शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:06 IST

अपघात रोखण्यासाठी गृह, वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्त उपाययोजना आखल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अपघात रोखण्यासाठी गृह, वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्त उपाययोजना आखल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचा भंग केला जात आहे व यामुळेच अपघात वाढले आहेत. अपघात रोखण्यासाठी सरकार सर्व ते उपाय करीत आहे. उपाययोजनांसाठी वरील तिन्ही खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमितपणे बैठका होत असतात. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांच्या वाढत्या प्रमाणामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, दारू पिऊन वाहने चालवतात तसेच वेगाने हाकून बेदरकारपणे ओव्हरटेक करतात. अपघात रोखण्यासाठी सरकारने या उपाययोजना आखल्या आहेत त्याबाबतीत लोकांनी सहकार्य करावे.'

पत्रकार परिषदेस वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हेही उपस्थित होते. माविन म्हणाले की, 'अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आम्ही करत आहोत. दोन वेळा रस्ता सुरक्षा मंडळाची बैठक घेतली. अपघातप्रवण क्षेत्रे सुधारून हे 'ब्लॅक स्पॉट' काढून टाकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. लोक अतिवेगाने वाहने हाकतात आणि वाहन बेशिस्तपणे चालवतात. महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण झाल्याने रस्त्यावर वेगाने वाहने हाकली जातात. जबाबदारीने वाहने चालवल्याशिवाय अपघात कमी होणार नाहीत. कॅमेरे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे."

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, 'वाहतूक नियम तोडणाऱ्यांना केवळ दंड ठोठावून भागणार नाही. उत्तर गोव्यात आम्ही साडेतीन हजार तालांव दिले. लोकांनीही वाहने चालवताना शिस्त पाळली पाहिजे. आरटीओ अधिकाऱ्यांनी केवळ 'तालांव' देत राहावे का, असा सवाल त्यांनी केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ मार्चपासून

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ ते ३१ मार्च असे पाच दिवस घेण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

- सत्तरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाट सुविधा उभारण्यासाठी सरकारी जमीन देण्यास मंजुरी दिली.

- सभापतींच्या कार्यालयात सभापतीना निजी सहायक व खासगी सचिव अशी दोन अतिरिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली. मंत्र्यांच्या कार्यालयात १८ कर्मचारी असतात. सभापतींच्या कार्यालयात १६ कर्मचारी होते. त्यांना आता दोन अतिरिक्त कर्मचारी मिळतील.

- भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी दोन वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.

- खोली, म्हापसा येथील विशेष मुलांच्या आस्था शाळेसाठी ना हरकत दाखले, परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाAccidentअपघातPramod Sawantप्रमोद सावंत