शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

मला जाणूनबुजून डावलले जातेय म्हणत, श्रीपादभाऊ भडकले! मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:44 IST

श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे.

पणजी: दोनापावला जेटीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक भडकले आहेत. आपल्याला मुद्दामहून डावलले जात आहे का? असा प्रश्न त्यानी केला असून मुख्यमंत्री, तसेच मंत्र्यांनी यात लक्ष घालावे, असेही ते म्हणाले आहेत.

दोनापावला जेटीसाठी श्रीपाद नाईक यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून स्वदेश दर्शन योजनेखाली निधी आणला होता. शनिवारी या जेटीचे उद्घाटन करण्यात आले. श्रीपाद नाईक हे गोव्यात असतानाही त्यांना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री किंवा उत्तर गोव्याचे खासदार या नात्याने कार्यक्रमास निमंत्रण दिले नाही. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत श्रीपादभाऊंना विचारले असता ते म्हणाले की, प्रथमच असे घडले आहे असे नव्हे. मुद्दामहून मला डावलले जाते की, चुकीने घडते हे कळत नाही. पुन्हा पुन्हा चूक घडू शकत नाही. दोनापावला जेटीसाठी केंद्रातून मी निधी आणला. मी केंद्रात पर्यटन राज्यमंत्री आहे शिवाय उत्तर गोव्याचा खासदार आहे. या नात्याने मला बोलवायला हवे होते. केंद्राकडून निधी मिळतो तेव्हा केंद्राच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावणे अपेक्षित असते. परंतु ज्या पद्धतीने सर्व काही चालले आहे, ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री यांनी यात लक्ष घालायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. 

भाऊंचे कार्यकर्ते संभ्रमात...

श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे. आगामी वर्ष लोकसभा निवडणुकीचे असतानाही त्यांना का डावलण्यात येत आहे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी डिचोलीत माजी झेडपी संजय शेट्ये यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही श्रीपादना निमंत्रण नव्हते, अशी माहिती मिळते.

निधीसाठी मी पाठपुरावा केला

मी गोव्यात उपलब्ध असेन किंवा नसेन, तो भाग वेगळा, परंतु केंद्राचा प्रतिनिधी म्हणून व उत्तर गोव्याचा खासदार म्हणून निमंत्रण अपेक्षित आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे ते म्हणाले. दोनापावला जेटीच्या नूतनीकरणासाठी १७ कोटी रुपये खर्च आला आहे. हा निधी केंद्राने दिला होता. तसेच यासाठी मी स्वतः प्रयत्न केले होते, याची आठवणही श्रीपादभाऊंनी करून दिली.

चेहरा बदलाची चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकिटाचे दावेदार असूनही श्रीपाद यांना या कार्यक्रमाला डावलल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना तिकीट दिली जाणार का याबाबत संभ्रम आहे. श्रीपादभाऊंना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. परंतु त्यांना ज्या पद्धतीने त्यांना बाजूला केले जात आहे ते पाहता यावेळी पक्ष उत्तर गोव्यात नवीन चेहरा देण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा