साळगावकर बंधूंची अटकेनंतर सुटका!
By Admin | Updated: March 10, 2016 02:03 IST2016-03-10T01:55:58+5:302016-03-10T02:03:18+5:30
पणजी : खनिज खाण घोटाळा प्रकरणात उद्योजक समीर साळगावकर व अर्जुन साळगावकर यांना विशेष पोलीस पथकाने (एसआयटी) बुधवारी

साळगावकर बंधूंची अटकेनंतर सुटका!
पणजी : खनिज खाण घोटाळा प्रकरणात उद्योजक समीर साळगावकर व अर्जुन साळगावकर यांना विशेष पोलीस पथकाने (एसआयटी) बुधवारी अटक केली. त्यांच्या अटकपूर्व
जामिनावर अद्याप निवाडा झाला नसल्यामुळे अटक करून सुटका करण्याची औपचारिकता एसआयटीने केली.
एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साळगावकर बंधूंना दोनापावल येथील एसआयटीच्या कार्यालयात बोलविले होते. दोघांनी हजेरीही लावली. काही वेळ चौकशी करून नंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी दोघांनाही रायबंदर येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात नेण्यात
आले. त्यानंतर लवकरच त्यांना मुक्तही करण्यात आले. समीर व अर्जुन यांची प्रत्येकी एक
लाख रुपये जामीन आणि एक हमीदार या
अटींवर सुटका करण्यात आली.
साळगावकर बंधूंनी अटक चुकविण्यासाठी पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांवर अजून निवाडा
झाला नसल्यामुळे त्यांना अटक करून ठेवण्यास मज्जाव आहे. त्यामुळे कायदेशीर सोपस्कार पार पाडतत या दोघांना अटक करून मुक्त करण्यात आले आहे. त्यांना अटक करून त्यांची कोठडी मिळविण्यासाठी एसआयटीला न्यायालयाच्या निवाड्याची वाट पाहावी लागेल.
न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाच्या अहवालात मेसर्स कांतिलाल कंपनीवर अश्ने डोंगरावर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मर्यादा ओलांडून उत्खनन, संबंधित खात्यांच्या परवान्याशिवाय उत्खनन, सरकारी महसूल बुडविणे अशा प्रकारचे ठपके अहवालात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी खाण खात्याकडून समीर व अर्जुन यांचे पिता अनिल साळगावकर तसेच माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले होते. ज्योकिम आलेमाव हे या प्रकरणात कंत्राटदार होते. अनिल साळगावकर यांचे अलीकडेच निधन झाले. (प्रतिनिधी)