शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:44 IST

सभेत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका; गोमंतकीयांचे जीवन भीतीच्या छायेत

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या गोव्याचे अस्तित्व भाजप-काँग्रेसमुळे संकटात सापडले आहे. सत्ता स्थापनेसाठी या दोन्ही पक्षांमध्ये गुप्त करार झाला आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी वेळीच यांचा डाव ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी, घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आणून गोमंतकीयांनी गोमंतकीयांचे राज्य प्रास्तापित करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमूख दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

आपच्या उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांची काल, रविवारी म्हापसा येथे बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर, आमदार व्हॅजी व्हिएगस, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना, राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोव्यात अत्यंत वाईट पद्धतीने राजकारण केले जात आहे. सत्ताधारी आपणाला हवे त्या पद्धतीने गोव्याला लुटत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. संगनमताने गोवा लुटण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये करार झाल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली. गेल्या ६० वर्षापासून गोव्यातील अवघ्याच कुटुंबाने येथील राजकारण आपल्या भोवती ठेवले आहे. स्वतःच्या फायद्यासाठी गोव्याला हवे तसे ओरबाडले जात असल्याचेही केजरीवाल म्हणाले. यावेळी आमदार वेन्झी व्हिएगश, प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली.

सरकारबद्दलचा रोष जनतेमध्ये दिसून येत आहे आहे. २०२७मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदार आपला मतदानातून आपला रोष व्यक्त करतील, असे अमित पालेकर म्हणाले. विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. सरकारविरोधात आवाज उठवला तर गुन्हा दाखल केला जात असल्याचेही पालेकर यांनी सांगितले. आप सरकारने दिल्लीत आमुलाग्र बदल घडवून आणला. त्याची पुर्नरावृत्ती गोव्यात करण्याची गरज आमदार वेन्झी व्हिएगस यांनी व्यक्त केली. दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला मोठा प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

हुकूमशाही राजवट

तब्बल १३ वर्षापासून गोव्यात भाजपचे सरकार आहे. या सरकारच्या काळात गोव्यात बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली, खाण व्यवसायाची समस्या कायम आहे, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी सारखे प्रश्न गोव्याला सतावू लागले आहेत. पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. डबल इंजिनचा दावा करणाऱ्या सरकारने गोमंतकीयावर हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचे काम केल्याची टीका केजरीवाल यांनी केली.

गुंडाराज थांबविण्याची वेळ आलीय

गोव्यातील मतदारांचा मूड बदलू लागला आहे. पुढील निवडणुकीत सत्ताबदल निश्चित आहेत. या बदलातून आप गोव्यात सक्षम आणि निःस्वार्थी सरकार देईल. भाजपचे गुंडाराज पसरू लागले आहे. तक्रारी दाखल करणाऱ्या सामान्य जनतेला धमकावले जात आहे. शैक्षणिक संस्थामध्ये ड्रग्ज पोहोचला असून यावरून सरकारी कारभार कशा पद्धतीने सुरू आहे, हे लक्षात येत असल्याचे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लेना यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Congress Secret Pact for Power: AAP Leader Arvind Kejriwal's Claim

Web Summary : Arvind Kejriwal alleges a secret BJP-Congress deal endangers Goa. He urges Goans to recognize their game, end dynastic politics, and establish a government for Goans, citing corruption and misrule in the state.
टॅग्स :goaगोवाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशी