शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:16 IST

'साळावली'त ९७ दिवस तर 'तिळारी'त १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती मंत्र्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी उच्चस्तरीय बैठकीत धरणांच्या स्थितीचा आढावा घेतला. 'साळावली'त ९७ दिवस तर 'तिळारी'त १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती मंत्र्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

राज्यातील सर्व धरणांमधील जलाशयांच्या तसेच गोवा-महाराष्ट्राच्या तिळारी धरण प्रकल्पातील स्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. पाण्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. बार्देश, डिचोली, पेडणे तालुक्यांना पाणी पुरवणाऱ्या तिळारी धरणात १०४ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला तरी समस्या उद्भवणार नाही. संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणात ९७ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. चापोली धरणात २०० दिवस पुरेल एवढा तर अंजुणे व पंचवाडी धरणात ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. आमठाणे जलाशयातील पाणी कमी झाल्यास साळ येथील शापोरा नदीतून पंपिंग करून पाणी घेतले जाते.

दरम्यान, कडक उन्हामुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होऊ लागल्याने धरणे आटत चालली आहेत. त्यातच पाण्याचा वापरही वाढलेला आहे. सध्या पाण्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नसली तरी कोणीही पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन मंत्री शिरोडकर यांनी केले आहे.

अस्नोड्याचा १३० एमएलडी पाणी प्रकल्प व पर्वरीचा १५ एमएलडी प्रकल्प तिळारीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. तिळारीचे पाणी कमी झाल्यास साळ येथील शापोरा नदीचे पाणी आमठाणेत पंपिंग करून घेतले जाते व तेथून ते अस्नोडा प्रकल्पाला पुरवले जाते. तिळारी किंवा अन्य धरणांच्या कालव्यांमधून बागायतींना दिले जाणारे पाणी दरवर्षीप्रमाणे येत्या १५ मे पासून दरदिवसाआड किंवा मर्यादित दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या राज्यातील बहुतेक सर्वच पाणीपुरवठा प्रकल्पांची क्षमता वाढण्याचे काम सुरू आहे.

चापोली धरणावर मॉनिटरिंग सिस्टम

काणकोण तालुक्यातील चापोली धरणावर जलसंपदा व्यवस्थापन आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी रिअल-टाइम क्लाउड-आधारित मॉनिटरिंगसह रडार सेन्सर बसवण्यात येणार आहेत. जलस्रोत खात्याने या प्रणालीसाठी ८.३५ लाख रुपये खर्चाची निविदा काढली आहे. धरणातील पाण्याची पातळी आणि संबंधित अचूक माहिती मिळवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. 

टॅग्स :goaगोवाDamधरण