शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

सनबर्नची नशा सरकारला; जसे बोलते तसे वागत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2024 10:36 IST

सनबर्नसारख्या पार्ट्यावेळी काय घडतेय हे सरकारला ठाऊक आहे. 

गोवा सरकारला कोणत्या संस्कृतीविषयी जास्त प्रेम आहे याचा विचार केला तर गेल्या वीस वर्षांतील अधःपतनाचा इतिहास डोळ्यांसमोर आणावा लागेल, सरकार जसे बोलतेय, तसे वागत नाही. यामुळेच लोक निवडणुकीवेळी आपला राग व्यक्त करतात. गेल्या बारा वर्षांत कसिनो संस्कृती वाढली, गॉयकारांचीदेखील काही कुटुंबे कसिनोंमुळे कर्जबाजारी झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र सरकारला त्याबाबत दुःख वाटत नाही. सनबर्नसारख्या पार्ट्यावेळी काय घडतेय हे सरकारला ठाऊक आहे. 

पूर्वी सनबर्न आयोजकांनी सरकारचा आवश्यक महसूल सरकारी तिजोरीत जमा केला नाही म्हणून खटलाही न्यायालयापर्यंत पोहोचला होता. अर्थात, केवळ सनबर्नच नव्हे तर एकूणच इडीएम म्हणजे गोव्याची संस्कृती नव्हे, निदान भाजप सरकारला तरी हे कुणी दुसऱ्याने सांगायला नको, कारण श्रीराम, शिवाजी महाराज, हनुमान चालीसा, परशुराम वगैरे सगळे गोड व पवित्र शब्द ज्यांच्या तोंडात असतात, त्यांच्या राज्यात कसिनो विकृती किंवा ड्रग्जला उत्तेजन देणारी इडीएम संस्कृती वाढणार नाही अशी अपेक्षा असते. अशी अपेक्षा ठेवणारे गोंयकार हे खन्या अर्थाने भाबडे आहेत. मात्र गोव्याचे दुर्दैव असे की सत्ताधाऱ्यांना सनबर्नचे आयोजक भाबडे वाटतात. त्यांना बिचाऱ्यांना दरवेळी शेवटच्या क्षणीच सरकारी परवानगी मिळते, अशी हतबलता परवा सरकारने व्यक्त केली. किती गरीब बिचारे सनबर्नवाले, केवढे मोठे पुण्यकर्म करण्यासाठी गोव्यात येतात, असे मात्र अजून कुणी मंत्री बोललेले नाहीत. कदाचित यापुढील दिवसांत तसेही काहीजण बोलतील. कारण शेवटी सनबर्न असो, किनारपट्टीतल्या पार्चा असोत किंवा कसिनो असो, त्यामागे वेगळे अर्थकारण असते.

दक्षिण गोव्यातील लोक जर सनबर्नला विरोध करत असतील तर गोवा सरकारने गोंयकारांच्या बाजूने राहायला हवे की सनबर्नवाल्यांच्या? इडीएमवाले कदाचित धनिक असतील, पण दक्षिण गोव्यातील लोक संस्कृतीप्रेमी आहेत असे सरकारला वाटत नाही काय? अनेक युवक सनबर्नचे पास सरकारकडे किंवा काही मंत्र्यांकडे डिसेंबर महिन्यात मागत असतात. तुम्ही पास मागणार नाही, याची हमी द्या असे काही मंत्री सुचवतात. म्हणजे ठराविक वयोगटातील मुलांनी पास मागितले म्हणजे गोव्यात वाट्टेल ते करायला मोकळीक देण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होतो का? 

फुटबॉलचे सामने असतात किंवा फातोड्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होतो तेव्हादेखील लोक पास मागतात. इडीएमऐवजी उद्या समजा पूर्णपणे ड्रग्जचीच पार्टी झाली तर त्या पार्टीला जाण्यासाठी काही तरुण छुप्या पद्धतीने राज्यकर्त्यांकडे पास किंवा सुरक्षित मार्गाची हमी मागतील, मग सरकार किंवा राज्यकर्ते काय करतील? पास मागितले जातात म्हणून ड्रग्जच्यादेखील पार्थ्यांना मान्यता देणार काय? इडीएम कोणताही असो, तिथे अखंड ४८ तास किंवा ७२ तास नाचण्यासाठी जी शक्ती व उत्साह येतो, तो आपोआप येत नाही. अनेक पर्यटक ड्रग्ज घेऊन आलेले असतात. या अशा इडीएम महोत्सवांचे आयोजन पंधरा-वीस वर्षांपूर्वी गोव्यात होत नव्हते. त्यावेळी युवक काय जगत नव्हते काय? अशा इडीएम विनाही लोक सुखाने जगत होतेच. गोव्यातील काही बहकलेले युवक म्हणजे पूर्ण गोवा नव्हे, कसिनोवर जाऊन आपल्या बापजाद्यांनी कमावलेले सगळे पैसे गमावून बसलेले काही दिवटे तरुणही गोंयकारांमध्ये आहेत, मात्र याचा अर्थ असा होत नाही की पावलोपावली सरकारने कसिनो सुरू करायला मान्यता द्यावी व गोव्यातील तरुणांनी फक्त जुगार खेळावा. 

शेवटी समाजाला दिशा देण्याचे काम राजकीय नेतृत्व करणार नसेल किंवा चुकीचे काय व बरोबर काय ते जर तरुणांना सरकार सांगणार नसेल तर मग संस्कृतीवर बोलायचा अधिकार सत्ताधाऱ्यांना कुठे राहतो? पोर्तुगीजांच्या खाणाखुणा आम्ही पुसून टाकू असे बोलून शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करण्याचाही नैतिक अधिकार अशा सरकारला राहत नाही. अशा इडीएमद्वारे गोव्याला दक्षिणेची काशी केले जाईल काय, असाही प्रश्न येतो. गेल्यावर्षी सनबर्नवाल्यांनी जाहीर केले होते की आपण गोव्याला कायमचा रामराम ठोकला आहे. मग आता त्यांना दक्षिण गोव्याची वाट कोणत्या राजकारण्यांनी दाखवली आहे, ते गोंयकारांनाही कळू द्या. सरकारने पुन्हा एकदा दक्षिण गोव्यातील आगीशी खेळून स्वतःचे हात भाजून घेऊ नये.

 

टॅग्स :goaगोवाSunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल