शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विरोधकांमधील काहीजण सैरभैर पण सरकार स्थिर: प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 19:43 IST

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी  सरकारला पाठींबा देऊन आपण चूक केली की काय अशा प्रकारचा प्रश्न पडत असल्याचे विधान केलं होत.

पणजी: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी  सरकारला पाठींबा देऊन आपण चूक केली की काय अशा प्रकारचा प्रश्न पडत असल्याचे विधान केलं होत. यावर विरोधकांमधील काहीजण सैरभैर झाली आहेत पण सरकार स्थिर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.

प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याच्या जनतेला सरकारचे आवडू लागले आहे. काहीजणांना ते पाहवत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत व काहीही विधाने करतात. काहीजणांना सरकारचे काम ब:यापैकी चाललेय हे पाहवत नाही. जे काहीही विधाने करतात, त्या विधानांची आम्ही काळजी करत नाही. आमच्याकडे सत्तावीस आमदारांचे संख्याबळ आहे. शिवाय तिघेजण सरकारला पाठींबा देतात.तसेच मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असलेले मंत्री गुदिन्हो म्हणाले, की सरकारची प्रगती पाहून काहीजण डिस्टर्ब झालेले आहेत. कोण डिस्टर्ब झालेत, त्यांची नावे मी घेत नाही, कारण लोकांना ते ठाऊक आहे. काहीही विधाने विरोधक करतीलच. ती विधाने राजकीय स्वरुपाची आहेत. विरोधक जे काही बोलतात, ते ऐकले की, सरकार योग्य प्रकारे काम करतेय हे स्पष्ट होतं असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, विजय सरदेसाई यांनी प्रथम पर्रिकर यांच्या सरकारला व त्यानंतर सावंत यांच्या सरकारला पाठिंबा देऊन आपण चूक तर केली नाही ना असा प्रश्न सतत पडत असल्याचे विधान केले होते. तसेच विश्वासघाताचे जे काही बीज आहे, ते या दोन प्रश्नांमध्ये आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिल्लीहून मिळतील, नव्या वर्षी तरी निश्चितच मिळतील असेही सरदेसाई म्हणाले. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की सरदेसाई काय बोलले त्यावर मला काही भाष्य करायचे नाही. मात्र मी एवढे निश्चित सांगतो की, आमचे सरकार चांगले काम करत आहे. आमचे सरकार स्थिर आहे व विधानसभेचा उर्वरित कार्यकाळही पूर्ण करण्याचा विश्वास असल्याचा प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाBJPभाजपा