शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मला जाणूनबुजून डावलले जातेय म्हणत, श्रीपादभाऊ भडकले! मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:44 IST

श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे.

पणजी: दोनापावला जेटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक भडकले आहेत. आपल्याला मुद्दामहून डावलले जात आहे का? असा प्रश्न त्यानी केला असून मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांनी यात लक्ष घालावे, असेही ते म्हणाले आहेत.

दोनापावला जेटीसाठी श्रीपाद नाईक यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून स्वदेश दर्शन योजनेखाली निधी आणला होता. शनिवारी या जेटीचे उद्घाटन करण्यात आले. श्रीपाद नाईक हे गोव्यात असतानाही त्यांना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री किंवा उत्तर गोव्याचे खासदार या नात्याने कार्यक्रमास निमंत्रण दिले नाही. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत श्रीपादभाऊंना विचारले असता ते म्हणाले की, प्रथमच असे घडले आहे असे नव्हे. मुद्दामहून मला डावलले जाते की, चुकीने घडते हे कळत नाही. पुन्हा पुन्हा चूक घडू शकत नाही. दोनापावला जेटीसाठी केंद्रातून मी निधी आणला. मी केंद्रात पर्यटन राज्यमंत्री आहे शिवाय उत्तर गोव्याचा खासदार आहे. या नात्याने मला बोलवायला हवे होते. केंद्राकडून निधी मिळतो तेव्हा केंद्राच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावणे अपेक्षित असते. परंतु ज्या पद्धतीने सर्व काही चालले आहे, ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री यांनी यात लक्ष घालायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. 

भाऊंचे कार्यकर्ते संभ्रमात...

श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे. आगामी वर्ष लोकसभा निवडणुकीचे असतानाही त्यांना का डावलण्यात येत आहे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी डिचोलीत माजी झेडपी संजय शेट्ये यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही श्रीपादना निमंत्रण नव्हते, अशी माहिती मिळते.

निधीसाठी मी पाठपुरावा केला

मी गोव्यात उपलब्ध असेन किंवा नसेन, तो भाग वेगळा, परंतु केंद्राचा प्रतिनिधी म्हणून व उत्तर गोव्याचा खासदार म्हणून निमंत्रण अपेक्षित आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे ते म्हणाले. दोनापावला जेटीच्या नूतनीकरणासाठी १७ कोटी रुपये खर्च आला आहे. हा निधी केंद्राने दिला होता. तसेच यासाठी मी स्वतः प्रयत्न केले होते, याची आठवणही श्रीपादभाऊंनी करून दिली.

चेहरा बदलाची चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकिटाचे दावेदार असूनही श्रीपाद यांना या कार्यक्रमाला डावलल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना तिकीट दिली जाणार का याबाबत संभ्रम आहे. श्रीपादभाऊंना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. परंतु त्यांना ज्या पद्धतीने त्यांना बाजूला केले जात आहे ते पाहता यावेळी पक्ष उत्तर गोव्यात नवीन चेहरा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा