchards; Farmers Protest, Demand Work Stoppage

Web Summary : Farmers in Harmal protest the construction of a mobile tower on cashew and mango orchards. Despite assurances, work began with police presence, sparking outrage. Locals demand authorities intervene, citing threats to livelihoods and the environment. The third generation of a family is affected.
टॅग्स :goaगोवाMangoआंबाMangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी