शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

देशाची सभ्यताच स्त्रीवादी राहीली आहे, जेएनयुच्या कूलगुरु शांतिश्री पंडीत यांंचं प्रतिपादन

By समीर नाईक | Updated: April 12, 2024 14:49 IST

जेंडर राईट्स या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहूणे व वक्ता म्हणून शांतिश्री पंडीत बोलत होत्या.

पणजी: आमचा देश इतर देशाच्या तुलनेत खुप प्रगतीशील देश आहे. युरोपमध्ये लोक दगड उचलायला लागले होते, तेव्हा आमच्या देशात विविध सभ्यता कार्यरत होती. आपण नेहमीच महिला अन्यायावर बोलत आहोत, पण देश घडविण्यास महिलांचे योगदान अविस्मरणीय आहे. मुळात आपण बारकाईने पाहिले तर आमची सभ्यताच स्त्रीवादी सभ्यता राहीली आहे. अर्धनारीश्वर रुप, द्रोपदीची गोष्ट, सत्यवान सावित्रीची गोष्ट आम्हाला याची आठवण करुन देते, असे प्रतिपादन जेएनयु दिल्लीची कूलगुरु शांतिश्री पंडीत यांनी केले.

पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयतर्फे उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य महिला आयोग यांच्या सहाय्याने पाटो येथील संस्कृती भवन येथे जेंडर राईट्स या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेच्या उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणून शांतिश्री पंडीत बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत गोवा विद्यापीठाचे कुलगूरु प्रा. डॉ. हरीलाल मेनन, राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रंजीता पै, विद्याप्रबोधीनी महाविद्यालयाचे व्यवस्थापक संजय वालावालकर, प्राचार्य भूषण भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मी डाव्या किंवा उजव्या विचारांना मानत नाही, कारण आमचे तत्वज्ञान या गोष्टींना मानत नाही. या सर्व गोष्टी पश्चिमी देशातील आहेत. महिला आपल्या बळावर मोठ्या होत असतात, या गोष्टीवर मी ठाम आहे आणि सध्याचे सरकारही महिला सशक्तीकरणावर भर देत आहे, हे पाहूण आनंद होतो. महिला सशक्तीकरणाचे जीवंत उदाहरण म्हणजे मीच आहे. मी तामिळनाडू सारख्या राज्यातून येते आणि माझी जातही इतरांच्या तुलनेत कमी आहे, पण मी जेएनयुची पहिली महिला कूलगुरू आहेे. देशाने महिलांना खुप काही दिले आहेे. आमची सभ्यता आम्हाला जीवनाचा सार्थ शिकवते. आम्ही सर्वात आधी मातृ देवो भव: असे म्हणतो, व नंतर पितृ देवो भव: आणि आचार्य देवो भव: यातच सर्वकाही आले, असे पंडित यांनी यावेळी सांगितले.

महिलांना जर आपला विकास करायचा असेल तर आपल्यावरील सर्व बंधनांमधून मुक्त झाले पाहीजे. मला सांगण्यात अभिमान वाटतो की गोवा विद्यापिठात ६२ टक्के महिला विद्यार्थी आणि तेवढेच टक्के महिला कर्मचारी आहे. गोवा देखील इतर राज्यांच्या तुलनेत खुप वेगळा आहे. समान नागरी कायदा असणारा गोवा हे पहिले राज्य आहे. त्यामुळे गोवाकडून महिला सशक्तीकरणबाबत देखील शिकण्यासारखे खुप काही आहे, असे प्रो. डॉ. हरीलाल मेनन यांनी सांगितले.

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूgoaगोवा