शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Sunburn 2019 : सनबर्न महोत्सव बंद करा, चर्चिल आलेमाव यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 18:57 IST

Sunburn Festival 2019 : ड्रग्जचे व्यवहार बंद झाले तर मग सनबर्नही बंद होईल. सनबर्न हा ड्रग्जमुळेच होतो.

पणजी : सनबर्नचा महोत्सव हा अंमली पदार्थाच्या वापराशिवाय होऊच शकत नाही. ड्रग्ज अगदी सहज उपलब्ध होत आहेत. सरकारने गोव्यात सनबर्न आयोजित करणे बंदच करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली.

येथे पत्रकारांशी बोलताना आलेमाव म्हणाले, की ड्रग्ज व्यवसाय कसा चालतो, त्याविषयी आपण यापुढील विधानसभा अधिवेशनातही बोलणार आहे. पोलिसही गुंतलेले आहेत. जर ड्रग्जचे व्यवहार बंद झाले तर मग सनबर्नही बंद होईल. सनबर्न हा ड्रग्जमुळेच होतो. अशा प्रकारचे सोहळे गोव्याला नकोत. युवा पिढी बरबाद होत आहे. आपण मुख्यमंत्र्यांकडेही सनबर्न बंदीची मागणी करीन. पोलिसही सामिल असल्याने सनबर्नच्या परिसरात ड्रग्ज उपलब्ध होतात. ड्रग्जच्या गोळ्य़ा अलिकडे कुठेही सहज मिळतात. राज्याच्या ग्रामीण भागातही ड्रग्ज पोहचले आहेत, असे आलेमाव म्हणाले.दरम्यान, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की सनबर्न ही जरी गोव्याची संस्कृती नसली तरी, पर्यटन व्यवसायासाठी सनबर्नसारख्या सोहळ्य़ांचीही गरज असते. त्यामुळे सरकारला समतोल साधावा लागतो. सनबर्न गोव्याची संस्कृती आहे, असे मी म्हणणार नाही. गोव्याची संस्कृती व सनबर्न यांची तुलनाच होऊ शकत नाही. गोव्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपले कला व संस्कृती खाते खूप उपक्रम राबवते. कला अकादमी पाश्चीमात्त्य संगीताचेही वर्ग आयोजित करते. सनबर्नमध्ये पाश्चिमात्य संगीत व संस्कृती आहे पण त्याचीही गरज पर्यटनाला आहे. सनबर्नमध्ये जाण्याची किंवा तिथे नृत्य करण्याची सक्ती कुणीच कुणावर करत नाही. प्रत्येकाने स्वत: काय करावे ते ठरवायला हवे.

टॅग्स :Sunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हलgoaगोवाcultureसांस्कृतिक