शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

मला जाणूनबुजून डावलले जातेय म्हणत, श्रीपादभाऊ भडकले! मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:44 IST

श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे.

पणजी: दोनापावला जेटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक भडकले आहेत. आपल्याला मुद्दामहून डावलले जात आहे का? असा प्रश्न त्यानी केला असून मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांनी यात लक्ष घालावे, असेही ते म्हणाले आहेत.

दोनापावला जेटीसाठी श्रीपाद नाईक यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून स्वदेश दर्शन योजनेखाली निधी आणला होता. शनिवारी या जेटीचे उद्घाटन करण्यात आले. श्रीपाद नाईक हे गोव्यात असतानाही त्यांना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री किंवा उत्तर गोव्याचे खासदार या नात्याने कार्यक्रमास निमंत्रण दिले नाही. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत श्रीपादभाऊंना विचारले असता ते म्हणाले की, प्रथमच असे घडले आहे असे नव्हे. मुद्दामहून मला डावलले जाते की, चुकीने घडते हे कळत नाही. पुन्हा पुन्हा चूक घडू शकत नाही. दोनापावला जेटीसाठी केंद्रातून मी निधी आणला. मी केंद्रात पर्यटन राज्यमंत्री आहे शिवाय उत्तर गोव्याचा खासदार आहे. या नात्याने मला बोलवायला हवे होते. केंद्राकडून निधी मिळतो तेव्हा केंद्राच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावणे अपेक्षित असते. परंतु ज्या पद्धतीने सर्व काही चालले आहे, ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री यांनी यात लक्ष घालायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. 

भाऊंचे कार्यकर्ते संभ्रमात...

श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे. आगामी वर्ष लोकसभा निवडणुकीचे असतानाही त्यांना का डावलण्यात येत आहे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी डिचोलीत माजी झेडपी संजय शेट्ये यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही श्रीपादना निमंत्रण नव्हते, अशी माहिती मिळते.

निधीसाठी मी पाठपुरावा केला

मी गोव्यात उपलब्ध असेन किंवा नसेन, तो भाग वेगळा, परंतु केंद्राचा प्रतिनिधी म्हणून व उत्तर गोव्याचा खासदार म्हणून निमंत्रण अपेक्षित आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे ते म्हणाले. दोनापावला जेटीच्या नूतनीकरणासाठी १७ कोटी रुपये खर्च आला आहे. हा निधी केंद्राने दिला होता. तसेच यासाठी मी स्वतः प्रयत्न केले होते, याची आठवणही श्रीपादभाऊंनी करून दिली.

चेहरा बदलाची चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकिटाचे दावेदार असूनही श्रीपाद यांना या कार्यक्रमाला डावलल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना तिकीट दिली जाणार का याबाबत संभ्रम आहे. श्रीपादभाऊंना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. परंतु त्यांना ज्या पद्धतीने त्यांना बाजूला केले जात आहे ते पाहता यावेळी पक्ष उत्तर गोव्यात नवीन चेहरा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा