शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

नेटवर्क शोधण्यासाठी रोज करावी लागते दोन किलोमीटरची पायपीट; ऑनलाईन शिक्षणाचे तीन तेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 8:01 PM

नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल

मडगाव: लॉकडाऊच्या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण हा परवलीचा शब्द बनला असला तरी नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ती मोठी अडचण बनली आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी त्यांना रोज दोन किलोमीटरची पायपीट करत डोंगरमाथा गाठण्याची पाळी आली आहे.

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील कुमारी, पोत्रे , भाटी या गावातील विद्यार्थ्यांची ही व्यथा आहे. त्यांच्या भागात मोबाईल टॉवर नसल्याने हे शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. या गावातील सुमारे 20 ते 30 विद्यार्थी त्यासाठी रोज सकाळी आठ वाजता डोंगरमाथा चढू लागतात. डोंगर माथ्यावर आल्यानंतरच आम्हाला रेंज मिळते अशी माहिती वेर्णा येथे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या नीलिमा येडको ह्या विद्यार्थिनीने सांगितले. दुपारी एक वाजता ही मुले खाली उतरून येतात पण दुपारी 2 वाजता त्यांना परत डोंगर चढावा लागतो. ज्यांची घरे दूर आहेत ती मुले जेवणाचा डबा घेऊनच येतात असे तिने सांगितले.

नेत्रावळी गावात बीएसएनएलचा मोबाईल टॉवर आहे पण तो व्यवस्थित चालत नाही त्यामुळे गावात कुणालाही रेंज असत नाही. जर काही उंचावर गेल्यास ही रेंज मिळू शकते त्यामुळेच ही मुले मुली एकत्र येऊन जंगल भागात रोज शिकायला जात असतात. 'आम्हाला माळरानात उघड्यावर बसून शिकावे लागते. जर पाऊस आला तर छत्रीच्या आडोशाला राहावे लागते. कित्येकवेळा पावसामुळे नेटवर्कची रेंज जाते, त्यामुळे पाऊस थांबण्याची आम्हाला वाट पाहावी लागते,' अशी माहिती केपे महाविद्यालयात शिकणाऱ्या पवित्रा गावकर हिने दिली.

हा जंगली भाग असल्याने साप आणि अन्य प्राणी या भागात फिरत असतात पण नाईलाजाने आम्हाला जीव धोक्यात घालून तिथे जावे लागते असे ती म्हणाली. याच भागात राहणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्या राखी नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर सरकारचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून आपण हा विषय केंद्रीय दूरसंचार मंत्र्यापर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.खरे तर या समस्येवर राज्य सरकार आणि स्थानिक खासदारांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची गरज होती पण सगळे सुस्त बसले आहेत असे त्यांनी खेदाने म्हटले.

टॅग्स :goaगोवाStudentविद्यार्थी