शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

"सर्वाधिकार शिंदेंना, मंत्रिपदे आणि इतर गोष्टी शिंदेच ठरवतील", दीपक केसरकर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 14:45 IST

Deepak Kesarkar: बंडखोर गटाकडे मंत्रिपदे किती यावीत, मुख्यमंत्री कोण असावा याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

पणजी : बंडखोर गटाकडे मंत्रिपदे किती यावीत, मुख्यमंत्री कोण असावा याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर प्रथमच बंडखोर गटाच्या वतीने केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. ते म्हणाले की, ‘अमुक आमदारांना मंत्रिपदे दिली जातील, अशा बातम्या प्रसार माध्यमांमधून येत आहेत परंतु मंत्रिपदांबाबत अजून काहीच ठरलेले नाही. शिंदे मुंबईला गेले आहेत ते मंत्रिपदे मागण्यासाठी नव्हेत तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिने काय करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी होय. शिंंदे हे मुंबईत भाजप नेत्यांशी बोलतील. त्यांना आम्हा आमदारांच्या वतीने सर्व अधिकार दिलेले आहेत.’ मंत्रीपदे कोणाला मिळणार व कोणाला डावलणार याबाबत वावड्या उठवून काही विरोधक आमच्यात फूट घालू पहात आहेत, असे केसरकर म्हणाले.

केसरकर पुढे म्हणाले की, भाजपसोबत जाण्यावर आम्ही ठाम आहोत. समविचारी पक्ष म्हणून भाजपसोबत जात आहोत. परंतु त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आमच्या मनात कायम राहील.

महाराष्ट्रातील जनतेने सेना-भाजप युतीला कौल दिला होता. ही नैसर्गिक युती तोडण्यात आली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन केली. त्याला आमचा विरोध होता, असे म्हणत केसरकर यांनी सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांनी गेल्या सात दिवसात बंडखोर आमदारांना जो त्रास दिला तो पाहता गेल्या अडीच वर्षात भाजपला त्यांनी किती छळले असावे याची कल्पना येते, असे केसरकर म्हणाले. राऊत यांनीच सेनेच्या आमदारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करुन उलट ‘चोर कोतवाल को डाटे’, असा प्रकार राऊत करताहेत, अशी टीका केसरकर यांनी केली.

केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली असती तर आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार होतो परंतु अखेरपर्यंत त्यांचे आडमुठे धोरण राहिले. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला म्हणून आम्ही सलेब्रेशन वगैरे केले नाही. ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे.’

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा