शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट; शेतकऱ्यांचा संताप, काम तत्काळ थांबवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:52 IST

सरकारकडून डोळस कारभाराचा अभाव; तिसरी पिढी घेते उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा पोहोचवण्याचे सरकारचे तंत्रज्ञान खाते सक्षमपणे कार्यरत असले तरी प्रत्यक्षात डोळस कारभाराचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील काजू आणि आंबा बागायती असलेल्या जमिनी टॉवर उभारणीसाठी कंपन्यांना देण्यात येत असून शेतकऱ्यांना हुसकावून लावत आहे. त्यामुळे काजू-आंबा बागायतीवर 'टॉवर'चे संकट कोसळल्याने स्थानिक शेतकरी व बागायतदारांमध्ये संताप उसळला आहे.

आमदार जीत आरोलकर यांना ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. त्यांनी या भागात कोणतीही कंपनी पुढे येणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १६ रोजी संबंधित कंपनीचे अधिकारी व कामगार पोलिस बंदोबस्तासह दाखल झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या कंपनीचा अधिकारी स्थानिक नागरिकांना मामलेदार कार्यालयातून काम बंद करण्यासाठी नोटीस आणल्यानंतर काम बंद करू असे सांगतो. मात्र, काम सुरू करण्यासाठीची नवीन ऑर्डर दाखवा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक कुणाल नाईक यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

तिसरी पिढी घेते उत्पन्न

केपकरवाडा येथील डोंगर व बागायती क्षेत्रात एका कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास सरकारने परवानगी दिल्याचे समजते. सदर जागा विनोंडकर कुटुंबीयांची असून त्यांची तिसरी पिढी काजू व इतर पिकांचे उत्पादन घेत आहे. त्या जागेवरील हक्कासाठी त्यांनी उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयात अर्ज दाखल केले असून, टॉवर उभारणीस हरकत नोंदवली आहे. मात्र, प्रशासनाकडून या अर्जावर विलंब होत असल्याने प्रक्रिया रखडली आहे.

सरकार कोणत्या अधिकारावर शेतकऱ्यांच्या लागवडीच्या जमिनी टॉवरसाठी हस्तांतरित करते. शेतकरी कष्ट करून जमीन विकत घेतो, मात्र सरकार उत्पन्नाचे साधन हिरावत आहे. - नारायणदास विर्नोडकर, ज्येष्ठ नागरिक.

सदर जागेपासून काही अंतरावरच सरकारची मालकीची जमीन असून, त्या जागेत सरकारी इमारती आणि कार्यालये आहेत. तेथेच टॉवर उभारावा. शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर गदा आणून नये. - गंगाराम केपकर, ग्रामस्थ.

या टॉवरमुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडेल तसेच आरोग्यविषयक समस्या वाढतील. एकदा का ही जागा ताब्यात गेली की संपूर्ण डोंगराचा नाश होईल. - प्रेमदास विर्नोडकर, स्थानिक युवक. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tower Threatens Cashew-Mango Orchards; Farmers Protest, Demand Work Stoppage

Web Summary : Farmers in Harmal protest the construction of a mobile tower on cashew and mango orchards. Despite assurances, work began with police presence, sparking outrage. Locals demand authorities intervene, citing threats to livelihoods and the environment. The third generation of a family is affected.
टॅग्स :goaगोवाMangoआंबाMangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी