शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
3
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
4
अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
5
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
6
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
7
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
8
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
9
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
10
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
11
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
12
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
13
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
14
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
15
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
16
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
17
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
18
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:44 IST

सभेत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका; गोमंतकीयांचे जीवन भीतीच्या छायेत

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या गोव्याचे अस्तित्व भाजप-काँग्रेसमुळे संकटात सापडले आहे. सत्ता स्थापनेसाठी या दोन्ही पक्षांमध्ये गुप्त करार झाला आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी वेळीच यांचा डाव ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी, घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आणून गोमंतकीयांनी गोमंतकीयांचे राज्य प्रास्तापित करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रमूख दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

आपच्या उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांची काल, रविवारी म्हापसा येथे बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर, आमदार व्हॅजी व्हिएगस, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना, राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोव्यात अत्यंत वाईट पद्धतीने राजकारण केले जात आहे. सत्ताधारी आपणाला हवे त्या पद्धतीने गोव्याला लुटत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. संगनमताने गोवा लुटण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये करार झाल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली. गेल्या ६० वर्षापासून गोव्यातील अवघ्याच कुटुंबाने येथील राजकारण आपल्या भोवती ठेवले आहे. स्वतःच्या फायद्यासाठी गोव्याला हवे तसे ओरबाडले जात असल्याचेही केजरीवाल म्हणाले. यावेळी आमदार वेन्झी व्हिएगश, प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली.

सरकारबद्दलचा रोष जनतेमध्ये दिसून येत आहे आहे. २०२७मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदार आपला मतदानातून आपला रोष व्यक्त करतील, असे अमित पालेकर म्हणाले. विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. सरकारविरोधात आवाज उठवला तर गुन्हा दाखल केला जात असल्याचेही पालेकर यांनी सांगितले. आप सरकारने दिल्लीत आमुलाग्र बदल घडवून आणला. त्याची पुर्नरावृत्ती गोव्यात करण्याची गरज आमदार वेन्झी व्हिएगस यांनी व्यक्त केली. दक्षिण गोव्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला मोठा प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

हुकूमशाही राजवट

तब्बल १३ वर्षापासून गोव्यात भाजपचे सरकार आहे. या सरकारच्या काळात गोव्यात बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली, खाण व्यवसायाची समस्या कायम आहे, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी सारखे प्रश्न गोव्याला सतावू लागले आहेत. पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. डबल इंजिनचा दावा करणाऱ्या सरकारने गोमंतकीयावर हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचे काम केल्याची टीका केजरीवाल यांनी केली.

गुंडाराज थांबविण्याची वेळ आलीय

गोव्यातील मतदारांचा मूड बदलू लागला आहे. पुढील निवडणुकीत सत्ताबदल निश्चित आहेत. या बदलातून आप गोव्यात सक्षम आणि निःस्वार्थी सरकार देईल. भाजपचे गुंडाराज पसरू लागले आहे. तक्रारी दाखल करणाऱ्या सामान्य जनतेला धमकावले जात आहे. शैक्षणिक संस्थामध्ये ड्रग्ज पोहोचला असून यावरून सरकारी कारभार कशा पद्धतीने सुरू आहे, हे लक्षात येत असल्याचे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लेना यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Congress Secret Pact for Power: AAP Leader Arvind Kejriwal's Claim

Web Summary : Arvind Kejriwal alleges a secret BJP-Congress deal endangers Goa. He urges Goans to recognize their game, end dynastic politics, and establish a government for Goans, citing corruption and misrule in the state.
टॅग्स :goaगोवाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशी