पर्यटन नगरीत रोज एक आत्महत्या
By Admin | Updated: October 4, 2014 01:21 IST2014-10-04T01:20:47+5:302014-10-04T01:21:09+5:30
पणजी : पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात; पण २0११ ते २0१३ पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात दरदिवशी एक आत्महत्या होते.

पर्यटन नगरीत रोज एक आत्महत्या
पणजी : पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात; पण २0११ ते २0१३ पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात दरदिवशी एक आत्महत्या होते.
राज्यात प्रत्येक आठवड्याला साधारण ५.६१ लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या तीन वर्षांत ८७७ लोकांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली आहे. यात सरकारी नोकरी न मिळणे, तणाव, मानसिक अस्वस्थता, प्रेम प्रकरणात अपयश, मानसिक, शारीरिक त्रास इत्यादी कारणांचा समावेश आहे.
गोवा राज्य भारतातील सर्वात लहान राज्य असले तरी आत्महत्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताच्या लोकसंख्येप्रमाणे देशात २0१२ सालच्या अहवालाप्रमाणे एका लाखाच्या आकडेवारीनुसार ११.७ टक्के आत्महत्यांचे प्रमाण आहे. मात्र, गोव्यात १८.४ टक्के आढळते.
येथील दामोदर महाविद्यालयाचे नामदेव गावस व सतीश सावळ यांनी केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील आर्थिक परिस्थिती, मानसिक ताणतणाव, पर्यावरणीय व एकंदर आरोग्य साधनसुविधा हे आत्महत्या करण्यासाठी मानवी मनाला प्रवृत्त करतात. मानसिक कमकुुवतपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, असाही निकर्ष आहे. १६ वर्षांवरील वयोगटात ८७७ पैकी ३३८ व्यक्तींनी केवळ मानसिक तणावामुळे आत्महत्या केली असल्याचे आढळते.
२0११ ते २0१३ दरम्यान ६३ व्यक्तींनी दारूच्या अतिरिक्त व्यसनापायी आत्महत्या केली असल्याचे आढळते. दारूचे व्यसन हेही आत्महत्येचे कारण म्हणून पुढे येऊ लागले आहे. कामाच्या ठिकाणी सतावणूक होत असल्यानेही काही व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी दशेत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने किंवा अभ्यासाच्या भीतीने लहान वयात आत्महत्येचे पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही आहे. अभ्यासाची भीती आणि तणावामुळे मानसिकरीत्या खचत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशकाची आवश्यकता आहे. शिक्षण खात्याने प्रत्येक शाळेत समुपदेशकाची नेमणूक केली आहे. वर्षाला साधारण १५ हजार ४४७ विद्यार्थी या केंद्राकडे येतात. यातील १ हजार ३१७ विद्यार्थी भावनिक समस्यांत अडकलेले असल्याचे आढळते. ९४३ विद्यार्थी नातेसंबंधाच्या समस्यांत, तर २0३ विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे समोर आले आहे.
समुपदेशकांच्या सहवासात आलेल्या ५६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तर २0३ विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास गमावल्याचे जाणवते. चांगल्या करिअरसाठी जास्त अभ्यास जास्त गुण मिळविण्याच्या दडपणाखाली, तणावाखाली विद्यार्थी अनेक वाईट मार्ग जवळ करतात. यात दारू, ड्रग्स, तंबाखू, सिगारेट सारखे पर्याय वापरतात.
(प्रतिनिधी)